शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

खंडपीठासाठी वकिलांचा लक्षवेधी लढा

By admin | Updated: June 29, 2015 06:53 IST

मुंबई उच्च न्यायालयाचे पुण्यात खंडपीठ व्हावे म्हणून मागील २५ वर्षांपासून पुण्यातील वकिलांच्या संघटनेचा संघर्ष सुरू आहे.

हिना कौसर खान-पिंजार, पुणेपुणे : मुंबई उच्च न्यायालयाचे पुण्यात खंडपीठ व्हावे म्हणून मागील २५ वर्षांपासून पुण्यातील वकिलांच्या संघटनेचा संघर्ष सुरू आहे. विधी मंडळात १९७८ मध्येच पुणे आणि औरंगाबादला खंडपीठ मिळावे, असा ठराव मंजूर झाला; मात्र त्यानंतर या ठरावाला जो खो मिळाला तो अद्याप कायम आहे. कोल्हापूरबरोबर आपली स्पर्धा टिकवून ठेवून त्यांच्यापेक्षा किंवा त्यांच्यासह खंडपीठासाठी पुण्याचा हा झगडा सुरूच आहे. मात्र, यंदाच्या वर्षी वकिलांकडून ज्यापद्धतीने ऐकीचे दर्शन घडत लढा उभा राहिला आहे ते पाहण्यायोग्य आहे.मागील पाच वर्षांचा जरी खंडपीठासाठी झालेल्या आंदोलनांचा विचार केला, तरीही यंदाचे वर्ष त्यात निश्चितच बाजी मारेल, असे चित्र आहे. मागील पाच वर्षांत काही ठराविक ५०-७० पेक्षा वकिलांची संख्या प्रत्यक्षात संघटित झाल्याचे दिसले नाही, तसेच केवळ निवेदने देणे या पलीकडे आंदोलनाने रंग घेतला नाही. कोणतेही आंदोलन यशस्वी होण्यासाठी संघटित लोकांची संख्या ही प्रत्यक्षात, रस्त्यावर दिसणे आवश्यक असते, केवळ पाठिंबा आहे म्हणून मोकळे होण्याला अर्थ नसतो. एखादी गोष्ट घडविण्यासाठी दबावयंत्र आवश्यक असते आणि त्यासाठी दृश्य स्वरूपातील पाठिंबाही दिसावा लागतो आणि यंदा तेच घडले. प्रत्यक्षातील कामकाज बंदचा निर्णय झाल्यावर प्रत्यक्षात वकिलांनी ऐकी दाखवत मोठ्या प्रमाणात जमावातही दिसले. विधानभवनच्या मोर्चाला पावसाचा दिवस असतानाही मोठ्या संख्येने वकील रस्त्यावर दिसले. याचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कारण हे ज्युनियर वकिलांचा सहभाग,हेही आहे. आपल्या वकील संघटनेने व वरिष्ठ वकिलांनी एकत्रित येऊन कामकाज बंदचा निर्णय छेडल्यानंतर प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात वकिलांचा दबावगट मोठा काम करीत आहे. अभी नही तो कभी नही४न्यायालयीन कामकाज बंदचे हे आंदोलन छेडलेच आहे, तर ते मधेच बंद करण्याला अर्थ नाही. जोपर्यंत उच्च न्यायालयाकडून काहीतरी ठोस उत्तर येत नाही, चर्चेला बोलावले जात नाही तोपर्यंत माघार घेऊ नये, हा विचार यंदा सर्वांनी स्वीकारल्याचे दिसते. केवळ बोळवण झाली, तरी शांत व्हायचे यामुळे मागील २५ वर्षांपासूनची ही मागणी अशीच अधांतरी राहिली, याची जाणीव झाल्याचे दिसते. शिवाय या वेळेस मोठ्या प्रमाणात वकील एकत्रित आले आहेत, ते पुन्हा असे एकत्रित येतीलच का, याविषयी ठामपणे स्वत: वकीलही सांगू शकत नाहीत. त्यामुळे ‘अभी नही तो कभी नही’ म्हणत सगळेच जण कामाला लागल्याचे दिसत आहे.