शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
4
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
5
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
6
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
7
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
8
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
9
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
10
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
11
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
12
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
14
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
15
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
16
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
17
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
18
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
19
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा

आग परवडली, अग्निशमन नको!

By admin | Updated: August 12, 2014 03:56 IST

आग लावायची म्हटली तरी लागणार नाही, अशा इंजिनिअरिंगच्या कंपन्या; पण तरीही अग्निशमन यंत्रणा असल्याचे प्रमाणपत्र सक्तीचे

महेंद्र कांबळे ,बारामती : आग लावायची म्हटली तरी लागणार नाही, अशा इंजिनिअरिंगच्या कंपन्या; पण तरीही अग्निशमन यंत्रणा असल्याचे प्रमाणपत्र सक्तीचे. कदाचित हे जागरुकतेचे चित्र वाटावे. पण यातील गौडबंगाल वेगळेच आहे. केवळ कायदेशीर सोपस्कार पूर्ण करायचा म्हणून २० ते २५ हजार रुपये देऊन अग्निशमन यंत्रणा असल्याचे प्रमाणपत्र मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार बारामती एमआयडीसीत घडत आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीत काही वर्षांपूर्वी एका कंपनीला आग लागली होती. त्यानंतर ‘एमआयडीसी’ने औद्योगिक सुरक्षा या नावाखाली कंपन्यांना अग्निशमन यंत्रणा बंधनकारक केल्या. त्यासाठी एमआयडीसीने खासगी एजन्सीज नेमले आहे. १५ मीटरपेक्षा अधिक उंची असलेल्या कंपन्यांसाठी पुण्यातील हिंजवडी येथील अग्निशमन केंद्रातील अधिकाऱ्यांचा दाखला घेणे आवश्यक आहे. त्यातील इमारतींसाठी स्थानिक एमआयडीसी कार्यालयातील उपअभियंत्यांच्या सहीने दाखला दिला जातो. मात्र, कायदा केला तरी त्याला पळवाटा शोधल्या जातातच, याचा अनुभवही येथे येतो. ‘अग्निशमन’ यंत्रणा उद्योजकांनी कार्यान्वित करावी, यासाठी खासगी ‘एजन्सी’ नेमल्या आहेत. जवळपास २०० ते २५० एजन्सीज कार्यान्वित आहेत. त्यांच्या दाखल्याशिवाय उद्योजकांना कंपनीच्या इमारतींना पूर्णत्वाचा दाखला मिळत नाही. ‘लोकमत’ प्रतिनिधीनेच त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. औद्योगिक वसाहतीतील आपल्या ‘प्लॅँट’साठी यंत्रणा हवी असल्याचे विचारले. तर अग्निशमन यंत्रणा उभारणीसाठी लागणारे साहित्यदेखील आमच्याकडून खरेदी केले, तर प्रमाणपत्र मिळणे अधिक सोपे जाईल. स्थानिक बाजारातून साहित्य आणल्यास त्याला एजन्सी मान्यता देत नाही. मात्र, या एजन्सीकडील साहित्य बाजारभावापेक्षा कितीतरी अधिक किमतीचे असते. बारामतीसारख्या एमआयडीसीमध्ये अग्निशमन एजन्सीने पुण्यात बसूनच २५ ते ३० हजार रुपये आकारणी करून अग्निशमनचा दाखला दिल्याचे उघडकीस आले. काही उद्योजकांनी भविष्यात त्रास नको म्हणून मोकळ्या प्लॉटवरदेखील कंपनी उभारली आहे, असे दाखवून अग्निशमनचा दाखला घेतला आहे. यातूनच अग्निशमन एजन्सीचे लागेबांधे दिसून येते.