शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर विमानतळ झाल्यास शेतकरी उद्ध्वस्त होतील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:11 IST

भुलेश्वर: पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील नव्याने विमानतळासाठी सुचवलेल्या गावात येथील स्थानिक शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे. पुरंदर विमानतळ झाल्यास येथील ...

भुलेश्वर: पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील नव्याने विमानतळासाठी सुचवलेल्या गावात येथील स्थानिक शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे. पुरंदर विमानतळ झाल्यास येथील शेतकरी उद्ध्वस्त होतील यासंदर्भात पुरंदर विमानतळ संघर्ष समितीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निवेदन देऊन विमानतळास विरोध दर्शवला आहे.

नायगाव, पांडेश्वर, राजुरी ,मावडी, पिंपरी, रिसे, पिसे येथील विमानतळासाठी सुचवलेल्या पर्यायी जागेचा असलेल्या विरोधाबाबत दिलेल्या निवेदनात संघर्ष समितीने म्हटले की पुरंदर तालुक्याचे आमदार संजय जगताप विमानतळबाधित गावांमधील लोकांना विश्वासामध्ये न घेता परस्पर विभागीय आयुक्त, महानगर आयुक्त, मुख्य कार्यकारी आयुक्त, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ,महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड व जिल्हाधिकारी पुणे, यांना पत्राद्वारे उल्लेख केलेल्या गावांची नावे पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळास पर्यायी जागा म्हणून सुचवलेली आहेत. प्रसारमाध्यमातून व विविध वर्तमानपत्रांमधून सदर माहिती समोर आली आहे. या गावांमधील रहिवासी शेतकरी आहेत. तसेच पुरंदर उपसा सिंचन योजना व जानाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेचे लाभार्थी शेतकरी आहेत. या भागातील जवळपास ऐंशी टक्के क्षेत्र हे बागायती क्षेत्र आहे. या भागात डाळिंब, सीताफळ, पेरू, अंजीर, फळबागा असून ऊस लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे .त्याचबरोबर कांदा हे या भागाचे मुख्य पीक आहे. तसेच या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर शेततळी निर्माण केलेले आहेत. तसेच दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन हे व्यवसाय जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणावर केला जातो.

शासनाने विमानतळासाठी सदर शेतजमीन बळजबरीने घेतल्यास आम्ही शेतकरी उद्ध्वस्त होऊ. तसेच नवीन सुचवलेल्या पर्यायी जागेपासून जवळच मयुरेश्वर अभयारण्य असल्याने विमानतळासारखा प्रकल्प पर्यायी जागेत झाल्यास त्यांच्या नैसर्गिक अधिवासात धोका निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तसेच सदर जागेवर विमानतळ नको, अशी येथील स्थानिक शेतक-यांची ठाम भूमिका आहे. वरील सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा, अशी मागणी पुरंदर विमानतळ संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश मुळीक, कार्याध्यक्ष उद्धव भगत ,उपाध्यक्ष पंढरीनाथ सोनवणे ,सचिव संतोष कोलते , विमानतळ विरोधी संघर्ष समितीचे असंख्य सदस्य उपस्थित होते.

१४ भुलेश्वर निवेदन

पुरंदर विमानतळासंदर्भात शरद पवार यांना निवेदन देताना संघर्ष समितीचे पदाधिकारी.