शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ सांस्कृतिक चैन ठरेल

By admin | Updated: January 11, 2015 00:57 IST

मराठी भाषा सल्लागार समितीने केलेल्या अनेक शिफारशींमध्ये मराठी भाषेसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे, अशी सांस्कृतिक चैन ठरेल.

पुणे : मराठी भाषा सल्लागार समितीने केलेल्या अनेक शिफारशींमध्ये मराठी भाषेसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे, अशी सांस्कृतिक चैन ठरेल. त्यापेक्षा मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्था समन्वयाने कार्यरत होण्याची गरज असून, त्यासाठी प्रयत्न करण्याचा मानस शिक्षणतज्ज्ञ आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांनी केला. ‘पाखरांची शाळा’, मूलांच्या मूल्यकथा’, ‘मोहनदास करमचंद’ यांसारख्या शिक्षण, बालसाहित्य आणि वैचारिक आदी विविध विषयांवरील पुस्तकांच्या माध्यमातून मराठी साहित्यासह शैक्षणिक क्षेत्रातही अमूल्य योगदान दिलेले डॉ. न. म. जोशी हे रविवारी ८०व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांचाही हाच जन्मदिन आहे. या निमित्ताने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी होणाऱ्या प्रयत्नांबाबत ‘लोकमत’ने डॉ. जोशी यांच्याशी संवाद साधला. मराठी भाषेचे संवर्धन, इंग्रजीच्या वर्चस्वामुळे बंद पडत असलेल्या मराठी शाळा, भाषा धोरण आदी विविध विषयांवर त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, स्वतंत्र विद्यापीठाची शिफारस आदर्श म्हणून ठीक आहे. पण, महाराष्ट्रामध्ये जी काही विद्यापीठे आहेत, त्यामध्ये मराठी भाषेसाठी स्वतंत्र विभाग आहेत. त्यांचे कार्य कोणत्या प्रमाणात कमी पडते? तरीही स्वतंत्र विद्यापीठ करायचे झाल्यास त्यासाठी ठोस कृती कार्यक्रम राबविला गेला पाहिजे, अन्यथा हे विद्यापीठ म्हणजे सांस्कृतिक चैन ठरेल. डॉ. जोशी म्हणाले, ‘‘ मराठी भाषा सल्लागार समितीने भाषेचे पुढील पंचवीस वर्षांचे धोरण ठरविण्यासाठी शासनाला सादर केलेल्या मसुद्यामध्ये ज्या अनेक शिफारशी केल्या आहेत, त्या तात्त्विकदृष्ट्या चांगल्या आहेत. मात्र, मराठी भाषेचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने जो ठोस कृती कार्यक्रम आवश्यक आहे, त्याचा विचार खूप कमी प्रमाणात करण्यात आला आहे. कोणतीही भाषा ही कुटुंबात समाजात अनौपचारिकपणे आणि शिक्षणक्रमात औपचारिकपणे शिकविली जाते. भाषा संवर्धनात अध्ययन, अध्यापन प्रक्रियेचा मोठा संबंध असतो. याबद्दलचा विचार या शिफारशीमध्ये होणे अपेक्षित होते. स्वतंत्र विद्यापीठ असावे, हे आदर्शवत वाटत असले, तरी आज पुणे, मुंबई, औरंगाबाद आदी ठिकाणी विद्यापीठे असून, त्यामध्ये स्वतंत्र मराठी विभाग आहेत. मात्र, त्यांचे कार्य कोणत्या प्रमाणात कमी पडते म्हणून ही शिफारस करण्यात आली आहे, याचा उलगडा झालेला नाही. (प्रतिनिधी)४भाषेशी संबंधित काम करणाऱ्या राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळ आदी विविध स्वतंत्र संस्था आहेत. त्यांच्या समन्वयाने सक्षमपणे कार्य करण्यावर भर दिला गेला पाहिजे. म्हणूनच भाषेच्या स्वतंत्र विद्यापीठाच्या शिफारशीचा पुनर्विचार व्हायला हवा. बालवाडीपासून ते मराठी भाषेच्या संशोधकांपर्यंत सर्वांसाठी कृतिशील कार्यक्रम आखला जावा. मराठी भाषेसाठी चांगले विकास कार्य करण्यास आपण कमी पडत आहोत म्हणूनच मराठी शाळा बंद पडत आहेत का? याचाही गांभीर्याने विचार व्हायला हवा, याकडेही जोशी यांनी लक्ष वेधले.