शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
3
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
4
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
5
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
6
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
7
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
8
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
9
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
10
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
11
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
12
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
13
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
14
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
15
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
16
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
17
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
18
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
19
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
20
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल

वापरात नसलेली अक्षरे वगळावीत

By admin | Updated: January 11, 2017 03:35 IST

भाषाव्यवहार हा सदैव वादाचा विषय ठरला आहे. भाषेचे आकलन आणि मान्यता एवढाच शुद्धलेखनाचा व्याप आहे. भाषा आपल्याला कळणे, तिचे बहुसंख्य लोकांना आकलन होणे आणि ती लिखित स्वरूपात अवतरणे

पुणे : भाषाव्यवहार हा सदैव वादाचा विषय ठरला आहे. भाषेचे आकलन आणि मान्यता एवढाच शुद्धलेखनाचा व्याप आहे. भाषा आपल्याला कळणे, तिचे बहुसंख्य लोकांना आकलन होणे आणि ती लिखित स्वरूपात अवतरणे असा शुद्धलेखनाचा विचार होऊ शकतो. वर्णमालेतील वापरात नसणाऱ्या अक्षरांचा पुनर्विचार व्हावा आणि उपयोग नसल्यास ही अक्षरे वगळावीत, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी व्यक्त केले.विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्तींसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने सुगम मराठी शुद्धलेखन पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. मसापचे परीक्षा विभागाचे कार्यवाह माधव राजगुरू यांनी ती तयार केली आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन ज्येष्ठ भाषाअभ्यासक डॉ. प्र. ना. परांजपे आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाले. या समारंभाला मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होते. जोशी म्हणाले, ‘प्रत्येक भाषेमध्ये शुद्धलेखनाबाबत शंका असतात. त्यांची चर्चा होऊन सुवर्णमध्य काढला जाणे आवश्यक आहे. पुणे महापालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समितीमध्ये शुद्धलेखन पुस्तिकेबाबतचा मुद्दा चर्चेला घेऊन अनुदान प्राप्त करण्याचा प्रयत्न करून अल्पदरात पुस्तिका अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल.’राजगुरू म्हणाले, ‘भाषाव्यवहार, लेखनव्यवहारामध्ये शुद्धलेखन महत्त्वाचे असते. भाषेबाबत अनेकदा चुकीच्या संकल्पना रूढ असतात. त्यामुळे चुकीचे नियम बरोबर वाटू शकतात. त्यासाठी शुद्धलेखन पुस्तिका मार्गदर्शक ठरू शकते.’