शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:11 IST

पुणे : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत (वय ९१) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी (दि.१५) निधन झाले. पुण्यातील ...

पुणे : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत (वय ९१) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी (दि.१५) निधन झाले. पुण्यातील बाणेर भागातील राहत्या घरी सकाळी ९ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या (दि.१६) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी जयश्री, कन्या सुजाता आणि राजश्री व मुलगा विश्वजित असा परिवार आहे.

विधी क्षेत्रात सावंत यांचा दरारा होता. परखड पुरोगामी विचारसरणी आणि पुरावाधिष्ठित न्यायनिवाडा या गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांनी न्यायालयीन परिप्रेक्ष्यात स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. पी. बी. सावंत यांचा जन्म ३० जून १९३० रोजी झाला. सावंत यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळविल्यानंतर सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात वकिली सुुरू केली. सन १९७३ मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून तर १९८९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर सहा वर्षे त्यांनी न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले.

न्यायमूर्तीपदाच्या कारकिर्दीत त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सामान्य नागरिकांचा न्यायालयावरील विश्वास अधिक दृढ झाला. त्यांनी न्यायनिवाडा करताना मूल्यांबाबत कधीही तडजोड केली नसल्याचे विधी क्षेत्रातून सांगितले जाते.

चौकट

पी. बी. सावंत यांच्या कारकिर्दीवर दृष्टिक्षेप

-१९९५ मध्ये सेवानिवृत्त झाल्यापासून ते सार्वजनिक कार्यात सक्रिय होते. १९९५ ते २००१ दरम्यान प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. २००२ च्या गुजरात दंगलीची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती व्ही. आर. कृष्णा अय्यर यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय लोकांच्या न्यायाधिकरणावर निवृत्त न्यायमूर्ती सुरेश होसबेट यांच्याबरोबर त्यांनी काम केले. ‘राष्ट्रवादी’चे नेते नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, सुरेश जैन आणि विजयकुमार गावित यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी १ सप्टेंबर २००३ रोजी त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आला. त्यांनी आपला अहवाल फेब्रुवारी २००५ मध्ये सादर केला होता, ज्यात नवाब मलिक, पद्मसिंह पाटील आणि सुरेश जैन यांच्यावर आरोप होते. परंतु, त्यांनी विजयकुमार गावित यांना दोषमुक्त केले होते. यामुळे दोन कॅबिनेट मंत्री सुरेश जैन आणि नवाब मलिक यांना राजीनामा द्यावा लागला होता.

-ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या ट्रस्टमधून त्यांच्याच वाढदिवसासाठी २.३ लाख रुपयांच्या रकमेचा वापर करण्यात आला होता. ट्रस्टच्या पैशांचा वापर हा वैयक्तिक गोष्टींसाठी करता येत नाही, असे सांगून हा ट्रस्टचा भ्रष्टाचार पी. बी. सावंत यांनी समोर आणला. त्यावेळी अण्णा हजारे यांना त्याची कबुली द्यावी लागली.

-‘ग्रामर ऑफ डेमोक्रेसी’ हे त्यांनी लिहिलेले पुस्तक गाजले. या पुस्तकात त्यांनी सामाजिक आणि आर्थिक सुधारणांसाठी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

------------------------------------------------