शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

धायरी गावची ऐतिहासिक अंबाई

By admin | Updated: October 13, 2015 01:16 IST

पुणे परगण्याच्या पश्चिमेकडील सह्याद्रीचा भाग म्हणजे शिवरायांचे बारा मावळे. या बारा मावळांपैकी पुण्याच्या नैर्ऋत्येकडील मावळ हे कर्यात मावळ आणि या कर्यात मावळातील धायरीगाव.

पुणे : पुणे परगण्याच्या पश्चिमेकडील सह्याद्रीचा भाग म्हणजे शिवरायांचे बारा मावळे. या बारा मावळांपैकी पुण्याच्या नैर्ऋत्येकडील मावळ हे कर्यात मावळ आणि या कर्यात मावळातील धायरीगाव. शिवाजीराजांनी धायरी गावाच्या अंबाईची स्थापना केली व धायरीगाव वसवले.सिंहगडाच्या ईशान्येला व पुण्याच्या नैर्ऋत्येला मध्यावर धायरी आहे. महाराजांनी अनेक गड निजामाच्या ताब्यातून घेतले आणि त्या गडांच्या परिसरातील गावे स्वराज्यात घेतली व काही नवीन गावे वसविली, त्यातीलच धायरी हे एक गाव. धायरी गावाचा परिसर ज्या वेळी निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता, तेव्हा आताच्या धायरी गावातील पांडुरंगाच्या मंदिराजवळ मुस्लिमांची वस्ती होती. त्या वेळी या वस्तीला धायटी असे म्हणत, कारण पूर्वी गावांना झाडे व प्राणी यांच्यावरून नावे देत. वडगाव, आंबेगाव, जांभुळवाडी, पिंपरी, चिंचवड तसेच वाघदरा, मोगरवाडी, गाऊडदरा आदी. धायरी परिसरात धायटीची झाडी भरपूर होती म्हणून धायटी हे या वस्तीचे नाव पडले. पुढे धायरी गावाच्या एका सत्पुरुषाने (जैतुजीबाबाने) या वस्तीच्या पूर्वेकडील माळावर शिंगणापूरच्या महादेवाला पाण्याची धार घातली व त्या माळावर तिथे स्वयंभू महादेव प्रगट झाले, हा महादेव पाण्याच्या धारेपासून आला म्हणून तो धारेश्वर व धारेश्वराच्या नावावरून धायटीचे धायरी असे नाव झाले, असे सांगितले जाते.या अंबाईच्या मूर्तीचा पाषाण व प्रतापगडावरील भवानीमातेच्या मूर्तीचा पाषाण तसेच या मूर्तीच्या चेहऱ्याची घडण यात बरेच साम्य आहे. तसेच सिंहगडावरील कोंडाणेश्वराचे मंदिर व पूर्वीचे अंबाईचे मंदिर यांचे बांधकाम तंतोतंत होते. आता नवरात्रीनिमित्त मंदिरात दर वर्षी विविध कार्यक्रम होतात. श्री अंबाईमाता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील, तर रमेश पोकळे उपाध्यक्ष आहेत. कार्याध्यक्ष चंद्रकांत वांजळे, सचिव भाऊ कामठे, खजिनदार बाजीराव चौधरी, तर मदन भोसले, बाळासाहेब कामठे, चंद्रकांत पोकळे, सोपान लायगुडे, हिरामण पोकळे सदस्य आहेत. (प्रतिनिधी)४शिवाजी महाराजांच्या ताब्यात हा परिसर आल्यावर त्यांनी सैन्यातील चार नामवंत अंमलदार या अंबाईच्या दऱ्यात आणले. ४ते चार अंमलदार म्हणजे पवार, रायकर, चव्हाण व लायगुडे. या चौघांना त्यांच्या कुटुंबीयांसह येथे स्थायिक करून येथे माता अंबाईची स्थापना केली व शेजारच्याच दऱ्यात म्हणजे म्हसोबाच्या दऱ्यात एका विहिरीच्या जागेची पूजा केली व तेथे विहीर खोदण्यास सांगितले. ४ही गावची विहीर म्हणजे म्हसोबाची विहीर. या विहिरीजवळच महाराजांनी तत्कालिन धायरी गाव वसवले आणि या चौघा कुटुंबीयांपैकी पवारांना या गावची पाटीलकी दिली. ४हे पवार म्हणजेच आजचे पोकळे पाटील होत. त्यानंतर चव्हाण, पाटील व रायकर यांच्याकडे पोलीस पाटीलकी आली. स्वत: महाराजांनी अंबाईचा दरा, म्हसोबाचा दरा, वेलदरा, कडकाईचा दरा, महलाईचा दरा, सटवाईचा आडसर, कळकाईची बेंद व भैरोबाची घानवड या जमिनी या चौघा कुटुंबीयांना वाटून दिल्या आणि माता अंबाईला या ग्रामवासीयांचे रक्षण कर म्हणून प्रार्थना केली. असं हे धायरी गावचं दैवत ‘माता अंबाई.’