शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

गुढी उभारू पाणीबचतीची !

By admin | Updated: April 8, 2016 01:15 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. काही महिने पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. मराठी नववर्षदिनी पाणीबचतीचा संकल्प राबवून पाणीसंकटावर

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. काही महिने पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. मराठी नववर्षदिनी पाणीबचतीचा संकल्प राबवून पाणीसंकटावर मात करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. पुण्यातील अनेक हॉटलमध्ये पाणीबचतीचे मार्ग अवलंबण्यास सुरुवात झाली आहे. ग्राहकांनी साथ दिल्यास त्याला आणखी बळ मिळून दररोज ६७ टॅँकर पाणी वाचविणे शक्य आहे. हॉटेल व्यावसायिकांनी सामाजिक भान जपले असले, तरी ग्राहकांकडूनच त्याला अनेकदा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते. पूर्ण ग्लास पाण्याऐवजी अर्धा ग्लास दिला, तर ग्राहकांना ते उष्टे पाणी वाटते. वेटरला याबाबत बोलले जाते. ग्राहकांच्या मानसिकतेत बदल झाला, तर पाणीबचत होणे शक्य आहे. पुणे शहराची गेल्या दीड दशकात झपाट्याने वाढ झाली आहे. या वाढत्या नागरीकरणामुळे लोकसंख्येने ३५ लखांचा टप्पा ओलांडला असून मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसायही वाढलेला आहे. हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात पाण्यावर अवंलबून असून स्वयंपाक, ग्राहकांना पिण्यासाठी तसेच भांडी धुण्यासाठी, स्वच्छतेसाठी या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. पाण्याची स्थिती समजून घेऊन बचतीची गरज आहे.महापालिकेकडे असलेल्या माहितीनुसार, शहरात सुमारे ४५२ अमृततुल्य आहेत. या ठिकाणी पुणेकरांसह विद्यार्थी तसेच नोकदार वर्गाची गर्दी संपूर्ण दिवसभर असते. या प्रत्येक अमृततुल्यामध्ये दिवसाला सरासरी तीनशे ग्राहक गृहीत धरल्यास शहरात १ लाख ३५ हजार ६०० ग्राहक होतात. या ग्राहकांनी एकदा जरी चुळ भरली तरी त्यासाठी सर्वसाधारणपणे ५० मिलिलिटर पाणी गृहीत धरल्यास ६,७८० लिटर पाणी नुसते गुळणी करण्यासाठी वाया जाते. हे पाणी दिवसाला एका टँकरएवढे आहे. तर, महिन्याला 30 टँकरएवढे आहे. त्यामुळे आलेल्या ग्राहकांना ‘पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे; गुळणीसाठी नाही’ एवढाी सूचना दिली, तरी दररोज एक टँकर पाणी वाचविणे शक्य आहे. महापालिकेकडे असलेल्या नोंदणीनुसार, शहरात २२५७ हॉटेल असून, ती महापालिकेचे पाणी वापरतात. या हॉटेलमध्येही दिवसाला सरासरी ३०० ग्राहक गृहीत धरल्यास सरसरी ६ लाख ७७ हजार १०० ग्राहक शहरातील लहानमोठ्या हॉटेलमध्ये जातात. या वेळी या ग्राहकांना पिण्यासाठी ग्लासमध्ये पाणी दिले जाते.अनेक ग्राहक दिलेले ग्लासभर पाणी पूर्र्ण पीत नाहीत. हे पाणी शिल्लक राहिल्यानंतर हॉटेल व्यावसायिक ते फेकून देतात. प्रत्येक ग्राहकाच्या ग्लासमधून सरासरी १०० मिलि पाणी शिल्लक राहिले, असे गृहीत धरल्यास दिवसाला ६ लाख ७७ हजार १०० लिटर पाणी वाचविणे शक्य आहे. एका टँकरमध्ये सरासरी १० हजार लिटर पाणी मावत असल्याने हे पाणी जवळपास ६७ टँकरएवढे आहे.