शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

भीमा नदीपात्र पडले कोरडे; दौंड पूर्व भागातील पशुधन जगवणे कठीण

By admin | Updated: May 22, 2016 00:45 IST

दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भीमा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत पडल्याने परिसरातील पाटेठाण, टाकळी भीमा, पानवली, वडगाव बांडे, कोरेगाव भिवर, आलेगाव या नदीच्या काठावर

पाटेठाण : दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भीमा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत पडल्याने परिसरातील पाटेठाण, टाकळी भीमा, पानवली, वडगाव बांडे, कोरेगाव भिवर, आलेगाव या नदीच्या काठावर असलेल्या गावांत जनावरांना, तसेच पिण्याच्या पाण्यासंदर्भात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या भीमा नदीच्या काठावरील असलेल्या शेतातील हिरवीगार पिकेदेखील पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर असून, काही करा परंतु धरणाच्या उपलब्ध पाणी साठ्यामधून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.भीमा नदीच्या पाण्यावर दौंड व शिरूर व हवेली या तालुक्यातील पेरणे, पिंपरी सांडस, विठ्ठलवाडी, पाटेठाण, मेमाणवाडी, टाकळी भीमा, अरणगाव, पानवली, वडगाव बांडे, कोरेगाव भिवर, आलेगाव पागा या गावांसह अनेक गावे शेतीसाठी अवलंबून आहेत. नदीची पाणीपातळी तळाला गेली असून, कृषिपंप नदीच्या मध्यावर नेऊनदेखील नदी कोरडी ठणठणीत पडल्याने काहीच उपयोग होत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या परिसरातील उभी पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. काही ठिकाणी शिल्लक राहिलेल्या नदीचा खोलगट भाग व झरे यामधून शेतकरी पाणी नेऊन पिके जगवण्याची धडपड करताना दिसून येत आहे.भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने या परिसरात शेतीच्या पाण्याबरोबरच जनावरांना, तसेच पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाऊस होईल तोपर्यंत एखादे आर्वतन सोडले, तर या परिसरात असलेली पाण्याची समस्या कमी होण्यास निश्चितच मदत होईल. मागील काही दिवसांपूर्र्वी धरणातून आर्वतन सोडण्यात आले होते. त्यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला होता. पाण्याअभावी या परिसरातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे कोरडे ठणठणीत पडले असून, धरणाच्या उपलब्ध पाणीसाठ्यातून पाऊस होईल तोपर्यंत तरी एखादे आर्वतन सोडण्यात यावे, अशी मागणी येथील शेतकरीवर्ग, तसेच ग्रामस्थ करीत आहेत. राजेगाव : दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमधील पशुधन जगवणे अतिशय कठीण झाले असून, पशुधन जगवायचे कसे, असा प्रश्न दुग्धउत्पादक शेतकऱ्यांना सतावत आहे. शासनाने १५ मार्च २0१६ रोजी दौंड तालुक्यातील ५0 पैशांपेक्षा कमी आणेवारी असणारी ३२ गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत. त्यातील बोरीबेल, गाडेवाडी, रावणगाव, नंदादेवी, स्वामी चिंचोली, लोणारवाडी या पूर्व भागातील गावांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांपासून या गावातील जिरायत पट्ट्यातील खरीप व रब्बी हंगाम पावसाअभावी वाया गेला आहे. यावर्षी या भागात अत्यल्प झालेल्या पावसामुळे पिण्याचे पाण्याचे मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळे या परिसरातील माणसांबरोबरच पशुधन कसे जगवायचे, हा प्रश्न पडला आहे. या भागातून खडकवासला कालवा जात असल्याने या भागातील शेतकरी प्रामुख्याने ऊस हे पीक मोठ्या प्रमाणावर घेत आलेला आहे. उसाबरोबरच या भागातील शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करत आलेला आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना प्रपंच चालवायला दुग्धव्यवसायच प्रमुख आधार झालेला आहे. यंदा तोच व्यवसाय संकटात सापडला असल्याने त्याचे कंबरडे मोडून गेले आहे. भीमा नदीपात्रात पाण्याचा थेंबही शिल्लक राहिला नाही. तसेच विहिरी, कूपनलिका इत्यादी पाण्याचे स्रोत केव्हाच आटून गेले आहेत. या परिसरातील गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, मागणी करूनही अनेक गावे व वाड्या-वस्त्यांवर चार-चार दिवस टँकरच्या खेपा होत नसल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. माणसालाच वेळेला पाणी पिण्यासाठी मिळत नाही, तर जनावरांचे काय? अशी दुर्दैवी वेळ दुग्धउत्पादकांवर दुष्काळामुळे आली आहे. हिरवा चारा तर सोडाच, पण वाळलेला ऊसही जनावरांना खायला मिळेनासा झाला आहे. जनावरांना पोषक आहार मिळत नसल्याने त्यांच्या दूध देण्याच्या क्षमतेत परिणाम झालेला आहे. शिवाय, जनावरांना वेळच्या वेळी चारा व पाणी मिळत नसल्याने त्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. जनावरांची छावणी व चारा डेपोसाठी वारंवार मागणी करूनही शासनाला घाम फुटला नसल्याने शासनाने या मागणीकडे काणाडोळा केल्याचे चित्र आहे.