शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

वकिलांना माफी मागण्याचा आदेश

By admin | Updated: July 7, 2015 05:11 IST

खंडपीठासाठी पुण्यातील वकिलांनी केलेल्या आंदोलनाबद्दल माफी मागावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पुणे बार असोसिएशनला दिला आहे.

पुणे : खंडपीठासाठी पुण्यातील वकिलांनी केलेल्या आंदोलनाबद्दल माफी मागावी तसेच भविष्यात अशा प्रकारचे आंदोलन करणार नाही हे प्रतिज्ञापत्रावर दाखल करावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पुणे बार असोसिएशनला दिला आहे. मुंबई उच्च न्यायलयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि रेवती डेरे यांनी हा आदेश दिला आहे.पुण्याला खंडपीठ मिळावे या मागणीसाठी वकिलांनी १६ दिवस न्यायालयीन कामकाज बंद केले. वकिलांच्या बंदमुळे त्रास होत असल्याची तक्रार मुंबई उच्च न्यायालयाकडे दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने ही तक्रार जनहित याचिका म्हणून दाखल करुन घेतली. या याचिकेवर झालेल्या सुनावणीत पुण्यातील आंदोलनाबाबत सोमवारपर्यंत निर्णय कळविण्याचा आदेश दिला होता.पुण्यातील वकिलांनी खंडपीठ मागणीसाठी सुरु केलेले आंदोलन मागे घेण्यात आले असल्याची माहिती, असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. गिरीश शेडगे आणि पदाधिकाऱ्यांनी सोमवारी उच्च न्यायालयात दिली.पुणे बार असोसिएशनने पुन्हा बंद करणार नाही. केलेल्या बंदसंदर्भात माफी मागणार का व तसे प्रतिज्ञापत्रावर दाखल करावे. बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवाने आजपर्यंत पुणे बार असोसिएशनच्या व जिल्ह्यातील वकिलांवर काय कारवाई केली, त्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल करावे. तसेच त्या वकिलांवर डिसिप्लीनरी अ‍ॅक्शन घ्यावी. तसे प्रतिज्ञापत्र दाखल करावे. व्हॉटसअ‍ॅपवर बदनामीकारक धमकी देणारे एसएमएस पाठविले असतील तर अर्जदाराने न्यायालयात दाखल करावे. जिल्ह्यात काय परिस्थिती आहे ? कोणी वकील कामावर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न करतोय का याचा अहवाल मुख्य प्रबंधक उच्च न्यायालय यांनी २० जुलै रोजी दाखल करावा, असा आदेश न्यायमूर्ती अभय ओक आणि रेवती डेरे यांनी दिला.> दरम्यान गेली १६ दिवस वकिलांच्या बंदमुळे शुकशुकाट असलेले न्यायालय सोमवारी पुन्हा पहिल्यासारखे गजबजले. दिवसभर कोटार्तील वकिलांमध्ये बंदबाबत चर्चा सुरु असल्याचे चित्र होते. अनेक वकिलांच्या आंदोलनामध्ये सर्वाधिक फटका आरोपींना बसला. आरोपींना जामिन न मिळाल्यामुळे अनेकांची येरवडा जेलमध्ये रवानगी झाली होती सोमवारी सर्वाधिक जामिनाच्या केसेसवर सुनावणी झाली.> पुण्याला खंडपीठ मिळावे ही पुण्यातील वकिलांची गेल्या अनेक वषार्पासूनची मागणी असून १९७८ मध्ये खंडपीठासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी तसेच पुण्याला यासंदर्भात बाजू मांडण्यासाठी तातडीने संधी देण्यात यावी, असे पत्र सोमवारी उच्च न्यायालयात दिले असल्याची माहिती अ‍ॅड. शेडगे यांनी दिली.