शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

विकास आराखड्याची उत्सुकता शिगेला

By admin | Updated: January 11, 2016 01:39 IST

नगरपालिकेच्या हद्दवाढीतील नवीन विकास आराखड्यात दडलंय काय, याची उत्सुकता बारामतीकरांना लागली आहे. आपल्या भूखंडावर आरक्षण पडेल काय,

बारामती : नगरपालिकेच्या हद्दवाढीतील नवीन विकास आराखड्यात दडलंय काय, याची उत्सुकता बारामतीकरांना लागली आहे. आपल्या भूखंडावर आरक्षण पडेल काय, याची धास्ती आहे. कोट्यवधींच्या मालमत्तेवर टाच येणार नाही ना? अशीच चिंता मिळकतधारकांना लागली आहे. आराखडा नगरपालिकेच्या विशेष सभेत सादर केला जाणार असून त्यानंतर खुला केला जाणार आहे. नगररचनाकार दत्तात्रय काळे यांनी महिनाभरापूर्वी विकास आराखडा नगरपालिकेच्या मंजुरीसाठी बंद लखोट्यात सादर केला. नगराध्यक्ष सुभाष सोमाणी यांनादेखील माहिती नाही, असे त्यांनीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे बंद लखोट्यातील विकास आराखड्यामध्ये दडलंय काय, याची उत्सुकता लागली आहे.बारामती नगरपालिकेची हद्दवाढ २०१२ मध्ये झाली. बारामती ग्रामीण, रुई, तांदूळवाडी, जळोची या गावांचा समावेश हद्दीत करण्यात आला. बारामती नगरपालिकेच्या क्षेत्रफळात जवळपास १० पट वाढ झाली आहे. या हद्दीत आलेल्या गावांमध्ये जागेचे दर मागील १० ते १५ वर्षांत चांगलेच वाढले आहेत. नागरीकरण वेगाने वाढत आहे. त्याच अनुषंगाने बारामतीच्या या हद्दवाढीतील भागातील भूखंडावर सार्वजनिक वापरासाठी आरक्षणे टाकली असतील, तर ती नेमक्या कोणत्या जागांवर आहेत. त्यामुळे कदाचित आपल्याच भूखंडावर आरक्षण पडले तर, सर्वच पाण्यात जाईल, अशी नागरिकांना भीती आहे. स्थानिक राजकीय नेते, पुढारी, व्यापारी, डॉक्टर, वकील, बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात भूखंड खरेदी केले आहेत. पुणे, मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांनी जागा खरेदी केल्या आहेत. त्यामुळे या बड्या मंडळींनादेखील आराखड्याची धास्ती आहे. नगररचना खात्याचे नगररचनाकार दत्तात्रय काळे यांनी यापूर्वीच स्पष्ट केल्याप्रमाणे नगरपालिकेत आराखडा सादर केल्यानंतर शासनाला अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्याचदरम्यान, नागरिकांच्या हरकती, सूचनादेखील घेतल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)1विशेषत: रुई, जळोची या भागात वेगाने नागरीकरण झाले. मोठमोठ्या टाऊनशिप या भागात वेगाने उभ्या राहिल्या आहेत. गुंठ्याचे दर वाढले. त्यामुळे वर्षानुवर्षे पाण्याअभावी पडून असलेल्या भूखंडाला सोन्याचे भाव आले. जमीनमालक मालामाल झाले. त्यातच २००६ पासून वाढलेल्या जागेच्या दराचा फायदा जमीन खरेदी-विक्री व्यवसायातील दलालांना झाला. जमीनमालकांबरोबर दलालदेखील मालामाल झाले. आता मागील दोन वर्षांपासून आर्थिक मंदीचे सावट असले तरी या भागातील जमिनींचे दर कमी झालेले नाहीत. त्यामुळे विकास आराखड्यातील आरक्षणे कोणाच्या भूखंडावर बालंट आणणार, याची उत्सुकता आहे. 2हद्दवाढ होण्यापूर्वी बारामती शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा सादर करण्यात आला होता. त्या वेळी आजी-माजी नगरसेवकांसह, अनेक बड्या हस्तींच्या भूखंडावर आरक्षणे पडली. त्यामुळे मोठा गदारोळ झाला होता. नागरिकांच्या हरकती व सूचनांनंतर आराखड्यात काही बदल केले, नगरसेवकांनी त्यांच्या भूखंडावरील आरक्षणे रद्द करून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. याच पार्श्वभूमीवर नव्या हद्दीतील विकास आराखड्याकडे लक्ष लागले आहे.