शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

नृत्यक्षेत्रातील आदिसंस्थेचा अमृतमहोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:09 IST

‘नाचकाम’ अशा अगदी तुच्छतादर्शक शब्दांत ज्या कलेची संभावना एकेकाळी या सनातनी पुण्यात केली जात होती, त्याच पुण्यात आता ‘आमची ...

‘नाचकाम’ अशा अगदी तुच्छतादर्शक शब्दांत ज्या कलेची संभावना एकेकाळी या सनातनी पुण्यात केली जात होती, त्याच पुण्यात आता ‘आमची मुलगी नृत्य शिकते’, असं पालक अभिमानानं सांगतात. गायनकला आणि नाट्यकला या आपल्या वैभवाचा काळ उपभोगत असतानाच्या त्या दिवसांत नृत्यकला मात्र केवळ चित्रपटांच्या पडद्यावर काय ती दिसत होती. सार्वजनिक जीवनात ती अंग चोरुनच वावरत होती. अशा सर्वस्वी प्रतिकूल वातावरणात १० जुलै १९४७ रोजी डेक्कन जिमखान्यावरच्या ‘कलामंदिर’ या वास्तूमध्ये पं. रोहिणी भाटे यांनी एका लहानशा नृत्यवर्गाच्या रुपात ‘नृत्यभारती’ ही संस्था सुरु केली. पुण्यातल्या पांढरपेशा वर्गातल्या एका सुशिक्षित तरुणीनं सुरु केलेला हा पहिलावहिला नृत्यवर्ग ! ही संस्था यंदा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करते आहे.

पुण्यासारख्या शहराला आपल्या नृत्यविषयक धारणांमध्ये बदल घडवायला लावून, पारंपरिक, बाळबोध आणि काहीशा पूर्वग्रहदूषित कल्पनांमधून मुक्त करणारी ही संस्था भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच वर्षी स्थापन व्हावी, हा भाग्यशाली योग म्हणायला हवा. कारण पुण्याच्या सांस्कृतिक अवकाशात आता नृत्यकला प्रतिष्ठेनं आणि दिमाखानं विराजमान झाली आहे, याचा ओनामा केला ‘नृत्यभारती’ या संस्थेनं !

७५ वर्षांची ही वाटचाल सोपी मुळीच नव्हती. रोहिणीताईंनी आपल्या उपजत प्रतिभेला व्यासंग आणि साधनेची जोड देत अहर्निश ध्यास घेऊन केलेल्या नृत्यविषयक चौफेर कामगिरीमुळे संस्थेचा आलेख सतत चढताच राहिला. अनेक लहानमोठे कलाकार संस्थेशी जोडले गेले, अनेक कलाकारांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात त्यांच्याकडे केली. अगणित स्फुट रचना,अनेकविध नृत्यात्मिका (ballets),‘नृत्यभारती’च्या श्रेयगणतीमध्ये आहेत. ‘नृत्यभारती’च्या नृत्यसंचाच्या कितीतरी परदेशयात्रा,स्वतः रोहिणीताईंच्या विदेशयात्रा असं त्यांचं कार्यक्षेत्र सर्वसमावेशक आहे. गुरु, संरचनाकार,वाग्गेयकार तर त्या होत्याच पण नृत्यविषयक लेखन करणं, विद्यापीठीय चर्चासत्रात शोधनिबंध वाचणं अशा वैचारिक आणि अकादमिक पातळीवरही त्यांचं योगदान अनन्य आहे.

एका व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाचा आधार असलेली पुण्यातली ही आद्य नृत्यसंस्था. कोणतेही सरकारी वा अन्य खाजगी आस्थापनांचे आर्थिक पाठबळ नसूनही गुणवत्ता आणि निष्ठा या दुर्मिळ होत चाललेल्या गुणांच्या भक्कम पायावर उभी असलेली. १९५० च्या आसपास सुरु झालेला पुण्याचा ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सव’ किंव पी. डी. ए. सारखी नाट्यसंस्था डोळ्यांपुढे आणली तर ‘नृत्यभारती’नं सुरु केलेल्या नृत्यचळवळीचं महत्त्व लक्षात येईल. आज इथे विविध नृत्यशैलींचे अनेक वर्ग सुरु आहेत.असंख्य विद्यार्थी नृत्यकलेचं शिक्षण घेत आहेत. उत्तरेकडच्या लोकांना इथल्या नृत्याची दखल घ्यावीच लागते आहे. इथे नृत्यचळवळ उभी करण्याचं आणि कथकच्या रूढ चौकटीला रुंदावण्याचं श्रेय, निखालसपणे रोहिणीताई-‘नृत्यभारती’ यांचं आहे.

वस्तुतः कथक ही उत्तर भारतामधली कला. महाराष्ट्राला तिचे नावही अपरिचित होते तेव्हा ही कथकची परंपरा जणू भगीरथ प्रयत्नांनी इथल्या मातीत, या ‘राकट,कणखर दगडांच्याही देशात’त्यांनी रुजवली. आज पुणं हे दक्षिणेतलं महत्त्वाचं कथक केंद्र म्हणून मान्यता पावलं आहे, ही त्यांची आपल्याला अभिमान वाटावा, अशी मौलिक ठेवा आहे.

‘नृत्यभारती’च्या या वैभवशाली इतिहासात प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यांवर वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम झाले.संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात म्हणजे १९७२ साली ह्या संस्थेची अधिकृत नोंदणी झाली.त्यानंतर संस्थेला ४० वर्ष झाल्यानिमित्त,सुवर्णमहोत्सवी वर्षात आणि संस्थेला ७० वर्ष झाल्यानिमित्त झालेले वैविध्यपूर्ण कार्यक्रम पुणेकरांच्या स्मरणात आहेत.या वर्षी करोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष जरी नाही तरी आभासी मंचावर वर्षभर कार्यक्रममालिकेचं आयोजन केलं आहे. १० जुलैला ‘स्मृतिगंध’ हा कार्यक्रम होणार असून त्यामध्ये संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त केलेल्या मोठ्या सोहळ्याचा पुनःप्रत्यय मिळणार आहे. या कार्यक्रमात रोहिणीताईंचं स्वतःचं नृत्य आणि त्यांनी निर्मिलेल्या काही रचनांचं संक्षिप्त दर्शन घडेल.तर या वर्षातील प्रत्येक महिन्यात एक पूर्ण लांबीचा कार्यक्रम, संस्थेतील नवोदित कलाकारांचं नृत्यसादरीकरण,तज्ज्ञांशी चर्चा,मुलाखती असे ... भरगच्च कार्यक्रम असणार आहेत.१० जुलै रोजी होणारा ‘स्मृतिगंध’ हा कार्यक्रम संध्याकाळी ७ वाजता ‘नृत्यभारती’च्या फेसबुक पेजवर पाहता येईल.