शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची रणनीती झाली यशस्वी

By admin | Updated: February 24, 2017 03:14 IST

महापालिकेमध्ये भाजपाने निर्विवाद वर्चस्व प्राप्त करून, स्वबळावर बहुमत मिळविण्याचा शब्द खरा ठरविला आहे

पुणे : महापालिकेमध्ये भाजपाने निर्विवाद वर्चस्व प्राप्त करून, स्वबळावर बहुमत मिळविण्याचा शब्द खरा ठरविला आहे. भारतीय जनता पक्षाने आखलेली रणनीती यशस्वी ठरली असून, निवडणुकीच्या काळातील भाजपासंदर्भातील वाद-विवाद, आरोप-प्रत्यारोपांना मतदारांनी काडीचीही किंमत दिलेली नाही. २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाला २६ जागा मिळालेल्या होत्या. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाले. त्यानंतर महापालिकेवरही भाजपाचा झेंडा रोवायचा निर्धार भाजपाच्या वतीने करण्यात आला. निवडणुकीच्या काही महिने अगोदर खासदार संजय काकडे भाजपामध्ये सक्रिय झाले. त्याचबरोबर पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह ८ ही आमदार महापालिकेत सत्ता मिळविण्याच्या दिशेने नियोजन आखत होते. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: यामध्ये लक्ष घातले होते.निवडणुकीला ६ महिने बाकी असताना भाजपाकडून प्रत्येक प्रभागाचा सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये ए, बी, सी व डी अशी जागांची वर्गवारी करण्यात आली. जिथे भाजपाचे नगरसेवक सहजपणे विजयी होतील त्या जागांना ए, थोडीशी लढत द्यावी लागेल त्या बी, अवघड असलेल्या सी व निवडून न येऊ शकणाऱ्या डी असा तक्ता तयार करण्यात आला. त्यानंतर सी व डी जागा जिंकण्यासाठी भाजपाकडून विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. विशेषत: उपनगरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असल्याचे सर्व्हेमध्ये दिसून आले होते. संजय काकडे यांच्या पुढाकारातून भाजपा कमकुवत असलेल्या ठिकाणी इतर पक्षांमधून आजी व माजी नगरसेवकांना पक्षात घेण्याचा धडाका लावण्यात आला. त्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनीही काहीजणांना पक्षात घेतले. यामुळे संपूर्ण शहरात भाजपाची जोरदार वातावरण निर्मिती झाली. भाजपाकडे उमेदवारी मागण्यासाठी १६२ जागांकरिता एक हजारपेक्षा जास्त इच्छुकांनी अर्ज केले. त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायची, असा प्रश्न भाजपासमोर उभा होता. उमेदवारी यादी निवड करण्यासाठी भाजपाच्या कार्ड कमिटी सदस्यांना मोठी कसरत करावी लागली. उमेदवारी देण्यावरून मोठी नाराजी पक्षात निर्माण झाली होती; मात्र निवडून येण्याच्या क्षमतेनुसार उमेदवारी देण्यात आल्याचा फायदा भाजपाला झाला. (प्रतिनिधी)हजारी याद्यांची यंत्रणा यशस्वीभाजपाने प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी हजारी भाग प्रमुखांची नेमणूक करून त्यांना विशेष प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षण शिबिरामध्ये तब्बल २७०० जणांनी सहभाग घेतला. या हजारी भाग प्रमुखांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे.विजयासाठी या ठरल्या महत्त्वाच्या बाबी१ चार सदस्यीय प्रभाग पद्धत.२ आजी-माजी नगरसेवकांसह अनेक मातब्बरांना पक्षात प्रवेश देऊन पक्षाला बळकटी.३ मेट्रो, जायका प्रकल्प, विकास आराखडा यांना मंजुरी.४ शिस्तबद्ध प्रचार यंत्रणा.५ केंद्रीय मंत्री मनोहर पर्रिकर, व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा झंझावाती प्रचार.६ प्रत्येक टप्प्यावर सर्व्हे करून व्यूहरचनेत बदल.