शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

कुकडी प्रकल्पातील धरणांनी गाठला तळ

By admin | Updated: April 9, 2016 01:54 IST

कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाचही धरणांच्या पाणीसाठ्यात सध्या झपाट्याने घट झाली आहे. प्रकल्पातील डिंभे धरण वगळता सर्वच धरणांतील पाणीसाठ्यांनी तळ गाठले असून

डिंभे : कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाचही धरणांच्या पाणीसाठ्यात सध्या झपाट्याने घट झाली आहे. प्रकल्पातील डिंभे धरण वगळता सर्वच धरणांतील पाणीसाठ्यांनी तळ गाठले असून, आजमितीस या प्रकल्पात केवळ ३.११ टीएमसी म्हणजेच केवळ १० टक्केएवढा अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मागील वर्षी या प्रकल्पात ७.४१ टीएमसी म्हणजेच २४.६० टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक होता. हाताशी असणाऱ्या पाण्याचे काटकसरीने वापर न झाल्यास, यंदा उन्हाळ्याच्या अखेरच्या दिवसांत पाणीटंचाईची समस्या गंभीर रूप धारण करणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत, तर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी योजना धोक्यात येऊन धरणांच्या आतील आदिवासी गावांना यंदा तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.जुन्नर तालुक्यातील येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव, तर आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण या पाच धरणांचा मिळून कुकडी प्रकल्पावर जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर व अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा अशा एकूण ७ तालुक्यांमधील सुमारे १ लाख ५६ हजार २७८ हेक्टरएवढे मोठे क्षेत्र कालव्यांद्वारे सिंचनाखाली आले आहे. सर्वत्र बागयती पिके घेतली जाऊ लागल्याने यंदा उन्हाची तीव्रता वाढू लागताच सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. मात्र कुकडी प्रकल्पाची या वर्षीची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. प्रकल्पात येणाऱ्या पाच धरणांपैकी येडगाव व डिंभे धरण वगळता बाकी माणिकडोह, वडज व पिंपळगाव जोगा या तीन धरणांत जवळपास शून्य टक्के पाणीसाठा राहिला आहे. सध्या केवळ डिंभे धरणात १० टक्केएवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणातून सध्या ६०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू असून डाव्या कालव्याद्वारे पाणी येडगाव धरणात टाकण्यात येत आहे. मागील वर्षाची तुलना करता यंदाच्या उन्हाळयात प्रकल्पातील सर्वच धरणांतील पाणाीसाठ्यात घट झाली आहे. या प्रकल्पांतर्गत येणाऱ्या धरणांतून रब्बीसाठी १, खरिपासाठी १ एक अशी दोन रोटेशन पूर्ण झाली. यामुळे कुकडी प्रकल्पात केवळ १० टक्के एवढा पाणीसाठा दिसत असला तरी वाढती उन्हाची तीव्रता व पाण्याच्या मागणीमुळे यंदा या प्रकल्पातील धरणे कोरडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एप्रिल महिना सुरू होताच खऱ्या अर्थाने उन्हाळ््याची तीव्रता वाढण्यास सुरुवात होते. पूर्वीप्रमाणे पावसाळाही वेळेवर सुरू होत नसल्याने मार्च ते जुलै या पाच महिन्यांपर्यंत प्रकल्पातील पाण्याचा नियोजनपूर्वक वापर करणे गरजेचे आहे. सध्या या प्रकल्पात असणाऱ्या डिंभेच्या पाण्यावरच सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. डिंभे धरणासह यंदा प्रकल्पातील सर्वच धरणांत जेमतेम पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाचही धरणांत सध्या पाणी शिल्लक नाही. त्यातच प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी दबाव वाढू लागले आहेत. यामुळे पाणलोटाच्या आतील आदिवासी गावांना पाण्याच्या या पळवापळवीचा फटका बसणार आहे. ‘धरणं आमच्या भागात मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण,’ याचा पुन्हा एकदा अनुभव धरण पाणलोट क्षेत्रातील गावांना यंदा येणार आहे. या भागात असणाऱ्या पाणी योजना अडचणीत येणार असल्याने पाणलोट क्षेत्रातील आदिवासी गावांना यंदा तीव्र पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागण्याची चिन्हे आहेत.वडज हे धरण मीना नदीवर बांधण्यात आले आहे. १९८३ पासून या धरणात पाणी साठविण्यास सुरुवात करण्यात आली. धरणास १४ किमीचा मीना पूरक कालवा व ४० किमीचा मीना शाखा कालवा काढण्यात आला आहे. या धरणाची एकूण साठवण क्षमता १.२७१ टीएमसीएवढी असून सध्या या धरणात ०.२८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पिंपळगाव जोगा हे धरण सन २००० मध्ये पूर्ण झाले असले तरी १९९६-९९ पासूनच घळभरणी पूर्ण करून धरणात पाणीसाठा करण्यास सुरुवात केली आहे. या धरणातून ७० किमीचा डावा कालवा काढण्यात आला आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ७.६८७ टीएमसीएवढी असून या धरणात ० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. येडगाव-कुकडी प्रकल्पात येणारे येडगाव धरण हे महत्त्वाचे धरण असून या धरणाचे बांधकाम सन १९७७ मध्ये पूर्ण झाले. हे धरण पिकअपविअर म्हणून बांधण्यात आले असून डिंभे, माणिकडोह, पिंपळगाव व वडज या धरणांतून या धरणात पाणी सोडण्यात येते. या धरणास २४९ किमी लांबीचा डावा कालवा काढण्यात आला आहे. धरणाची एकूण साठवणक्षमता ३.३ टीएमसी एवढी असून सध्या या धरणात केवळ २५ टक्केएवढा पाणीसाठा आहे.