शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

ऊस जाळल्याप्रकरणी दोघांना अटक

By admin | Updated: April 3, 2016 03:52 IST

निघोटवाडी (ता. आंबेगाव) येथील साडेआठ एकर क्षेत्रांतील ऊस जाळून टाकल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. उसाचे पाचट पेटवल्यानंतर आग लागून शेजारील शेतातील सर्व ऊस

मंचर : निघोटवाडी (ता. आंबेगाव) येथील साडेआठ एकर क्षेत्रांतील ऊस जाळून टाकल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. उसाचे पाचट पेटवल्यानंतर आग लागून शेजारील शेतातील सर्व ऊस जळून खाक झाला. या प्रकरणी बाळू लक्ष्मण निघोट व प्रकाश नारायण निघोट (दोघे रा. निघोटवाडी) यांच्याविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आगीत शेतकऱ्यांचे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मध्यरात्री आगीची घटना घडली.संजय वामनराव बाणखेले यांनी मंचर पोलिसांत फिर्याद दिली. निघोटवाडी गावच्या हद्दीत वडगाव रस्त्यालगत बाणखेले यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी उसाचे पिक घेतले असून परिसरातील काही शेतकऱ्यांची ऊसतोडणी सुरू आहे. बाळू लक्ष्मण निघोट व प्रकाश नारायण निघोट यांनी समीर निघोट व रावसाहेब महादेव दैने यांची शेती खंडाने घेतली आहे. या शेतातील उसाचे पाचट बाळू निघोट व प्रकाश निघोट यांनी पेटवून दिले. इतर लोकांच्या पिकांचे जळून नुकसान होईल, याची जाणीव असतानाही दोघांनी पाचट पेटवून दिले. त्यामुळे शेजारील उसाला आग लागली. पाचट पेटवून देत असताना बाळू निघोट, प्रकाश निघोट यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता ते पळून गेले.संजय बाणखेले यांच्या साडेतीन एकर क्षेत्रांतील ऊस जळून साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. महादू विठ्ठल निघोट यांचा जमीन गट नं. ३४२ मधील दोन एकर ऊस जळाला. त्यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जानकीराम मारुती निघोट व पांडुरंग मारुती निघोट यांचा प्रत्येकी एक एकर ऊस जळून प्रत्येकी एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वसंत बापूराव निघोट यांचा जमीन गट नं. ३४३ व ३०७ मधील दोन एकर ऊस जळाला. त्यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीत साडेआठ एकर क्षेत्रांतील ऊस जळून सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.आगीच्या ज्वाळा शेजारील द्राक्षाच्या बागेपर्यंत गेल्या. त्यात द्राक्षाच्या काही झाडांचे नुकसान झाले आहे.