शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

स्वतः सुरक्षित राहा , समाज सुरक्षित राहील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली. महिला सबलीकरणाच्या गप्पा केवळ शहरी घराच्या उंबरठ्यापर्यंत मर्यादित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली. महिला सबलीकरणाच्या गप्पा केवळ शहरी घराच्या उंबरठ्यापर्यंत मर्यादित न राहता त्या ग्रामीण भागापर्यंत देखील पोहोचले पाहिजेत. अनेक अत्याचाराच्या घटनांना वाचा फुटत नसल्याने त्या दबल्या जातात. त्यामुळे महिलांच्या पदरी उपेक्षाच येते. ते टाळण्यासाठी महिलांचे सबलीकरण झाले पाहिजे. ती स्वतः सुरक्षित राहिली तर समाज सुरक्षित राहील. तेव्हा ती सुरक्षित राहण्यासाठी पाऊले उचलणे हाच संकल्प असल्याचे शहरातील नामवंत महिला डॉक्टरांनी सांगितले, तसेच १०० टक्के लसीकरण झाले पाहिजे. महिलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य जपले पाहिजे, अशा भावना महिला डॉक्टरांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर मांडल्या.

१. डॉ. शुभदा जोशी : महिलांचे सबलीकरण झाले पाहिजे. त्यांचा योग्य तो सन्मान राखला गेला पाहिजे. कोविडच्या काळात आम्ही एकही दिवस आमचे क्लिनिक बंद नाही ठेवले. आम्ही सतत रुग्णाची सेवा केली. कोविडच्या काळात समाज घाबरला होता. त्यावेळी ‘लोकमत’ने खऱ्या बातम्या देऊन आधार दिला. आता स्त्रियांंच्या सबलीकरणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा.

२. डॉ. नीता शहा : महिलांचे सबलीकरण करताना त्या आर्थिकदृष्ट्या देखील सक्षम होणे गरजेचे आहे. त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यावर काही प्रश्न आपोआप मिटतील. सर्वांनी एकाच पातळीवर येणे गरजेचे आहे. सामान्य स्त्रियांना देखील सन्मानाने जगता आले पाहिजे.

३.डॉ. वैशाली लोढा : केवळ महिलांवरच अत्याचार होतात असे नाही. गेल्या काही दिवसांत लहान मुली देखील अत्याचाराच्या बळी पडत आहेत. त्यामुळे आम्ही लहान मुलींना गुड टच, बॅड टच कसा ओळखायचा हे शिकवतो. अशावेळी काय केले पाहिजे हे त्यांना सांगितले गेले पाहिजे. आम्ही त्या प्रकारचे शिक्षण देखील देतो. मुलींना एकट्याने प्रवास करताना काय काळजी घेतली पाहिजे. हे देखील त्यांना सांगितले पाहिजे. शिवाय तिच्यात आत्मविश्वास देखील निर्माण केला पाहिजे.

४ डॉ. विद्युलता जोशी : महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. शिवाय महिलांना स्वावलंबी बनविणे गरजेचे आहे. ती बोल्ड बनावी. सर्वच क्षेत्रांत यशस्वी होण्यासाठी तिला प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

५.डॉ. नीता निकम : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फुटायला हवी. त्यासाठी महिलांचे सबलीकरण झाले पाहिजे. अनके कुटुंबांतच लहान मुलीवर अथवा महिलांवर अत्याचार होतो. मात्र, कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने असे प्रकरण घराच्या चार भिंतीत दाबलं जातं. समोर न येणाऱ्या गोष्टी त्यांना देखील वाचा फुटली पाहिजे.