शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

स्वतः सुरक्षित राहा , समाज सुरक्षित राहील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली. महिला सबलीकरणाच्या गप्पा केवळ शहरी घराच्या उंबरठ्यापर्यंत मर्यादित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली. महिला सबलीकरणाच्या गप्पा केवळ शहरी घराच्या उंबरठ्यापर्यंत मर्यादित न राहता त्या ग्रामीण भागापर्यंत देखील पोहोचले पाहिजेत. अनेक अत्याचाराच्या घटनांना वाचा फुटत नसल्याने त्या दबल्या जातात. त्यामुळे महिलांच्या पदरी उपेक्षाच येते. ते टाळण्यासाठी महिलांचे सबलीकरण झाले पाहिजे. ती स्वतः सुरक्षित राहिली तर समाज सुरक्षित राहील. तेव्हा ती सुरक्षित राहण्यासाठी पाऊले उचलणे हाच संकल्प असल्याचे शहरातील नामवंत महिला डॉक्टरांनी सांगितले, तसेच १०० टक्के लसीकरण झाले पाहिजे. महिलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य जपले पाहिजे, अशा भावना महिला डॉक्टरांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर मांडल्या.

१. डॉ. शुभदा जोशी : महिलांचे सबलीकरण झाले पाहिजे. त्यांचा योग्य तो सन्मान राखला गेला पाहिजे. कोविडच्या काळात आम्ही एकही दिवस आमचे क्लिनिक बंद नाही ठेवले. आम्ही सतत रुग्णाची सेवा केली. कोविडच्या काळात समाज घाबरला होता. त्यावेळी ‘लोकमत’ने खऱ्या बातम्या देऊन आधार दिला. आता स्त्रियांंच्या सबलीकरणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा.

२. डॉ. नीता शहा : महिलांचे सबलीकरण करताना त्या आर्थिकदृष्ट्या देखील सक्षम होणे गरजेचे आहे. त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यावर काही प्रश्न आपोआप मिटतील. सर्वांनी एकाच पातळीवर येणे गरजेचे आहे. सामान्य स्त्रियांना देखील सन्मानाने जगता आले पाहिजे.

३.डॉ. वैशाली लोढा : केवळ महिलांवरच अत्याचार होतात असे नाही. गेल्या काही दिवसांत लहान मुली देखील अत्याचाराच्या बळी पडत आहेत. त्यामुळे आम्ही लहान मुलींना गुड टच, बॅड टच कसा ओळखायचा हे शिकवतो. अशावेळी काय केले पाहिजे हे त्यांना सांगितले गेले पाहिजे. आम्ही त्या प्रकारचे शिक्षण देखील देतो. मुलींना एकट्याने प्रवास करताना काय काळजी घेतली पाहिजे. हे देखील त्यांना सांगितले पाहिजे. शिवाय तिच्यात आत्मविश्वास देखील निर्माण केला पाहिजे.

४ डॉ. विद्युलता जोशी : महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. शिवाय महिलांना स्वावलंबी बनविणे गरजेचे आहे. ती बोल्ड बनावी. सर्वच क्षेत्रांत यशस्वी होण्यासाठी तिला प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

५.डॉ. नीता निकम : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फुटायला हवी. त्यासाठी महिलांचे सबलीकरण झाले पाहिजे. अनके कुटुंबांतच लहान मुलीवर अथवा महिलांवर अत्याचार होतो. मात्र, कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने असे प्रकरण घराच्या चार भिंतीत दाबलं जातं. समोर न येणाऱ्या गोष्टी त्यांना देखील वाचा फुटली पाहिजे.