शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

भीमा नदीपात्र पडले कोरडे; दौंड पूर्व भागातील पशुधन जगवणे कठीण

By admin | Updated: May 22, 2016 00:45 IST

दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भीमा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत पडल्याने परिसरातील पाटेठाण, टाकळी भीमा, पानवली, वडगाव बांडे, कोरेगाव भिवर, आलेगाव या नदीच्या काठावर

पाटेठाण : दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भीमा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत पडल्याने परिसरातील पाटेठाण, टाकळी भीमा, पानवली, वडगाव बांडे, कोरेगाव भिवर, आलेगाव या नदीच्या काठावर असलेल्या गावांत जनावरांना, तसेच पिण्याच्या पाण्यासंदर्भात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या भीमा नदीच्या काठावरील असलेल्या शेतातील हिरवीगार पिकेदेखील पाण्याअभावी जळून जाण्याच्या मार्गावर असून, काही करा परंतु धरणाच्या उपलब्ध पाणी साठ्यामधून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.भीमा नदीच्या पाण्यावर दौंड व शिरूर व हवेली या तालुक्यातील पेरणे, पिंपरी सांडस, विठ्ठलवाडी, पाटेठाण, मेमाणवाडी, टाकळी भीमा, अरणगाव, पानवली, वडगाव बांडे, कोरेगाव भिवर, आलेगाव पागा या गावांसह अनेक गावे शेतीसाठी अवलंबून आहेत. नदीची पाणीपातळी तळाला गेली असून, कृषिपंप नदीच्या मध्यावर नेऊनदेखील नदी कोरडी ठणठणीत पडल्याने काहीच उपयोग होत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या परिसरातील उभी पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. काही ठिकाणी शिल्लक राहिलेल्या नदीचा खोलगट भाग व झरे यामधून शेतकरी पाणी नेऊन पिके जगवण्याची धडपड करताना दिसून येत आहे.भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने या परिसरात शेतीच्या पाण्याबरोबरच जनावरांना, तसेच पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाऊस होईल तोपर्यंत एखादे आर्वतन सोडले, तर या परिसरात असलेली पाण्याची समस्या कमी होण्यास निश्चितच मदत होईल. मागील काही दिवसांपूर्र्वी धरणातून आर्वतन सोडण्यात आले होते. त्यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला होता. पाण्याअभावी या परिसरातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे कोरडे ठणठणीत पडले असून, धरणाच्या उपलब्ध पाणीसाठ्यातून पाऊस होईल तोपर्यंत तरी एखादे आर्वतन सोडण्यात यावे, अशी मागणी येथील शेतकरीवर्ग, तसेच ग्रामस्थ करीत आहेत. राजेगाव : दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमधील पशुधन जगवणे अतिशय कठीण झाले असून, पशुधन जगवायचे कसे, असा प्रश्न दुग्धउत्पादक शेतकऱ्यांना सतावत आहे. शासनाने १५ मार्च २0१६ रोजी दौंड तालुक्यातील ५0 पैशांपेक्षा कमी आणेवारी असणारी ३२ गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत. त्यातील बोरीबेल, गाडेवाडी, रावणगाव, नंदादेवी, स्वामी चिंचोली, लोणारवाडी या पूर्व भागातील गावांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांपासून या गावातील जिरायत पट्ट्यातील खरीप व रब्बी हंगाम पावसाअभावी वाया गेला आहे. यावर्षी या भागात अत्यल्प झालेल्या पावसामुळे पिण्याचे पाण्याचे मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळे या परिसरातील माणसांबरोबरच पशुधन कसे जगवायचे, हा प्रश्न पडला आहे. या भागातून खडकवासला कालवा जात असल्याने या भागातील शेतकरी प्रामुख्याने ऊस हे पीक मोठ्या प्रमाणावर घेत आलेला आहे. उसाबरोबरच या भागातील शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करत आलेला आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना प्रपंच चालवायला दुग्धव्यवसायच प्रमुख आधार झालेला आहे. यंदा तोच व्यवसाय संकटात सापडला असल्याने त्याचे कंबरडे मोडून गेले आहे. भीमा नदीपात्रात पाण्याचा थेंबही शिल्लक राहिला नाही. तसेच विहिरी, कूपनलिका इत्यादी पाण्याचे स्रोत केव्हाच आटून गेले आहेत. या परिसरातील गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, मागणी करूनही अनेक गावे व वाड्या-वस्त्यांवर चार-चार दिवस टँकरच्या खेपा होत नसल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. माणसालाच वेळेला पाणी पिण्यासाठी मिळत नाही, तर जनावरांचे काय? अशी दुर्दैवी वेळ दुग्धउत्पादकांवर दुष्काळामुळे आली आहे. हिरवा चारा तर सोडाच, पण वाळलेला ऊसही जनावरांना खायला मिळेनासा झाला आहे. जनावरांना पोषक आहार मिळत नसल्याने त्यांच्या दूध देण्याच्या क्षमतेत परिणाम झालेला आहे. शिवाय, जनावरांना वेळच्या वेळी चारा व पाणी मिळत नसल्याने त्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. जनावरांची छावणी व चारा डेपोसाठी वारंवार मागणी करूनही शासनाला घाम फुटला नसल्याने शासनाने या मागणीकडे काणाडोळा केल्याचे चित्र आहे.