शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

बीआरटीला माजी सैनिकांची ‘बॉर्डर’

By admin | Updated: March 7, 2015 00:08 IST

शहरातील बीआरटीएस (बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम) मार्गातील इतर वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) माजी सैनिकांना तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे : शहरातील बीआरटीएस (बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम) मार्गातील इतर वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) माजी सैनिकांना तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील विविध बीआरटी मार्गावर हे माजी सैनिक वॉर्डन म्हणून काम करताना, या मार्गावर इतर वाहनांना येण्यास मज्जाव करतील. त्यासाठी सुमारे २०० माजी सैनिक नियुक्त केले जाणार आहेत.शहरातील सार्वजनिक बस वाहतूक अधिक वेगाने व्हावी, या उद्देशाने पहिल्या टप्प्यात स्वारगेट ते कात्रज व स्वारगेट ते हडपसर या मार्गावर बीआरटी सेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर अन्य काही महत्त्वाच्या रस्त्यांवर बीआरटी मार्ग तयार करण्यात आले. मात्र, या मार्गासाठी आवश्यक नियोजन न केल्याने या मार्गाचा बोजवारा उडाला. हे मार्ग चौकाचौकात तोडण्यात आल्याने इतर वाहनांची घुसघोरी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे जीवघेणे अपघातही झाले आहेत. ‘इंटिलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम’ (आयटीएमएस) न उभारता बसवाहतूक सुरू असल्याने बीआरटी सेवा कोलमडली आहे. आता पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांनी ‘आयटीएमएस’साठी पीएमपीला पैसे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.याबाबत अधिक माहिती देताना पीएमपीचे प्रभारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी म्हणाले, की आयटीएमएसचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार बीआरटी मार्ग परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. अनेक ठिकाणी हा मार्ग अर्धवट आहे. त्यामुळे दुचाकींसह चारचाकी वाहने या मार्गात घुसतात. त्यामुळे बसला अडथळा निर्माण होतो.याचा विचार करून या मार्गावर अशा ठिकाणी माजी सैनिक नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे माजी सैनिक वॉर्डन म्हणून काम करतील. केवळ इतर वाहनांना बीआरटी मार्गात प्रवेश करू न देण्याची त्यांची जबाबदारी असेल. असे सुमारे २२० वॉर्डन नियुक्त केले जातील. दोन्ही पालिका त्यांच्या वेतनाची जबाबदारी उचलतील. याबाबत प्राथमिक चर्चा झाली असून, लवकरच ही नियुक्ती केली जाईल, असे डॉ. परदेशी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)ताफ्यातील किमान ८० टक्के बस मार्गावर आणण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांमुळे मार्गावरील बसेसची संख्या १६०० च्या घरात गेली आहे. मात्र बस वाढूनही चालक व वाहकांची कमतरता जाणवू लागल्याने त्यांच्याअभावी बस आगारातच उभ्या कराव्या लागतात. ही स्थिती सुधारण्यासाठी केवळ गर्दीच्या वेळी अधिक बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिली. साधारणत: सकाळी ८ ते १२ आणि दुपारी ४ ते ८ या वेळेत शहरात बससाठी अधिक गर्दी असते. याच वेळेत संबंधित मार्गांवर १५५० बस सोडल्या जातील तर इतर वेळेत मार्गावर सुमारे ११०० बस असतील. त्यामुळे चालक व वाहकांना वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करणे शक्य होईल. जेणेकरून चालक व वाहकांची कमतरता जाणवणार नाही, असे डॉ. परदेशी यांनी स्पष्ट केले.