शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

विज्ञानाच्या मर्यादा ओळखा

By admin | Updated: January 21, 2015 00:46 IST

आज विज्ञान आणि तंत्रज्ञान नवे रूप धारण करून समोर येत आहे. नवनवीन संशोधनातून अनेक गोष्टी मांडल्या जात आहेत.

पुणे : आज विज्ञान आणि तंत्रज्ञान नवे रूप धारण करून समोर येत आहे. नवनवीन संशोधनातून अनेक गोष्टी मांडल्या जात आहेत. या गोष्टी वरवर आकर्षक वाटत असल्या तरी त्याचे दुष्परिणाम खूप आहेत. विज्ञान ही एक शक्ती आहे. मात्र, तिला अनेक मर्यादाही आहेत. त्या समजून घेण्यासाठी विज्ञानकथा उपयुक्त ठरतील, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि ‘सरहद’च्या वतीने घुमानच्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांतर्गत डॉ. नारळीकर यांचे ‘माझे विज्ञानकथा विश्व’ या विषयावर मंगळवारी व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे होते. मंगला नारळीकर, डॉ. माधवी वैद्य, संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला, संजय नहार उपस्थित होते.नारळीकर म्हणाले, ‘‘विज्ञान जर गोष्टीच्या रूपात मांडले गेले तर वाचक विज्ञानाच्या अधिक जवळ पोहोचू शकतील. आजच्या विज्ञानकथा या उद्याच्या वास्तवात परावर्तित होऊ शकतात. एखादी छोटीशी कल्पनाही उत्तम विज्ञानकथा होऊ शकते.’’ प्रास्ताविक माधवी वैद्य यांनी केले. मिलिंद भोई यांनी नारळीकर यांचा परिचय करून दिला.(प्रतिनिधी)विज्ञानकथा निश्चितच उपयुक्त४डॉ. नारळीकर म्हणाले, ‘‘एकविसाव्या युगात विज्ञानाने गरूडझेप घेतली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान हातात हात घालून नव्या स्वरूपात जगासमोर येत आहे. मात्र, त्याची स्थिती एखाद्या बुफे डिनरसारखी झाली आहे. ताटात सगळे भरून घेण्याची आणि ते खाण्याची इच्छा होते; मात्र त्याचे अतिरिक्त सेवन झाल्यास दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. तसेच या दोन्हींचे झाले आहे. कोणताही सारासार विचार न करता त्याला जीवनात प्रवेश दिला जात आहे, ज्यामुळे त्रास वाढत आहे. विज्ञान ही शक्ती असली तरी त्याला अनेक मर्यादा आहेत. त्या ओळखायच्या असतील आणि त्यावर उपाययोजना समजून घ्यायच्या असतील, तर विज्ञानकथा निश्चितच उपयुक्त ठरतील.’’