शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
6
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
7
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
8
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
9
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
10
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
11
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
12
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
13
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
15
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
16
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
17
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
18
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
19
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
20
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या

विज्ञानाच्या मर्यादा ओळखा

By admin | Updated: January 21, 2015 00:46 IST

आज विज्ञान आणि तंत्रज्ञान नवे रूप धारण करून समोर येत आहे. नवनवीन संशोधनातून अनेक गोष्टी मांडल्या जात आहेत.

पुणे : आज विज्ञान आणि तंत्रज्ञान नवे रूप धारण करून समोर येत आहे. नवनवीन संशोधनातून अनेक गोष्टी मांडल्या जात आहेत. या गोष्टी वरवर आकर्षक वाटत असल्या तरी त्याचे दुष्परिणाम खूप आहेत. विज्ञान ही एक शक्ती आहे. मात्र, तिला अनेक मर्यादाही आहेत. त्या समजून घेण्यासाठी विज्ञानकथा उपयुक्त ठरतील, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि ‘सरहद’च्या वतीने घुमानच्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांतर्गत डॉ. नारळीकर यांचे ‘माझे विज्ञानकथा विश्व’ या विषयावर मंगळवारी व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे होते. मंगला नारळीकर, डॉ. माधवी वैद्य, संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला, संजय नहार उपस्थित होते.नारळीकर म्हणाले, ‘‘विज्ञान जर गोष्टीच्या रूपात मांडले गेले तर वाचक विज्ञानाच्या अधिक जवळ पोहोचू शकतील. आजच्या विज्ञानकथा या उद्याच्या वास्तवात परावर्तित होऊ शकतात. एखादी छोटीशी कल्पनाही उत्तम विज्ञानकथा होऊ शकते.’’ प्रास्ताविक माधवी वैद्य यांनी केले. मिलिंद भोई यांनी नारळीकर यांचा परिचय करून दिला.(प्रतिनिधी)विज्ञानकथा निश्चितच उपयुक्त४डॉ. नारळीकर म्हणाले, ‘‘एकविसाव्या युगात विज्ञानाने गरूडझेप घेतली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान हातात हात घालून नव्या स्वरूपात जगासमोर येत आहे. मात्र, त्याची स्थिती एखाद्या बुफे डिनरसारखी झाली आहे. ताटात सगळे भरून घेण्याची आणि ते खाण्याची इच्छा होते; मात्र त्याचे अतिरिक्त सेवन झाल्यास दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. तसेच या दोन्हींचे झाले आहे. कोणताही सारासार विचार न करता त्याला जीवनात प्रवेश दिला जात आहे, ज्यामुळे त्रास वाढत आहे. विज्ञान ही शक्ती असली तरी त्याला अनेक मर्यादा आहेत. त्या ओळखायच्या असतील आणि त्यावर उपाययोजना समजून घ्यायच्या असतील, तर विज्ञानकथा निश्चितच उपयुक्त ठरतील.’’