शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

घरकुल मिळूनही लाभार्थी पत्र्याच्या शेडमध्ये

By admin | Updated: May 26, 2014 05:35 IST

बारामती शहरातील आमराई परिसरात सुहासनगर येथील झोपडपट्टी सुधार योजनेअंतर्गत ८२ घरकुलांची इमारत बांधण्यात आली आहे.

बारामती : बारामती शहरातील आमराई परिसरात सुहासनगर येथील झोपडपट्टी सुधार योजनेअंतर्गत ८२ घरकुलांची इमारत बांधण्यात आली आहे. ५ महिन्यांपूर्वी या घरांचा ताबा देखील लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. मात्र, वीज, पाण्याअभावी येथील रहिवाशांना अद्याप पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्य करावे लागत आहे. या ठिकाणी मुलभूत सुविधा नसल्याने नागरिकांची, विशेषत: महिलांची कुचंबना होत आहे. सुहासनगर येथे घरकुल बांधताना येथील नागरिक टेलिफोन भवन परिसरात स्थलांतरीत झाले आहे. मात्र, सोसायटी स्थापन करून वीज, पाणी मागणीअर्ज भरणे येथील लाभार्थ्यांनी भरणे आवश्यक आहे, असे मुख्याधिकारी रवी पवार यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, येथील नागरिकांना याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. लाईट, पाणी नसल्याने घरकुल ताब्यात मिळून देखील लाभार्थी नागरिकांना पत्र्याचे शेडमध्ये वास्तव्य करावे लागत आहे. बारामती शहरातील टेलिफोन भवन समोर असणार्‍या गाळ्यांमध्ये नागरिकांनी नाईलाजास्तव संसार थाटले आहे. रमाईमाता भवन परिसरात हे नागरिक पत्र्याचे शेड ठोकून वास्तव्यास आहेत. रमाईमाता भवन परिसरात सांडपाणी सोडण्यात येते. मुलभूत सुविधांअभावी या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ५ महिन्यांपूर्वी घराचा ताबा मिळाला आहे. मात्र, लाईट, पाणी नसल्याने अद्याप लाभार्थी या ठिकाणी वास्तव्यास आलेले नाही. घाणीमुळे मोकाट जनावरांचा वावर कायम असतो. तर महिलांना उघड्यावर स्वयंपाक करावा लागतो. घराचा विषय मार्गी लावला, आता वीज, पाण्याचा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी येथील नागरिक सुनिल चव्हाण यांनी केली आहे. अधिका-यांच्या उदासीनतेमुळे हा विषय मार्गी लागला नाही, अशी तक्रार येथील नागरिकांनी केली. सोसायटी स्थापन करून वीज, पाणी पुरवठा करणे नगरपरिषदेसाठी एका दिवसाचे काम आहे. मात्र, सामान्य लाभार्थ्यांमधून सोसायटी चेअरमन निवड केली जात नाही. याच चेअरमन निवडीच्या आग्रहातून या ठिकाणी सुविधा झाल्या नाहीत, असा आरोप काळुराम चौधरी यांनी केला आहे.