शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

भाटघर धरणात ९ टक्के पाणीसाठा

By admin | Updated: April 4, 2016 01:27 IST

दिवसेंदिवस वाढत चाललेली उन्हाची तीव्रता आणि पावसाळा सुरूहोण्यास अजून दोन ते अडीच महिने शिल्लक आहेत. मात्र, भोर तालुक्यातील भाटघर धरणात फक्त ९ टक्के तर नीरा देवघर धरणात

भोर : दिवसेंदिवस वाढत चाललेली उन्हाची तीव्रता आणि पावसाळा सुरूहोण्यास अजून दोन ते अडीच महिने शिल्लक आहेत. मात्र, भोर तालुक्यातील भाटघर धरणात फक्त ९ टक्के तर नीरा देवघर धरणात २९ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे दोन्ही धरणभागात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई सुरू झाली आहे. नागरिक व जनावरांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. टँकर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.बारामती व फलटण तालुक्यातील डाव्या व उजव्या कालव्यांना शेतीसाठी १५ मार्चपासून नीरा देवघर धरणातून ७५० क्युसेक्सने तर भाटघर धरणातून ७०० क्युसेक्सने पाणी नीरा नदीत सोडले आहे. भोर तालुक्यात २०१५ साली पाऊस कमी प्रमाणात झाल्याने दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने न भरता ७० टक्केच भरली होती. तरीही भाटघर धरणातून पाणी खाली सोडल्याने धरणातील पाणीसाठा आता ९ टक्क्यांवर आला आहे. नीरा देवघर धरणातही २९ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे पाण्याचा खांडवा भांडवली गावाच्या खाली आला आहे. पावसाळा सुरू होण्यास अद्याप अडीच महिने बाकी असून धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने दोन्ही धरणभागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.भाटघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणात असणाऱ्या विहिरी कोरड्या पडत असल्याने हर्णस, जोगवडी, आस्कवडी, डेरे, म्हशीवली, कांबरे खुर्द, कुरुंजी यांच्यासह अनेक गावांतील विहिरीतील मोटरी बंद पडत आहेत. त्यामुळे दुसरी मोटर घेऊन मोटर विहिरीपासून धरणाच्या पात्रापर्यंत एक ते दोन किलोमीटरवर पाण्यात टाकून ते पाणी विहिरीत सोडून उचलले जात आहे. यामुळे अनेक गावांत दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. यामुळे अनेकदा गाळमिश्रित पाणी पुरवठा होत आहे. दोन मोटारींमुळे वीजबिल अधिक प्रमाणात येत आहे. नवीन पाईप घेणे, त्याला वायर व मंजुरी ही कामे दरवर्षी उन्हाळ्यात करावी लागतात. मात्र हे ग्रामपंचायतींना परवडत नसल्याचे कुरुंजीचे उपसरपंच ज्ञानेश्वर नलावडे यांनी सांगितले. नीरा देवघर धरणभागातील रिंगरोड, धारांबे, पऱ्हर खुर्द, पऱ्हर बु., निवंगण, धानवली, शिरवली हि.मा., चौधरीवस्ती, कुडली खुर्द, कुडली बु., दुर्गाडी तर महाड-पंढरपूर रोडवरील शिरगाव, सोमजाई वस्ती, सुईरमाळ, कारुंगण यासह अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरु झाली आहे. > एक किलोमीटरवरुन आणावे लागते पाणीवेल्हे तालुक्यातील बारा मावळ परिसरातील गुंजवणे येथील दरडिगेवस्ती येथील ग्रामस्थांना एक किलोमीटरवरून खोल दरीतून पाणी आणावे लागत आहे. लव्ही येथील ग्रामस्थांनादेखील तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गावातील पाणीपुरवठा योजनेची विहीर नदीपात्रात आहे. परंतु, नदीतच पाणी नसल्याने विहिरीला पाणी नाही, तीन-चार दिवसांतून एकदा नळाला पाणी सोडले जाते, अशी माहिती पोलीस पाटील तानाजी रेणुसे व उपसरपंच अशोक रेणुसे यांनी दिली आहे.याबाबत टँकरचा प्रस्ताव २० दिवसांपूर्वी पंचायत समितीकडे पाठविला आहे, परंतु अद्यापही या गावात टँकर सुरू झाला नाही. या परिसरातील सणसवाडी, देवपाल, चराटवाडी, वाजेघर गावांना पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे. या परिसरातील विविध गावातील पाणीपुरवठा योजना या नदीवरील पाण्यावर अवलंबून आहेत. तर या गावातील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाण्याविना जनावरांचेदेखील मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.गुंजवणी धरण उशाला असले तरी, या धरणावरून कोणतीही योजना न झाल्याने गावा-गावांत पाणीप्रश्न निर्माण झाला आहे.