शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशामकच्या जवानांना ५ वर्षांत एकदाच गणवेश

By admin | Updated: May 11, 2015 06:27 IST

मुंबई अग्निशामक दलाच्या तुलनेत पुणे अग्निशामक दलातील जवानांना पुरविण्यात आलेले गणवेश अपुरे आणि निकृष्ट दर्जाचे आहेत.

पुणे : मुंबई अग्निशामक दलाच्या तुलनेत पुणे अग्निशामक दलातील जवानांना पुरविण्यात आलेले गणवेश अपुरे आणि निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यामुळे काळबादेवीसारखी आगीची घटना पुण्यात घडल्यास जवानांच्या जीवितास मुंबईपेक्षा कैकपटीने जास्त मोठा धोका पोहचू शकतो, अशी भावना जवानांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. मुंबईमध्ये काळबादेवी येथील एका लाकडी इमारतीला लागलेल्या आगीत दोघा अग्निशामक अधिकाऱ्यांना जीव गमवावा लागला, मुख्य अग्निशामक अधिकाऱ्यांसह सहा जण गंभीर जखमी झाले. एका इमारतीच्या आगीत एवढ्या मोठया प्रमाणात नुकसान पोहोचल्याने राज्यभरातील जवानांना मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर जवानांशी संवाद साधला असता, त्यांनी त्यांना पुरविण्यात आलेल्या निकृष्ट साधनांविषयी मोठी नाराजी व्यक्त केली. महापालिकेने दर वर्षी अग्निशामक जवानांना चांगल्या दर्जाचा गणवेश पुरविणे आवश्यक आहे. पुणे महापालिकेने २०११ मध्ये निविदा प्रक्रिया राबवून नागपूरच्या एका ठेकेदारास गणवेश पुरविण्याचा ठेका दिला. अग्निशामक दलामध्ये ५०० पेक्षा जास्त जवान आहेत, त्यांना एकाच वेळी दोन गणवेशाचे संपूर्ण सेट त्याने पुरविणे आवश्यक होते. मात्र, ठेकेदाराने शर्ट, पँट त्यानंतर कोट, बुट असा सुटा गणवेश पुरविला. त्यामुळे काही जवानांना शर्ट, पँट मिळाली, तर कोट मिळाला नाही. काही जणांना बूट मिळाले, टोपी मिळाली नाही. हा गणवेश पुरविण्यास त्याने दीड-दोन वर्षांचा कालावधी घेतला. वस्तूत: दर वर्षी गणवेश दिला जाणे आवश्यक असताना गेल्या ५ वर्षांत केवळ एकदाच गणवेश पुरविला आहे. जवानांना हेल्मेट अद्याप पुरविण्यात आलेले नाहीत. दुर्घटनेच्यावेळी अशा अपुऱ्या साधनांनिशी जर आग विझविण्यासाठी गेले, तर नक्कीच त्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागू शकेल, अशी भावना जवानांनी व्यक्त केली.फायर एंट्रीसुट अपुरेदुर्घटनेमध्ये फायरएंट्री सुट घातल्याशिवाय जवानांना आत जाता येत नाही, पुणे अग्निशामक दलाकडे केवळ १० ते १३ फायर एंट्रीसुट आहेत. प्रत्येक अग्निशामक केंद्रास एक असे त्याचे वाटप केले आहे. त्याचबरोबर आगीशी सामना करताना आवश्यक असणारे हेल्मेटही पुरविण्यात आलेले नाहीत.ंधोकादायक वाड्यांचा सर्व्हे करणे आवश्यकशहराच्या मध्यवस्तीत अनेक मोडकळीस आलेले जुने वाडे आहेत. बहुतांश वाडे हे लाकडांचे बांधण्यात आले आहेत. या वाड्यांमध्ये आगीची दुर्घटना घडल्यास ती आटोक्यात आणणे खूपच जिकिरीचे ठरू शकते. शहरातील धोकादायक वाड्यांचा सर्व्हे करून त्याचा आढावा घेण्याची आवश्यकता आहे. तसेच वाड्यांमधील इलेक्ट्रिक वायरिंग व्यवस्थित आहे ना, याची तपासणी होणे गरजेचे असल्याचे मत अग्निशामक जवानांनी व्यक्त केले.