शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

घातक कच:याचा फटका

By admin | Updated: September 3, 2014 00:28 IST

रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लि. या कारखान्यातील दोन वाहनचालकांना उलटय़ा व मळमळ होऊ लागल्याने येथील रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.

शिरूर : रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लि. या कारखान्यातील दोन वाहनचालकांना उलटय़ा व मळमळ होऊ लागल्याने येथील रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. घातक कचरा प्रक्रिया करणा:या या कारखान्यातील ही तिसरी (समजलेली) घटना आहे. घातक द्रव्याच्या संपर्कात आल्याने वायू नाकातोंडात जाऊन हा त्रस होत असून, कारखाना कामगारांच्या सुरक्षेविषयी निष्काळजी असल्याचे अनेकदा आढळून आले आहे.
अरुण भागुजी घुले (वय 3क्) व नानासाहेब तुकाराम सोलाट (3क्) अशी रुग्णालयात दाखल केलेल्या वाहनचालकांची नावे आहेत. हे दोघेही कारखान्याच्या घातक कच:याची वाहतूक करणा:या वाहनांचे चालक म्हणून कामाला आहेत. या कारखान्यात राज्यातील विविध जिल्ह्यांतील औद्योगिक वसाहतींतील कारखान्यातील घातक व इतर कचरा येतो. यात घातक कचरा भस्मीकरण करण्याची प्रक्रिया करणो व इतर जमिनीखाली गाडणो अशा प्रकारचे काम कारखान्याने करणो बंधनकारक आहे. अनेक कारखान्यांचे घातक द्रव्य या कारखान्यात येते. घातक कच:याची अतिदक्षता घेऊन विल्हेवाट लावणो गरजेचे आहे. याचे काम करणा:या कामगारांना हेल्मेट, हातमोजे, मास्क या प्रकारची सुरक्षित उपकरणो पुरविणो कारखान्याला बंधनकारक आहे. मात्र, अशी उपकरणो पुरवली जात नसल्याने कामगारांना त्रस सहन करावा लागत आहे. 
घुले व सोलाट हे राज्यातील विविध औद्योगिक वसाहतींतील कारखान्यांतून घातक व इतर कचरा कारखान्याच्या वाहनातून कारखान्यात आणण्याचे काम करतात. गाडी कारखान्यात आल्यावर कचरा खाली करेर्पयत त्यांना तेथेच थांबावे लागते. आज या दोन वाहनचालकांना उलटय़ा झाल्या. मळमळ होऊन अस्वस्थपणा जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 2क्क्7मध्ये अशाच प्रकारे त्रस झाल्याने या कारखान्यांतील 32 कामगारांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. 8 ते 15 दिवसांच्या उपचारांनंतर या कामगारांना घरी सोडण्यात आले होते.  महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या महिन्याच्या तिस:या आठवडय़ात पाचंगेंना दिलेले बैठकीचे आश्वासनही पाळलेले नाही. या कारखान्याच्या आवारात घातक द्रव्याचे (कचरा) हजारो ड्रम प्रक्रियेविना पडून आहेत. भस्मीकरण प्रक्रियाही बंद आहे. कारखाना आवारात कामगारांना वायुसंसर्ग होऊन एवढा त्रस होत असेल, तर भविष्यात आसपासची गावेही विषारी वायूने प्रभावित होण्याची भिती आहे. (वार्ताहर)
 
42क्1क् मध्ये 12 कामगारांना डोळ्यांचा त्रस झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतरची आजची (समजलेली) घटना आहे. या घटना काही कामगारांकडून माहिती मिळाल्याने समजू शकल्या. अनेक घटना कारखाना व्यवस्थापनाने समजू दिल्या नाहीत. उपचारांनंतर वैद्यकीय अहवालाची प्रतही हे व्यवस्थापन कामगारांना देत नसल्याचे एका कामगाराने सांगितले. या कारखान्याच्या विरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी पर्यावरण मंत्रलयाकडे तक्रार केली असून, याच महिन्याच्या 4 तारखेला त्यांनी कारखाना गेटवर आंदोलनही केले.