शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

दुर्लक्षित गडकोटांना भग्नावस्थेतून मिळतेय नवसंजीवनी

By admin | Updated: October 11, 2015 04:22 IST

प्रथम भटकंती... नंतर निरीक्षण... नंतर स्वच्छता... नंतर स्थानिक तरुणांना सोबत घेऊन संपूर्ण किल्ला पाहणे... त्यांना त्या किल्ल्याविषयी माहिती देणे...

- अशोक खरात,  खोडदप्रथम भटकंती... नंतर निरीक्षण... नंतर स्वच्छता... नंतर स्थानिक तरुणांना सोबत घेऊन संपूर्ण किल्ला पाहणे... त्यांना त्या किल्ल्याविषयी माहिती देणे... त्यांच्या मनात दुर्गसंवधर्नाबाबत आत्मीयता निर्माण करणे आणि मग प्रत्यक्षात दुर्गसंवर्धनाचे कार्य सुरू करणे अशा प्रकारे आज दुर्लक्षित गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचे काम मोठ्या वेगाने राज्यभरात सुरू आहे. अनेक दुर्गप्रेमींचे हात दुर्गसंवर्धनाच्या कामामध्ये जोडले गेलेले आहेत.शिवाजी ट्रेल या राज्यव्यापी दुर्गसंवर्धन संस्थेच्या वतीने २० वर्षांपासून राज्यभरात दुर्गसंवर्धनाचे कार्य सुरू असून, त्या कार्यातून राज्यातील दुर्लक्षित व दुरवस्थेतील गडकोट किल्ल्यांना खऱ्या अर्थाने संजीवनी देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ज्या परिसरात दुर्लक्षित व दुरवस्थेत गडकिल्ले आहेत, त्या परिसरातील स्थानिक तरुणांना एकत्र आणि सोबत घेऊन दुर्गसंवर्धनाचे काम केले जाते. ज्या गडकोट किल्ल्यांना शासनाकडून विकास निधी दिला जात नाही, अशांसाठी एक व्यापक जन चळवळच उभी केली जात आहे. राज्यातील दुर्गसंवर्धन चळवळीबाबत माहिती देताना संस्थेचे राज्याचे अध्यक्ष प्रा. मिलिंद क्षीरसागर ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, की सातारा जिल्ह्यातील दुर्गसंवर्धनास गती मिळावी, संवर्धनाच्या वाटेवर गडकोट यावेत, अधिकाधिक युवकांनी दुर्गसंवर्धनात सहभागी व्हावे यासाठी सुभा सातारा, सर्वेक्षण सुभा, वृक्षवल्ली सुभा अंतर्गत सातारा जिल्ह्यातील सदाशिवगड, वर्धनगड, बारा मोटांची विहीर, पाटेश्वर मंदिरसमूह, कमानी हौद आणि मंगळवार तळे येथे नुकतीच पाहणी करून सर्वेक्षण करण्यात आले. मुळशी तालुक्यातील घनगड किल्ल्यावर शिड्यांचे काम केले आहे. तिकोणा किल्ल्यावर पायरी मार्गाचे काम केले आहे. रायरेश्वर मंदिराचे पत्रे उडून त्यांची तूटफूट झाली होती, या मंदिरावर पुन्हा नवीन पत्रे टाकले. जुन्नर तालुक्यातील किल्ले चावंडवर जाण्याचा मातीने पूर्णपणे गाडला गेलेला पायरी मार्ग शोधून काढला तसेच येथे रेलिंग बसविले तसेच पाण्याच्या टाक्या व वाडा मोकळा केला. किल्ले नारायणगडावरील मातीने गाडलेली पाण्याची टाकी मोकळी केली. येथील चोर दिंडी दरवाजा शोधून काढला व गडावरील राजवाड्याचा भाग मोकळा केला. किल्ले मल्हारगडावरही अशा प्रकारची कामे करण्यात आली आहेत.गडकिल्ल्यावर असणाऱ्या वनस्पती, जैवविविधता आदी बाबींची फोटोंसह तपशीलवार माहिती संकलनाचे कामदेखील सुरू आहे. दुर्गसंवर्धन करताना स्थानिक तरुणांना सोबत घेऊन संवर्धनाचे काम सुरू असलेल्या त्या-त्या गडकिल्ल्यांसाठी स्थानिक दुर्गसंवर्धन समित्या तयार करण्यात आल्या आहेत.दुर्गसंवर्धनाच्या कार्यात आतापर्यंत मनोज पवळे, विनायक खोत, मुकुंद उत्पात, सुजाता क्षीरसागर, माजी सैनिक रमेश खरमाळे, मनीष पुराणिक, सुजीत नेवले, प्रतीक तेली, सुमीत क्षीरसागर, स्वप्निल घनोटे, विजय कोल्हे, प्रभाकर कर्पे यांनी हिरिरीने सहभाग घेतला आहे.