शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

सर्वसमावेशक विकास गरजेचा

By admin | Updated: February 16, 2017 03:21 IST

शासनाबरोबरच खासगी क्षेत्राच्या विकासाबाबतचा दृष्टिकोन काय आहे, यावर देशाच्या विकासाची दिशा व गती अवलंबून आहे.

पुणे : शासनाबरोबरच खासगी क्षेत्राच्या विकासाबाबतचा दृष्टिकोन काय आहे, यावर देशाच्या विकासाची दिशा व गती अवलंबून आहे. मात्र, देशातील धर्म, जात, लिंग व प्रांतभेद विचारात घेऊन सर्वसमावेशक विकासाचे धोरण आखण्याची आवश्यकता आहे, असे मत इंडियन कौन्सिल आॅफ सोशल सायन्स रिसर्च संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले.सिम्बायोसिस स्कूल आॅफ इकॉनॉमिक्सच्या वतीने आयोजित ‘ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया २०३० : स्ट्रॅटॅजीस् फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोअल्स’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी सुखदेव थोरात बोलत होते. कार्यक्रमास सिम्बायोसिसचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, सिम्बायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट आॅफ डेव्हलपमेंट रिसर्च आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य प्रा. दिलीप नाचणे, संयुक्त राष्ट्रसंघाचे निवासी समन्वयक व यूएनडीपीचे भारतातील निवासी प्रतिनिधी युरी अ‍ॅफॅनासीएव्ही, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, संचालिका डॉ. ज्योती चंद्रमणी आदी या वेळी उपस्थित होते.दिलीप नाचणे म्हणाले, देशातील कामगार कायद्यात मोठ्या प्रमाणात बदल केले जात आहेत. हे बदल कामगार चळवळीला धोकादायक आहेत. त्यामुळे देशाच्या विकासाचा विचार करताना कामगारांच्या हिताचाही विचार करावा लागणार आहे. युरी अ‍ॅफॅनासीएव्ही यांनी भारताने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या विकासाला गती द्यावी, असे मत व्यक्त करून भारतासमोरील व जगातील इतर देशांसमोरील विकासाची आव्हाने सारखी असल्याचे नमूद केले. कार्यक्रमात डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. विद्या येरवडेकर यांनी मनोगत व्यक्त केले.