शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:11 IST

पुणे : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत (वय ९१) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी (दि.१५) निधन झाले. पुण्यातील ...

पुणे : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत (वय ९१) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी (दि.१५) निधन झाले. पुण्यातील बाणेर भागातील राहत्या घरी सकाळी ९ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या (दि.१६) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी जयश्री, कन्या सुजाता आणि राजश्री व मुलगा विश्वजित असा परिवार आहे.

विधी क्षेत्रात सावंत यांचा दरारा होता. परखड पुरोगामी विचारसरणी आणि पुरावाधिष्ठित न्यायनिवाडा या गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांनी न्यायालयीन परिप्रेक्ष्यात स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. पी. बी. सावंत यांचा जन्म ३० जून १९३० रोजी झाला. सावंत यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळविल्यानंतर सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात वकिली सुुरू केली. सन १९७३ मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून तर १९८९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर सहा वर्षे त्यांनी न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले.

न्यायमूर्तीपदाच्या कारकिर्दीत त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सामान्य नागरिकांचा न्यायालयावरील विश्वास अधिक दृढ झाला. त्यांनी न्यायनिवाडा करताना मूल्यांबाबत कधीही तडजोड केली नसल्याचे विधी क्षेत्रातून सांगितले जाते.

चौकट

पी. बी. सावंत यांच्या कारकिर्दीवर दृष्टिक्षेप

-१९९५ मध्ये सेवानिवृत्त झाल्यापासून ते सार्वजनिक कार्यात सक्रिय होते. १९९५ ते २००१ दरम्यान प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. २००२ च्या गुजरात दंगलीची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती व्ही. आर. कृष्णा अय्यर यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय लोकांच्या न्यायाधिकरणावर निवृत्त न्यायमूर्ती सुरेश होसबेट यांच्याबरोबर त्यांनी काम केले. ‘राष्ट्रवादी’चे नेते नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, सुरेश जैन आणि विजयकुमार गावित यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी १ सप्टेंबर २००३ रोजी त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आला. त्यांनी आपला अहवाल फेब्रुवारी २००५ मध्ये सादर केला होता, ज्यात नवाब मलिक, पद्मसिंह पाटील आणि सुरेश जैन यांच्यावर आरोप होते. परंतु, त्यांनी विजयकुमार गावित यांना दोषमुक्त केले होते. यामुळे दोन कॅबिनेट मंत्री सुरेश जैन आणि नवाब मलिक यांना राजीनामा द्यावा लागला होता.

-ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या ट्रस्टमधून त्यांच्याच वाढदिवसासाठी २.३ लाख रुपयांच्या रकमेचा वापर करण्यात आला होता. ट्रस्टच्या पैशांचा वापर हा वैयक्तिक गोष्टींसाठी करता येत नाही, असे सांगून हा ट्रस्टचा भ्रष्टाचार पी. बी. सावंत यांनी समोर आणला. त्यावेळी अण्णा हजारे यांना त्याची कबुली द्यावी लागली.

-‘ग्रामर ऑफ डेमोक्रेसी’ हे त्यांनी लिहिलेले पुस्तक गाजले. या पुस्तकात त्यांनी सामाजिक आणि आर्थिक सुधारणांसाठी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

------------------------------------------------