शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
4
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
5
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
6
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
7
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
8
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
9
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
10
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
11
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
12
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
13
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
14
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
15
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
16
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
18
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
19
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
20
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार

बालवैज्ञानिकांना प्रोत्साहन गरजेचे

By admin | Updated: December 28, 2016 04:24 IST

मानवाच्या विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण संशोधनासाठी एकत्रित पावले उचलली पाहिजेत. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत स्वबळावर वेगाने वाटचाल

बारामती : मानवाच्या विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण संशोधनासाठी एकत्रित पावले उचलली पाहिजेत. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत स्वबळावर वेगाने वाटचाल करीत आहे, ही बाब समाधानाची आहे. संशोधनाच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या पुढच्या काळात बालवैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केले. बारामती येथे विद्या प्रतिष्ठान माहिती तंत्रज्ञान, केंद्रीय विज्ञान, तंत्रज्ञान विभागाच्या संयुक्त विद्यमाने २४ व्या राष्ट्रीय बाल विज्ञान कॉग्रेसचे उदघाटन डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अ‍ॅड. ए. व्ही. प्रभुणे, टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, माहिती, तंत्रज्ञान विभागाचे डॉ. अमोल गोजे आदी उपस्थित होते.पाच दिवस चालणाऱ्या या परिषदेत देशभरातील, तसेच आशियाई, आखाती देशांचे जवळपास ७०० बालवैज्ञानिक सहभागी झाले आहेत. डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, विज्ञान प्रदर्शनामधून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान तंत्रज्ञानाची आवड निर्माण होते. आजच्या विद्यार्थ्यांमध्येच उद्याच्या उज्ज्वल भारताचे भवितव्य घडविणारे विद्यार्थी लपले आहेत. विज्ञानाला चांगले भवितव्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील तरुणांच्या पात्रतेबाबत आत्मविश्वास आहे. त्यातूनच युवकांसाठी स्टार्ट अप, स्टॅण्ड अप इंडियासारखे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. या वेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार म्हणाले की, विद्या प्रतिष्ठानच्या वतीने बारामतीमध्ये कायमस्वरूपी ‘सायन्स पार्क’ उभारण्यात येणार आहे. या वेळी टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी प्रास्ताविक केले. या वेळी माजी नगराध्यक्ष योगेश जगताप, नवनिर्वाचित नगराध्यक्षा पौर्णिमा जगताप, अभियंता सुजीत बॅनर्जी, वरिष्ठ शास्त्रज्ञ मिलिंद कुलकर्णी, टी. पी. रघुनाथ, अ‍ॅड. निलीमा गुजर, सचिव द. रा. उंडे आदी उपस्थित होते. विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अ‍ॅड ए. व्ही. प्रभुणे यांनी आभार मानले....रोबोटने केले स्वागत२४ व्या राष्ट्रीय बालविज्ञान प्रदर्शन उदघाटनाच्या वेळी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ हर्ष वर्धन यांचे रोबोट ने पुष्पगुच्छ देउन स्वागत केले. तसेच, डॉ वर्धन यांना ‘सॅल्युट’ देखील केला. या आगळ्या वेगळ्या स्वागताने डॉ वर्धन भारावले. खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत भाषणादरम्यान माहिती दिली.परदेशी बालवैज्ञानिक बालवैज्ञानिकांचे भीत्तिपत्रक सादरीकरण, खाऊगल्ली, वैज्ञानिक प्रयोग, रॉकेट तंत्रज्ञान, विमान, रोबोट प्रदर्शन, सर्प दर्शन आकर्षण ठरत आहे. व्हीएतनाम, कुवेत, कतार आदी देशांतून १९ बालवैज्ञानिक देखील सहभागी झाले आहेत. नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांशी व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधण्याची संधी बालवैज्ञानिकांना मिळणार आहे.