शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

नृत्यक्षेत्रातील आदिसंस्थेचा अमृतमहोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:09 IST

‘नाचकाम’ अशा अगदी तुच्छतादर्शक शब्दांत ज्या कलेची संभावना एकेकाळी या सनातनी पुण्यात केली जात होती, त्याच पुण्यात आता ‘आमची ...

‘नाचकाम’ अशा अगदी तुच्छतादर्शक शब्दांत ज्या कलेची संभावना एकेकाळी या सनातनी पुण्यात केली जात होती, त्याच पुण्यात आता ‘आमची मुलगी नृत्य शिकते’, असं पालक अभिमानानं सांगतात. गायनकला आणि नाट्यकला या आपल्या वैभवाचा काळ उपभोगत असतानाच्या त्या दिवसांत नृत्यकला मात्र केवळ चित्रपटांच्या पडद्यावर काय ती दिसत होती. सार्वजनिक जीवनात ती अंग चोरुनच वावरत होती. अशा सर्वस्वी प्रतिकूल वातावरणात १० जुलै १९४७ रोजी डेक्कन जिमखान्यावरच्या ‘कलामंदिर’ या वास्तूमध्ये पं. रोहिणी भाटे यांनी एका लहानशा नृत्यवर्गाच्या रुपात ‘नृत्यभारती’ ही संस्था सुरु केली. पुण्यातल्या पांढरपेशा वर्गातल्या एका सुशिक्षित तरुणीनं सुरु केलेला हा पहिलावहिला नृत्यवर्ग ! ही संस्था यंदा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करते आहे.

पुण्यासारख्या शहराला आपल्या नृत्यविषयक धारणांमध्ये बदल घडवायला लावून, पारंपरिक, बाळबोध आणि काहीशा पूर्वग्रहदूषित कल्पनांमधून मुक्त करणारी ही संस्था भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच वर्षी स्थापन व्हावी, हा भाग्यशाली योग म्हणायला हवा. कारण पुण्याच्या सांस्कृतिक अवकाशात आता नृत्यकला प्रतिष्ठेनं आणि दिमाखानं विराजमान झाली आहे, याचा ओनामा केला ‘नृत्यभारती’ या संस्थेनं !

७५ वर्षांची ही वाटचाल सोपी मुळीच नव्हती. रोहिणीताईंनी आपल्या उपजत प्रतिभेला व्यासंग आणि साधनेची जोड देत अहर्निश ध्यास घेऊन केलेल्या नृत्यविषयक चौफेर कामगिरीमुळे संस्थेचा आलेख सतत चढताच राहिला. अनेक लहानमोठे कलाकार संस्थेशी जोडले गेले, अनेक कलाकारांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात त्यांच्याकडे केली. अगणित स्फुट रचना,अनेकविध नृत्यात्मिका (ballets),‘नृत्यभारती’च्या श्रेयगणतीमध्ये आहेत. ‘नृत्यभारती’च्या नृत्यसंचाच्या कितीतरी परदेशयात्रा,स्वतः रोहिणीताईंच्या विदेशयात्रा असं त्यांचं कार्यक्षेत्र सर्वसमावेशक आहे. गुरु, संरचनाकार,वाग्गेयकार तर त्या होत्याच पण नृत्यविषयक लेखन करणं, विद्यापीठीय चर्चासत्रात शोधनिबंध वाचणं अशा वैचारिक आणि अकादमिक पातळीवरही त्यांचं योगदान अनन्य आहे.

एका व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाचा आधार असलेली पुण्यातली ही आद्य नृत्यसंस्था. कोणतेही सरकारी वा अन्य खाजगी आस्थापनांचे आर्थिक पाठबळ नसूनही गुणवत्ता आणि निष्ठा या दुर्मिळ होत चाललेल्या गुणांच्या भक्कम पायावर उभी असलेली. १९५० च्या आसपास सुरु झालेला पुण्याचा ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सव’ किंव पी. डी. ए. सारखी नाट्यसंस्था डोळ्यांपुढे आणली तर ‘नृत्यभारती’नं सुरु केलेल्या नृत्यचळवळीचं महत्त्व लक्षात येईल. आज इथे विविध नृत्यशैलींचे अनेक वर्ग सुरु आहेत.असंख्य विद्यार्थी नृत्यकलेचं शिक्षण घेत आहेत. उत्तरेकडच्या लोकांना इथल्या नृत्याची दखल घ्यावीच लागते आहे. इथे नृत्यचळवळ उभी करण्याचं आणि कथकच्या रूढ चौकटीला रुंदावण्याचं श्रेय, निखालसपणे रोहिणीताई-‘नृत्यभारती’ यांचं आहे.

वस्तुतः कथक ही उत्तर भारतामधली कला. महाराष्ट्राला तिचे नावही अपरिचित होते तेव्हा ही कथकची परंपरा जणू भगीरथ प्रयत्नांनी इथल्या मातीत, या ‘राकट,कणखर दगडांच्याही देशात’त्यांनी रुजवली. आज पुणं हे दक्षिणेतलं महत्त्वाचं कथक केंद्र म्हणून मान्यता पावलं आहे, ही त्यांची आपल्याला अभिमान वाटावा, अशी मौलिक ठेवा आहे.

‘नृत्यभारती’च्या या वैभवशाली इतिहासात प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यांवर वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम झाले.संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात म्हणजे १९७२ साली ह्या संस्थेची अधिकृत नोंदणी झाली.त्यानंतर संस्थेला ४० वर्ष झाल्यानिमित्त,सुवर्णमहोत्सवी वर्षात आणि संस्थेला ७० वर्ष झाल्यानिमित्त झालेले वैविध्यपूर्ण कार्यक्रम पुणेकरांच्या स्मरणात आहेत.या वर्षी करोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष जरी नाही तरी आभासी मंचावर वर्षभर कार्यक्रममालिकेचं आयोजन केलं आहे. १० जुलैला ‘स्मृतिगंध’ हा कार्यक्रम होणार असून त्यामध्ये संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त केलेल्या मोठ्या सोहळ्याचा पुनःप्रत्यय मिळणार आहे. या कार्यक्रमात रोहिणीताईंचं स्वतःचं नृत्य आणि त्यांनी निर्मिलेल्या काही रचनांचं संक्षिप्त दर्शन घडेल.तर या वर्षातील प्रत्येक महिन्यात एक पूर्ण लांबीचा कार्यक्रम, संस्थेतील नवोदित कलाकारांचं नृत्यसादरीकरण,तज्ज्ञांशी चर्चा,मुलाखती असे ... भरगच्च कार्यक्रम असणार आहेत.१० जुलै रोजी होणारा ‘स्मृतिगंध’ हा कार्यक्रम संध्याकाळी ७ वाजता ‘नृत्यभारती’च्या फेसबुक पेजवर पाहता येईल.