शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

दुष्काळग्रस्त शेतकरी पाल्यांचा मोफत विवाह

By admin | Updated: April 3, 2016 03:52 IST

राज्यात दुष्काळाचे भीषण रूप आहे. नापिकीमुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, अशा दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबातील तरुण आणि तरुणींचे मोफत विवाह केले जाणार

पिंपरी : राज्यात दुष्काळाचे भीषण रूप आहे. नापिकीमुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, अशा दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबातील तरुण आणि तरुणींचे मोफत विवाह केले जाणार आहेत. अशा कुटुंबांसह वऱ्हाडी मंडळीचा प्रवास आणि निवास खर्चासह संपूर्ण पोशाख आणि संसारोपयोगी वस्तू भेट दिल्या जाणार आहेत. हा उपक्रम येथील जाणीव फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे राबविण्यात येत आहे.फाउंडेशनतर्फे दर वर्षी बिगरहुंडा सामुदायिक विवाह सोहळा घेतला जातो. सर्वधर्मीय आणि जातींचे वधू-वर सहभागी होतात. शाही थाटात हा सोहळा रंगतो. आकर्षक रथात बॅण्ड, ढोल-ताशे, वाजंत्री, हलगी अशा वाद्यवृंदासह मोठ्या थाटात वराची मिरवणूक काढली जाते. यंदाच्या वर्षी राज्यातील भीषण दुष्काळ परिस्थिती लक्षात घेऊन काही भागातील तरुणींनी विवाह न करण्याचा निर्णय घेतला. वडिलांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने २४ तरुणींनी लग्न न करण्याचे जाहीर केले होते. पैशांअभावी अनेकांनी मुलींचा विवाह रद्द केले आहेत. या परिस्थितीचा विचार करून जाणीव फाउंडेशन कुटुंबांच्या मदतीसाठी सरसावले आहे.विदर्भ, मराठवाडा, खान्देश या दुष्काळग्रस्त भागांतील शेतकरी कुटुंबातील तरुण-तरुणींचाही विवाह या सोहळ्यामध्ये केला जाणार आहे. या वधू-वर आणि वऱ्हाडींचा गावापासून पिंपरी विवाहस्थळापर्यंत ये-जा करण्याचा प्रवास आणि निवासाची व्यवस्था केली जाणार आहे. वधूला दोन साड्या, वरास सफारीचे कापड, तसेच २१ भांड्यांचा संच भेट असणार आहे. हळदी समारंभ, भोजन व्यवस्था केली जाते. सोहळा २४ एप्रिलला आहे. या उपक्रमामुळे दुष्काळग्रस्त भागांतील उपवर मुलींचे विवाह पैशाअभावी रद्द करावे लागणार नाहीत. कर्जबाजारी शेतकरी कुटुंबांवर लग्नाच्या एका पैशाचाही भार पडणार नाही. उलट थाटामाटात शाही पद्धतीने त्यांच्या मुला-मुलीचा विवाह होणार आहे. (प्रतिनिधी)शेतकरी कुटुंबास दिलासावडिलांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने २४ तरुणींनी लग्न न करण्याचे जाहीर केले होते. पैशांअभावी अनेकांनी मुलींचा विवाह रद्द केले आहेत. या परिस्थितीचा विचार करून जाणीव फाउंडेशन अशा शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी सरसावले आहे.