शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

गुढी उभारू पाणीबचतीची !

By admin | Updated: April 8, 2016 01:15 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. काही महिने पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. मराठी नववर्षदिनी पाणीबचतीचा संकल्प राबवून पाणीसंकटावर

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. काही महिने पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. मराठी नववर्षदिनी पाणीबचतीचा संकल्प राबवून पाणीसंकटावर मात करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. पुण्यातील अनेक हॉटलमध्ये पाणीबचतीचे मार्ग अवलंबण्यास सुरुवात झाली आहे. ग्राहकांनी साथ दिल्यास त्याला आणखी बळ मिळून दररोज ६७ टॅँकर पाणी वाचविणे शक्य आहे. हॉटेल व्यावसायिकांनी सामाजिक भान जपले असले, तरी ग्राहकांकडूनच त्याला अनेकदा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते. पूर्ण ग्लास पाण्याऐवजी अर्धा ग्लास दिला, तर ग्राहकांना ते उष्टे पाणी वाटते. वेटरला याबाबत बोलले जाते. ग्राहकांच्या मानसिकतेत बदल झाला, तर पाणीबचत होणे शक्य आहे. पुणे शहराची गेल्या दीड दशकात झपाट्याने वाढ झाली आहे. या वाढत्या नागरीकरणामुळे लोकसंख्येने ३५ लखांचा टप्पा ओलांडला असून मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसायही वाढलेला आहे. हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात पाण्यावर अवंलबून असून स्वयंपाक, ग्राहकांना पिण्यासाठी तसेच भांडी धुण्यासाठी, स्वच्छतेसाठी या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. पाण्याची स्थिती समजून घेऊन बचतीची गरज आहे.महापालिकेकडे असलेल्या माहितीनुसार, शहरात सुमारे ४५२ अमृततुल्य आहेत. या ठिकाणी पुणेकरांसह विद्यार्थी तसेच नोकदार वर्गाची गर्दी संपूर्ण दिवसभर असते. या प्रत्येक अमृततुल्यामध्ये दिवसाला सरासरी तीनशे ग्राहक गृहीत धरल्यास शहरात १ लाख ३५ हजार ६०० ग्राहक होतात. या ग्राहकांनी एकदा जरी चुळ भरली तरी त्यासाठी सर्वसाधारणपणे ५० मिलिलिटर पाणी गृहीत धरल्यास ६,७८० लिटर पाणी नुसते गुळणी करण्यासाठी वाया जाते. हे पाणी दिवसाला एका टँकरएवढे आहे. तर, महिन्याला 30 टँकरएवढे आहे. त्यामुळे आलेल्या ग्राहकांना ‘पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे; गुळणीसाठी नाही’ एवढाी सूचना दिली, तरी दररोज एक टँकर पाणी वाचविणे शक्य आहे. महापालिकेकडे असलेल्या नोंदणीनुसार, शहरात २२५७ हॉटेल असून, ती महापालिकेचे पाणी वापरतात. या हॉटेलमध्येही दिवसाला सरासरी ३०० ग्राहक गृहीत धरल्यास सरसरी ६ लाख ७७ हजार १०० ग्राहक शहरातील लहानमोठ्या हॉटेलमध्ये जातात. या वेळी या ग्राहकांना पिण्यासाठी ग्लासमध्ये पाणी दिले जाते.अनेक ग्राहक दिलेले ग्लासभर पाणी पूर्र्ण पीत नाहीत. हे पाणी शिल्लक राहिल्यानंतर हॉटेल व्यावसायिक ते फेकून देतात. प्रत्येक ग्राहकाच्या ग्लासमधून सरासरी १०० मिलि पाणी शिल्लक राहिले, असे गृहीत धरल्यास दिवसाला ६ लाख ७७ हजार १०० लिटर पाणी वाचविणे शक्य आहे. एका टँकरमध्ये सरासरी १० हजार लिटर पाणी मावत असल्याने हे पाणी जवळपास ६७ टँकरएवढे आहे.