शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
4
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
5
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
6
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
7
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
8
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
9
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
10
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
11
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
12
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
13
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
14
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
15
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
16
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
17
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
18
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
19
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
20
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बीआरटीला माजी सैनिकांची ‘बॉर्डर’

By admin | Updated: March 7, 2015 00:08 IST

शहरातील बीआरटीएस (बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम) मार्गातील इतर वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) माजी सैनिकांना तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे : शहरातील बीआरटीएस (बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम) मार्गातील इतर वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) माजी सैनिकांना तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील विविध बीआरटी मार्गावर हे माजी सैनिक वॉर्डन म्हणून काम करताना, या मार्गावर इतर वाहनांना येण्यास मज्जाव करतील. त्यासाठी सुमारे २०० माजी सैनिक नियुक्त केले जाणार आहेत.शहरातील सार्वजनिक बस वाहतूक अधिक वेगाने व्हावी, या उद्देशाने पहिल्या टप्प्यात स्वारगेट ते कात्रज व स्वारगेट ते हडपसर या मार्गावर बीआरटी सेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर अन्य काही महत्त्वाच्या रस्त्यांवर बीआरटी मार्ग तयार करण्यात आले. मात्र, या मार्गासाठी आवश्यक नियोजन न केल्याने या मार्गाचा बोजवारा उडाला. हे मार्ग चौकाचौकात तोडण्यात आल्याने इतर वाहनांची घुसघोरी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे जीवघेणे अपघातही झाले आहेत. ‘इंटिलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम’ (आयटीएमएस) न उभारता बसवाहतूक सुरू असल्याने बीआरटी सेवा कोलमडली आहे. आता पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांनी ‘आयटीएमएस’साठी पीएमपीला पैसे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.याबाबत अधिक माहिती देताना पीएमपीचे प्रभारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी म्हणाले, की आयटीएमएसचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार बीआरटी मार्ग परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. अनेक ठिकाणी हा मार्ग अर्धवट आहे. त्यामुळे दुचाकींसह चारचाकी वाहने या मार्गात घुसतात. त्यामुळे बसला अडथळा निर्माण होतो.याचा विचार करून या मार्गावर अशा ठिकाणी माजी सैनिक नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे माजी सैनिक वॉर्डन म्हणून काम करतील. केवळ इतर वाहनांना बीआरटी मार्गात प्रवेश करू न देण्याची त्यांची जबाबदारी असेल. असे सुमारे २२० वॉर्डन नियुक्त केले जातील. दोन्ही पालिका त्यांच्या वेतनाची जबाबदारी उचलतील. याबाबत प्राथमिक चर्चा झाली असून, लवकरच ही नियुक्ती केली जाईल, असे डॉ. परदेशी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)ताफ्यातील किमान ८० टक्के बस मार्गावर आणण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांमुळे मार्गावरील बसेसची संख्या १६०० च्या घरात गेली आहे. मात्र बस वाढूनही चालक व वाहकांची कमतरता जाणवू लागल्याने त्यांच्याअभावी बस आगारातच उभ्या कराव्या लागतात. ही स्थिती सुधारण्यासाठी केवळ गर्दीच्या वेळी अधिक बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिली. साधारणत: सकाळी ८ ते १२ आणि दुपारी ४ ते ८ या वेळेत शहरात बससाठी अधिक गर्दी असते. याच वेळेत संबंधित मार्गांवर १५५० बस सोडल्या जातील तर इतर वेळेत मार्गावर सुमारे ११०० बस असतील. त्यामुळे चालक व वाहकांना वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करणे शक्य होईल. जेणेकरून चालक व वाहकांची कमतरता जाणवणार नाही, असे डॉ. परदेशी यांनी स्पष्ट केले.