शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्याचा आत्मविश्वास टिकविण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:09 IST

तशातच पदरी दोन मुलं, त्यांचाही खर्च. महामारीमुळे गेल्या वर्षी शाळा बंद, अध्ययन बंद, अध्यापन बंद, ऑनलाईन शिक्षण सुरू होते. ...

तशातच पदरी दोन मुलं, त्यांचाही खर्च. महामारीमुळे गेल्या वर्षी शाळा बंद, अध्ययन बंद, अध्यापन बंद, ऑनलाईन शिक्षण सुरू होते. पण, तो काही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा अंतिम मार्ग नव्हे. एखाद्या विषयाचा मूलभूत घटक पूर्णपणे समजल्याशिवाय त्या घटकाचे प्रगत ज्ञान वरिष्ठ गटातील मुलांना सुद्धा ऑनलाईन समजणार नाही. त्याची बैाद्धिक पातळी कितीही प्रगल्भ असला, तरी तो पारंगत होणे कठीणच.

वर्गामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील आंतरक्रिया अध्ययन अनुभवासाठी फार गरजेच्या असतात. खासगी शिकवणी किंवा ऑनलाईन शिक्षण कोणत्या विद्यार्थ्याला मिळते याचे काही सर्वेक्षण झाले का? राज्यामध्ये ७० टक़्के विद्यार्थी हा ग्रामीण भागात आहे. १ ली ते १२ वी पर्यंतच्या किती विद्यार्थ्यांना ऑनलाइन किंवा खासगी शिकवणीतून शिक्षण मिळाले? याची पाहणी करायला हवी. खासगी शिकवणीचे वर्गही बंदच होते. इ. ९ वीचा आणि इ.१० वीचा विद्यार्थी तर बहिस्थ: विद्यार्थीच झाला आहे. १ ली ते ८ वीपर्यंत अंतर्गत मूल्यमापनातूनच तो शिक्षण हक्क कायद्यानुसार वर्गोन्नत होतो. इ. ९ वी आणि १० वी मध्ये त्याचे खऱ्या अर्थाने मूल्यमापन होते. (प्रचलित नियमानुसार). याचा खऱ्या अर्थाने गांभीर्याने विचार करायला कोरोनाने आपल्याला भाग पाडले असे म्हटल्यास वावगे करणार नाही.

इ. ९ वीच्या वर्गापासूनच इ. १० वीच्या म्हणजेच एस. एस. सी.च्या सार्वजनिक परीक्षेची तयारी शाळांमधून करून घेतली जाते. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्येसुद्धा इ. १० वी चे वर्ग चालू असतात. पालक आणि विद्यार्थीही या बाबतीत गंभीर असतात. कारण, या सार्वजिनक परीक्षेमध्ये आपला विद्यार्थी अथवा पाल्य चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावा, ही मनीषा बाळगूनच सर्वजण काम करत असतात. काहींना पुढील करिअर घडवण्यासाठी कला/वाणिज्य/विज्ञान/शास्त्रामधून उच्च शिक्षण घ्यावयाचे असते. काहींना १० वीनंतर अल्पमुदतीचे कोर्स करून मिळवते व्हायचे असते, तर काहींना एखादी पदवीका पूर्ण करून स्वावलंबी व्हायचे असते. याचाच अर्थ असा की, विद्यार्थ्याच्या जीवनातील चांगल्या वाटा शोधण्याचे मार्ग एस.एस.सी.नंतर सापडत असतात. त्याची खरी बुद्धिमत्ता / गुणवत्ता याच टप्प्यावर ज्याला कळू शकते. त्याचा आत्मविश्वास वाढायला मदत होते. हा एक प्रकारचा पाैगंडावस्था आणि कुमारावस्था यातील संघर्ष असतो. त्याच्या मनाची परिपक्वता होत असताना त्याच्या आत्मविश्वासाचे बळ मिळत असते. ते याच वयात, याच टप्प्यावर.

मात्र, या वर्षी महामारीचे दुर्दैव पुन्हा आडवे आले. विद्यार्थ्याची शिक्षण प्रक्रियाच थंडावली, नाही गोठली गेली. त्यांचे भवितव्य अंधारमय वाटायला लागले. हे केवळ काही आपल्या राज्यापुरतेच मर्यादित आहे, असे नाही तर संबंध देशभर हीच स्थिती थोड्याफार फरकाने आहे. त्यामुळे हा विद्यार्थी आत्मविश्वास गमावून बसतो की काय? अशी भीती वाटते. भविष्यात महामारीच्या संकटातूनही पुढे जाणाऱ्या आणि करिअर घडवलेल्या विद्यार्थ्यांचा तर शिक्षणतज्ज्ञांना अभ्यासाचा विषय होईलच. पण आत्मविश्वास गमावून बसलेल्या आणि करिअर घडवलेल्या विद्यार्थ्यांचा तर शिक्षणतज्ज्ञांना अभ्यासाचा विषय होईलच. पण आत्मविश्वास गमावून बसलेल्या आणि करिअर उज्ज्वल न करू शकलेल्या विद्यार्थ्याचे काय? नुकसान झाले, त्यांचा जीवनपट कसा राहील याचेही चिंतन करावे लागेल.

अशा परिस्थितीतसुद्धा शासनाने महत्त्वाच्या इ. ९ वी आणि १० वीच्या अंतर्गत मूल्यमापनावरून एस.एस.सी.चा अंतिम निकाल जो चांगलाच असेल, देण्याचा निर्णय सर्वसमावेशक वाटतो. परंतु हेच विद्यार्थी पुढे ज्या ज्या शाखेत जातील त्या त्या शाखेमध्ये इ. १० वी अभ्यासक्रमाची उजळणी होण्यासाठी त्यांना पूर्वतयारी म्हणून नियमित वर्गात करून घ्यावी लागेल. कारण, त्यांना जे संबोध स्पष्टपणे समजलेले नाहीत ते समजून दिल्यास त्यांचा पुढचा शैक्षणिक प्रवास सोपा होण्यास मदत होईल. शिवाय, त्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून निघण्यास मदत होऊ शकेल.

-महावीर माने

माजी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य