शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

नृत्यक्षेत्रातील आदिसंस्थेचा अमृतमहोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:09 IST

‘नाचकाम’ अशा अगदी तुच्छतादर्शक शब्दांत ज्या कलेची संभावना एकेकाळी या सनातनी पुण्यात केली जात होती, त्याच पुण्यात आता ‘आमची ...

‘नाचकाम’ अशा अगदी तुच्छतादर्शक शब्दांत ज्या कलेची संभावना एकेकाळी या सनातनी पुण्यात केली जात होती, त्याच पुण्यात आता ‘आमची मुलगी नृत्य शिकते’, असं पालक अभिमानानं सांगतात. गायनकला आणि नाट्यकला या आपल्या वैभवाचा काळ उपभोगत असतानाच्या त्या दिवसांत नृत्यकला मात्र केवळ चित्रपटांच्या पडद्यावर काय ती दिसत होती. सार्वजनिक जीवनात ती अंग चोरुनच वावरत होती. अशा सर्वस्वी प्रतिकूल वातावरणात १० जुलै १९४७ रोजी डेक्कन जिमखान्यावरच्या ‘कलामंदिर’ या वास्तूमध्ये पं. रोहिणी भाटे यांनी एका लहानशा नृत्यवर्गाच्या रुपात ‘नृत्यभारती’ ही संस्था सुरु केली. पुण्यातल्या पांढरपेशा वर्गातल्या एका सुशिक्षित तरुणीनं सुरु केलेला हा पहिलावहिला नृत्यवर्ग ! ही संस्था यंदा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करते आहे.

पुण्यासारख्या शहराला आपल्या नृत्यविषयक धारणांमध्ये बदल घडवायला लावून, पारंपरिक, बाळबोध आणि काहीशा पूर्वग्रहदूषित कल्पनांमधून मुक्त करणारी ही संस्था भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच वर्षी स्थापन व्हावी, हा भाग्यशाली योग म्हणायला हवा. कारण पुण्याच्या सांस्कृतिक अवकाशात आता नृत्यकला प्रतिष्ठेनं आणि दिमाखानं विराजमान झाली आहे, याचा ओनामा केला ‘नृत्यभारती’ या संस्थेनं !

७५ वर्षांची ही वाटचाल सोपी मुळीच नव्हती. रोहिणीताईंनी आपल्या उपजत प्रतिभेला व्यासंग आणि साधनेची जोड देत अहर्निश ध्यास घेऊन केलेल्या नृत्यविषयक चौफेर कामगिरीमुळे संस्थेचा आलेख सतत चढताच राहिला. अनेक लहानमोठे कलाकार संस्थेशी जोडले गेले, अनेक कलाकारांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात त्यांच्याकडे केली. अगणित स्फुट रचना,अनेकविध नृत्यात्मिका (ballets),‘नृत्यभारती’च्या श्रेयगणतीमध्ये आहेत. ‘नृत्यभारती’च्या नृत्यसंचाच्या कितीतरी परदेशयात्रा,स्वतः रोहिणीताईंच्या विदेशयात्रा असं त्यांचं कार्यक्षेत्र सर्वसमावेशक आहे. गुरु, संरचनाकार,वाग्गेयकार तर त्या होत्याच पण नृत्यविषयक लेखन करणं, विद्यापीठीय चर्चासत्रात शोधनिबंध वाचणं अशा वैचारिक आणि अकादमिक पातळीवरही त्यांचं योगदान अनन्य आहे.

एका व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाचा आधार असलेली पुण्यातली ही आद्य नृत्यसंस्था. कोणतेही सरकारी वा अन्य खाजगी आस्थापनांचे आर्थिक पाठबळ नसूनही गुणवत्ता आणि निष्ठा या दुर्मिळ होत चाललेल्या गुणांच्या भक्कम पायावर उभी असलेली. १९५० च्या आसपास सुरु झालेला पुण्याचा ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सव’ किंव पी. डी. ए. सारखी नाट्यसंस्था डोळ्यांपुढे आणली तर ‘नृत्यभारती’नं सुरु केलेल्या नृत्यचळवळीचं महत्त्व लक्षात येईल. आज इथे विविध नृत्यशैलींचे अनेक वर्ग सुरु आहेत.असंख्य विद्यार्थी नृत्यकलेचं शिक्षण घेत आहेत. उत्तरेकडच्या लोकांना इथल्या नृत्याची दखल घ्यावीच लागते आहे. इथे नृत्यचळवळ उभी करण्याचं आणि कथकच्या रूढ चौकटीला रुंदावण्याचं श्रेय, निखालसपणे रोहिणीताई-‘नृत्यभारती’ यांचं आहे.

वस्तुतः कथक ही उत्तर भारतामधली कला. महाराष्ट्राला तिचे नावही अपरिचित होते तेव्हा ही कथकची परंपरा जणू भगीरथ प्रयत्नांनी इथल्या मातीत, या ‘राकट,कणखर दगडांच्याही देशात’त्यांनी रुजवली. आज पुणं हे दक्षिणेतलं महत्त्वाचं कथक केंद्र म्हणून मान्यता पावलं आहे, ही त्यांची आपल्याला अभिमान वाटावा, अशी मौलिक ठेवा आहे.

‘नृत्यभारती’च्या या वैभवशाली इतिहासात प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यांवर वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम झाले.संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात म्हणजे १९७२ साली ह्या संस्थेची अधिकृत नोंदणी झाली.त्यानंतर संस्थेला ४० वर्ष झाल्यानिमित्त,सुवर्णमहोत्सवी वर्षात आणि संस्थेला ७० वर्ष झाल्यानिमित्त झालेले वैविध्यपूर्ण कार्यक्रम पुणेकरांच्या स्मरणात आहेत.या वर्षी करोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष जरी नाही तरी आभासी मंचावर वर्षभर कार्यक्रममालिकेचं आयोजन केलं आहे. १० जुलैला ‘स्मृतिगंध’ हा कार्यक्रम होणार असून त्यामध्ये संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त केलेल्या मोठ्या सोहळ्याचा पुनःप्रत्यय मिळणार आहे. या कार्यक्रमात रोहिणीताईंचं स्वतःचं नृत्य आणि त्यांनी निर्मिलेल्या काही रचनांचं संक्षिप्त दर्शन घडेल.तर या वर्षातील प्रत्येक महिन्यात एक पूर्ण लांबीचा कार्यक्रम, संस्थेतील नवोदित कलाकारांचं नृत्यसादरीकरण,तज्ज्ञांशी चर्चा,मुलाखती असे ... भरगच्च कार्यक्रम असणार आहेत.१० जुलै रोजी होणारा ‘स्मृतिगंध’ हा कार्यक्रम संध्याकाळी ७ वाजता ‘नृत्यभारती’च्या फेसबुक पेजवर पाहता येईल.