शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नादुरुस्त बसमुळे वाहतुकीला खो

By admin | Updated: August 7, 2015 00:31 IST

शहरातील रस्ते वाहनांनी दुथडी भरून वाहत आहेत, वाहतूककोंडी ही तर नित्याचीच बाब झाली आहे. मुळातच अरुंद असलेल्या रस्त्यांवरच्या वाहतूककोंडीने

पुणे : शहरातील रस्ते वाहनांनी दुथडी भरून वाहत आहेत, वाहतूककोंडी ही तर नित्याचीच बाब झाली आहे. मुळातच अरुंद असलेल्या रस्त्यांवरच्या वाहतूककोंडीने वाहनचालक जेरीस आलेले असताना नादुरुस्त पीएमपीएमएल बसेस रस्त्यामध्येच बंद पडल्यामुळे वाहतुकीची अक्षरश: ‘वाट’ लागते आहे. जानेवारी महिन्यात रस्त्यामध्ये पीएमपी बस बंद पडल्यामुळे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच रस्ता बदलावा लागला होता. पीएमपी प्रशासनाला याबाबत वाहतूक पोलिसांनी पत्र दिल्यानंतर सुधारणेचे दिलेले आश्वासन मात्र केव्हाच हवेत विरले असून, गेल्या सहा महिन्यांत तब्बल ३८० वेळा बस बंद पडल्यामुळे वाहतूककोंडी झाल्याची आकडेवारी आहे.दोन दिवसांपूर्वी बाजीराव रस्त्यावर पीएमपी बस बंद पडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली होती. शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर बस बंद पडल्या, की या रस्त्यांवरची वाहतूक मंदावते. पीएमपी बसचा आकार आणि रस्त्यांची रुंदी यामुळे अन्य वाहनांना जायला जागाच शिल्लक राहत नाही. मध्यवर्ती पेठांमधील गर्दीच्या आणि बाजाराच्या रस्त्यांवरही बसेस बंद पडण्याचे प्रकार सतत सुरू असतात. यासोबतच पीएमपीचे चालक बसथांब्यांवर बसेस व्यवस्थित उभ्या करत नाहीत. रस्त्याच्या कडेला सरळ रेषेमध्ये बस उभ्या करण्याचे तर जणू प्रशिक्षणच या चालकांना देण्यात आले आहे, की नाही असा विचार करायला भाग पाडणारी परिस्थिती आहे. महापालिकेसमोरच्या शिवाजी पुलाच्या दोन्ही बाजूला नेमकी हिच परिस्थिती पहायला मिळते. वेड्या वाकड्या आणि बेदरकारपणे उभ्या करण्यात आलेल्या पीएमपी बसमुळे वाहतूककोंडी तर होतेच, परंतु अनेकवेळा अपघातही होण्याची शक्यता असते. जगातला पहिला इलेक्ट्रॉनिक सिग्नल बसल्याच्या घटनेला बुधवारी १०१ वर्षे पूर्ण झाली. लंडनमधील ‘हाऊस आॅफ पार्लमेंट’ समोरच्या चौकात हा सिग्नल बसवण्यात आला होता. मात्र, या ऐतिहासिक दिवशी शहरातील ६ महत्त्वाचे सिग्नल बंद असल्याचे समोर आले. सहा महिन्यांत विजेअभावी, तांत्रिक अडचणींमुळे ४५१ वेळा सिग्नल बंद पडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी कमी होण्याऐवजी वाढत गेली आहे. सदोष सिग्नल यंत्रांमुळे अनेकदा सुरळीत वाहतूक बिघडते. वाहतूक पोलीस या सिग्नलची दुरुस्ती करतात. मध्यंतरी काही आयटी कंपन्यांनी सोलर पॅनल बसवून त्याद्वारे सिग्नल सुरू ठेवण्याचा प्रस्ताव वाहतूक पोलीस आणि पालिकेला दिला होता. वाहतूक पोलिसांनी या प्रस्तावाला तोंडी मान्यता दिली. परंतु, पालिकेमध्ये जाऊन हा प्रस्ताव मागे पडला. पीएमपीच्या मालकीची बस रस्त्यावर बंद पडल्यानंतर चालक तातडीने वायरलेस विभागाशी संपर्क साधतो. त्यानुसार ब्रेकडाउन व्हॅन घटनेच्या ठिकाणी पाठविली जाते. त्याचठिकाणी बस लगेच दुरुस्त होत नसेल, तर ती आगारामध्ये आणली जाते. त्यासाठी जास्तीत जास्त एक तासाचा कालावधी पुरेसा असतो. पण, ठेकेदारांकडील बंद बस दुरुस्त करण्याची जबाबदारी पीएमपीची नाही. त्यांची स्वतंत्र यंत्रणा असते. अनेकवेळा ठेकेदारांकडील बस लवकर दुरुस्त होत नाहीत. त्यामुळे वाहतूककोंडी झाल्याच्या काही तक्रारी आल्या होत्या, त्यानुसार त्यांना दंडही ठोठावण्यात आला आहे, अशी माहिती पीएमपीतील अधिकाऱ्यांनी दिली.सिग्नल व्यवस्था निर्दोष आणि सुरळीत चालण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची आवश्यकता आहे. वाहतूक पोलीस ही वाहतूक नियंत्रण करणारी यंत्रणा असली, तरी त्यासाठी आवश्यक असणारी साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी अन्य यंत्रणांची मदत घ्यावी लागते. सिग्नल व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी त्याला बॅकअप असणे आवश्यक आहे. रस्त्यात बंद पडणाऱ्या पीएमपी बस तातडीने हटविल्या पाहिजेत. वाहतूककोंडी दूर करणे ही वाहतूक पोलिसांसह अन्य यंत्रणांचीही जबाबदारी आहे.- सारंग आवाड (उपायुक्त, शहर वाहतूक पोलीस)