शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त शेतकरी पाल्यांचा मोफत विवाह

By admin | Updated: April 3, 2016 03:52 IST

राज्यात दुष्काळाचे भीषण रूप आहे. नापिकीमुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, अशा दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबातील तरुण आणि तरुणींचे मोफत विवाह केले जाणार

पिंपरी : राज्यात दुष्काळाचे भीषण रूप आहे. नापिकीमुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, अशा दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबातील तरुण आणि तरुणींचे मोफत विवाह केले जाणार आहेत. अशा कुटुंबांसह वऱ्हाडी मंडळीचा प्रवास आणि निवास खर्चासह संपूर्ण पोशाख आणि संसारोपयोगी वस्तू भेट दिल्या जाणार आहेत. हा उपक्रम येथील जाणीव फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे राबविण्यात येत आहे.फाउंडेशनतर्फे दर वर्षी बिगरहुंडा सामुदायिक विवाह सोहळा घेतला जातो. सर्वधर्मीय आणि जातींचे वधू-वर सहभागी होतात. शाही थाटात हा सोहळा रंगतो. आकर्षक रथात बॅण्ड, ढोल-ताशे, वाजंत्री, हलगी अशा वाद्यवृंदासह मोठ्या थाटात वराची मिरवणूक काढली जाते. यंदाच्या वर्षी राज्यातील भीषण दुष्काळ परिस्थिती लक्षात घेऊन काही भागातील तरुणींनी विवाह न करण्याचा निर्णय घेतला. वडिलांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने २४ तरुणींनी लग्न न करण्याचे जाहीर केले होते. पैशांअभावी अनेकांनी मुलींचा विवाह रद्द केले आहेत. या परिस्थितीचा विचार करून जाणीव फाउंडेशन कुटुंबांच्या मदतीसाठी सरसावले आहे.विदर्भ, मराठवाडा, खान्देश या दुष्काळग्रस्त भागांतील शेतकरी कुटुंबातील तरुण-तरुणींचाही विवाह या सोहळ्यामध्ये केला जाणार आहे. या वधू-वर आणि वऱ्हाडींचा गावापासून पिंपरी विवाहस्थळापर्यंत ये-जा करण्याचा प्रवास आणि निवासाची व्यवस्था केली जाणार आहे. वधूला दोन साड्या, वरास सफारीचे कापड, तसेच २१ भांड्यांचा संच भेट असणार आहे. हळदी समारंभ, भोजन व्यवस्था केली जाते. सोहळा २४ एप्रिलला आहे. या उपक्रमामुळे दुष्काळग्रस्त भागांतील उपवर मुलींचे विवाह पैशाअभावी रद्द करावे लागणार नाहीत. कर्जबाजारी शेतकरी कुटुंबांवर लग्नाच्या एका पैशाचाही भार पडणार नाही. उलट थाटामाटात शाही पद्धतीने त्यांच्या मुला-मुलीचा विवाह होणार आहे. (प्रतिनिधी)शेतकरी कुटुंबास दिलासावडिलांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने २४ तरुणींनी लग्न न करण्याचे जाहीर केले होते. पैशांअभावी अनेकांनी मुलींचा विवाह रद्द केले आहेत. या परिस्थितीचा विचार करून जाणीव फाउंडेशन अशा शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी सरसावले आहे.