शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
2
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
3
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
4
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
5
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
6
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
7
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
8
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
9
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
10
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
11
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
12
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
13
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
14
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
15
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
16
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
17
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
18
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
19
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
20
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

विकास आराखड्याची उत्सुकता शिगेला

By admin | Updated: January 11, 2016 01:39 IST

नगरपालिकेच्या हद्दवाढीतील नवीन विकास आराखड्यात दडलंय काय, याची उत्सुकता बारामतीकरांना लागली आहे. आपल्या भूखंडावर आरक्षण पडेल काय,

बारामती : नगरपालिकेच्या हद्दवाढीतील नवीन विकास आराखड्यात दडलंय काय, याची उत्सुकता बारामतीकरांना लागली आहे. आपल्या भूखंडावर आरक्षण पडेल काय, याची धास्ती आहे. कोट्यवधींच्या मालमत्तेवर टाच येणार नाही ना? अशीच चिंता मिळकतधारकांना लागली आहे. आराखडा नगरपालिकेच्या विशेष सभेत सादर केला जाणार असून त्यानंतर खुला केला जाणार आहे. नगररचनाकार दत्तात्रय काळे यांनी महिनाभरापूर्वी विकास आराखडा नगरपालिकेच्या मंजुरीसाठी बंद लखोट्यात सादर केला. नगराध्यक्ष सुभाष सोमाणी यांनादेखील माहिती नाही, असे त्यांनीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे बंद लखोट्यातील विकास आराखड्यामध्ये दडलंय काय, याची उत्सुकता लागली आहे.बारामती नगरपालिकेची हद्दवाढ २०१२ मध्ये झाली. बारामती ग्रामीण, रुई, तांदूळवाडी, जळोची या गावांचा समावेश हद्दीत करण्यात आला. बारामती नगरपालिकेच्या क्षेत्रफळात जवळपास १० पट वाढ झाली आहे. या हद्दीत आलेल्या गावांमध्ये जागेचे दर मागील १० ते १५ वर्षांत चांगलेच वाढले आहेत. नागरीकरण वेगाने वाढत आहे. त्याच अनुषंगाने बारामतीच्या या हद्दवाढीतील भागातील भूखंडावर सार्वजनिक वापरासाठी आरक्षणे टाकली असतील, तर ती नेमक्या कोणत्या जागांवर आहेत. त्यामुळे कदाचित आपल्याच भूखंडावर आरक्षण पडले तर, सर्वच पाण्यात जाईल, अशी नागरिकांना भीती आहे. स्थानिक राजकीय नेते, पुढारी, व्यापारी, डॉक्टर, वकील, बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात भूखंड खरेदी केले आहेत. पुणे, मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांनी जागा खरेदी केल्या आहेत. त्यामुळे या बड्या मंडळींनादेखील आराखड्याची धास्ती आहे. नगररचना खात्याचे नगररचनाकार दत्तात्रय काळे यांनी यापूर्वीच स्पष्ट केल्याप्रमाणे नगरपालिकेत आराखडा सादर केल्यानंतर शासनाला अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्याचदरम्यान, नागरिकांच्या हरकती, सूचनादेखील घेतल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)1विशेषत: रुई, जळोची या भागात वेगाने नागरीकरण झाले. मोठमोठ्या टाऊनशिप या भागात वेगाने उभ्या राहिल्या आहेत. गुंठ्याचे दर वाढले. त्यामुळे वर्षानुवर्षे पाण्याअभावी पडून असलेल्या भूखंडाला सोन्याचे भाव आले. जमीनमालक मालामाल झाले. त्यातच २००६ पासून वाढलेल्या जागेच्या दराचा फायदा जमीन खरेदी-विक्री व्यवसायातील दलालांना झाला. जमीनमालकांबरोबर दलालदेखील मालामाल झाले. आता मागील दोन वर्षांपासून आर्थिक मंदीचे सावट असले तरी या भागातील जमिनींचे दर कमी झालेले नाहीत. त्यामुळे विकास आराखड्यातील आरक्षणे कोणाच्या भूखंडावर बालंट आणणार, याची उत्सुकता आहे. 2हद्दवाढ होण्यापूर्वी बारामती शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा सादर करण्यात आला होता. त्या वेळी आजी-माजी नगरसेवकांसह, अनेक बड्या हस्तींच्या भूखंडावर आरक्षणे पडली. त्यामुळे मोठा गदारोळ झाला होता. नागरिकांच्या हरकती व सूचनांनंतर आराखड्यात काही बदल केले, नगरसेवकांनी त्यांच्या भूखंडावरील आरक्षणे रद्द करून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. याच पार्श्वभूमीवर नव्या हद्दीतील विकास आराखड्याकडे लक्ष लागले आहे.