शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

दुर्लक्षित गडकोटांना भग्नावस्थेतून मिळतेय नवसंजीवनी

By admin | Updated: October 11, 2015 04:22 IST

प्रथम भटकंती... नंतर निरीक्षण... नंतर स्वच्छता... नंतर स्थानिक तरुणांना सोबत घेऊन संपूर्ण किल्ला पाहणे... त्यांना त्या किल्ल्याविषयी माहिती देणे...

- अशोक खरात,  खोडदप्रथम भटकंती... नंतर निरीक्षण... नंतर स्वच्छता... नंतर स्थानिक तरुणांना सोबत घेऊन संपूर्ण किल्ला पाहणे... त्यांना त्या किल्ल्याविषयी माहिती देणे... त्यांच्या मनात दुर्गसंवधर्नाबाबत आत्मीयता निर्माण करणे आणि मग प्रत्यक्षात दुर्गसंवर्धनाचे कार्य सुरू करणे अशा प्रकारे आज दुर्लक्षित गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचे काम मोठ्या वेगाने राज्यभरात सुरू आहे. अनेक दुर्गप्रेमींचे हात दुर्गसंवर्धनाच्या कामामध्ये जोडले गेलेले आहेत.शिवाजी ट्रेल या राज्यव्यापी दुर्गसंवर्धन संस्थेच्या वतीने २० वर्षांपासून राज्यभरात दुर्गसंवर्धनाचे कार्य सुरू असून, त्या कार्यातून राज्यातील दुर्लक्षित व दुरवस्थेतील गडकोट किल्ल्यांना खऱ्या अर्थाने संजीवनी देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ज्या परिसरात दुर्लक्षित व दुरवस्थेत गडकिल्ले आहेत, त्या परिसरातील स्थानिक तरुणांना एकत्र आणि सोबत घेऊन दुर्गसंवर्धनाचे काम केले जाते. ज्या गडकोट किल्ल्यांना शासनाकडून विकास निधी दिला जात नाही, अशांसाठी एक व्यापक जन चळवळच उभी केली जात आहे. राज्यातील दुर्गसंवर्धन चळवळीबाबत माहिती देताना संस्थेचे राज्याचे अध्यक्ष प्रा. मिलिंद क्षीरसागर ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, की सातारा जिल्ह्यातील दुर्गसंवर्धनास गती मिळावी, संवर्धनाच्या वाटेवर गडकोट यावेत, अधिकाधिक युवकांनी दुर्गसंवर्धनात सहभागी व्हावे यासाठी सुभा सातारा, सर्वेक्षण सुभा, वृक्षवल्ली सुभा अंतर्गत सातारा जिल्ह्यातील सदाशिवगड, वर्धनगड, बारा मोटांची विहीर, पाटेश्वर मंदिरसमूह, कमानी हौद आणि मंगळवार तळे येथे नुकतीच पाहणी करून सर्वेक्षण करण्यात आले. मुळशी तालुक्यातील घनगड किल्ल्यावर शिड्यांचे काम केले आहे. तिकोणा किल्ल्यावर पायरी मार्गाचे काम केले आहे. रायरेश्वर मंदिराचे पत्रे उडून त्यांची तूटफूट झाली होती, या मंदिरावर पुन्हा नवीन पत्रे टाकले. जुन्नर तालुक्यातील किल्ले चावंडवर जाण्याचा मातीने पूर्णपणे गाडला गेलेला पायरी मार्ग शोधून काढला तसेच येथे रेलिंग बसविले तसेच पाण्याच्या टाक्या व वाडा मोकळा केला. किल्ले नारायणगडावरील मातीने गाडलेली पाण्याची टाकी मोकळी केली. येथील चोर दिंडी दरवाजा शोधून काढला व गडावरील राजवाड्याचा भाग मोकळा केला. किल्ले मल्हारगडावरही अशा प्रकारची कामे करण्यात आली आहेत.गडकिल्ल्यावर असणाऱ्या वनस्पती, जैवविविधता आदी बाबींची फोटोंसह तपशीलवार माहिती संकलनाचे कामदेखील सुरू आहे. दुर्गसंवर्धन करताना स्थानिक तरुणांना सोबत घेऊन संवर्धनाचे काम सुरू असलेल्या त्या-त्या गडकिल्ल्यांसाठी स्थानिक दुर्गसंवर्धन समित्या तयार करण्यात आल्या आहेत.दुर्गसंवर्धनाच्या कार्यात आतापर्यंत मनोज पवळे, विनायक खोत, मुकुंद उत्पात, सुजाता क्षीरसागर, माजी सैनिक रमेश खरमाळे, मनीष पुराणिक, सुजीत नेवले, प्रतीक तेली, सुमीत क्षीरसागर, स्वप्निल घनोटे, विजय कोल्हे, प्रभाकर कर्पे यांनी हिरिरीने सहभाग घेतला आहे.