शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

भारतीय संस्कृती अखंड व शाश्वत

By admin | Updated: June 3, 2017 02:50 IST

ॠग्वेद, उपनिषदे, पुराणे यांतून भारतीय संस्कृतीचे जतन झाले आहे. ‘सनातनम नित्यनूतनम’ याप्रमाणे संस्कृतीचा प्राचीन, सनातन

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ॠग्वेद, उपनिषदे, पुराणे यांतून भारतीय संस्कृतीचे जतन झाले आहे. ‘सनातनम नित्यनूतनम’ याप्रमाणे संस्कृतीचा प्राचीन, सनातन प्रवाह कायम सुरूच आहे. यात सातत्याने नवीन भर पडत आहे. म्हणूनच संस्कृती आजवर टिकली आणि यापुढेही टिकेल. भारतीय संस्कृती अखंड आणि शाश्वत आहे, असे ठोस प्रतिपादन मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी केले.प्रसाद प्रकाशन व प्रसाद ज्ञानपीठातर्फे पं. वसंतराव गाडगीळ यांना बापूसाहेब जोशी स्मृतिगौरव पुरस्कार, तर व्यवस्थापनतज्ज्ञ प्र. चिं. शेजवलकर यांना मंजिरी जोशी स्मृतिगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी देगलूरकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी रामकृष्ण मठाचे स्वामी भौमानंद, समर्थ साहित्याचे अभ्यासक सुनील चिंचोलकर आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी ११ पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले.देगलूरकर म्हणाले, ‘काळाच्या ओघात अनेक संस्कृती नष्ट झाल्या. मात्र, आसेतुहिमाचल हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. संस्कृतीची वैचारिक संपत्ती, ध्येय, प्रबोधनात्मक लेखन, प्राचीन साहित्याचा परिचय करून घेण्याचे आणि संस्कृती टिकवण्याचे प्रयत्न आजही केले जात आहेत. प्राचीन ज्ञान कधीही लुप्त होत नसते. ते कायम घासून पुसून उजळून लख्ख करायचे असते.’पं. वसंतराव गाडगीळ म्हणाले, ‘भारतातील संस्कृत भाषा टिकवण्यासाठी मी जीवन समर्पित केले आहे. भारतीयांच्या मनात संस्कृत भाषेला ठोस स्थान मिळायला हवे. मानवी विचारांचा पहिला आविष्कार ॠग्वेद संस्कृतमध्येच उपलब्ध आहे. संस्कृत ही सर्व भाषांची जननी, भाषासम्राज्ञी आहे. ही भाषा कधीही लोप पावणार नाही. अखंड भारतासाठी आपणा सर्वांचे विचार, ध्येय एकच असले पाहिजे.’शेजवलकर म्हणाले, ‘आध्यात्मिक, धार्मिक लेखनातून भारताच्या परंपरेची झलक पाहायला मिळते. ललितगद्य प्रकार वाचकांना आजही आवडतो. आज आपल्याला पाश्चात्य संस्कृतीचे वेड लागले आहे. मात्र, जुने ते सोने याचा विचार करून ते जतन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.’या वेळी स्वामी भौमानंद आणि सुनील चिंचोलकर यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. उमा बोडस यांनी प्रास्ताविक केले. सुवर्णा बोडस यांनी सूत्रसंचालन केले. रमेश भागवत यांनी आभार मानले.प्रबंधासाठी सशक्त मार्गदर्शन आवश्यकविद्यापीठातील पीएचडी यंत्रणा कशा प्रकारे काम करते, याकडे लक्ष वेधत देगलूरकर म्हणाले, ‘बऱ्याच प्रबंधांमध्ये चौर्यकर्म मोठ्या प्रमाणात चालते. दर्जेदार संशोधन आणि प्रबंधांसाठी सशक्त मार्गदर्शन आवश्यक असते.’ वाचक कमी झाल्याने अनेक दर्जेदार मासिके बंद पडली, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.