शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भाटघर धरणात ९ टक्के पाणीसाठा

By admin | Updated: April 4, 2016 01:27 IST

दिवसेंदिवस वाढत चाललेली उन्हाची तीव्रता आणि पावसाळा सुरूहोण्यास अजून दोन ते अडीच महिने शिल्लक आहेत. मात्र, भोर तालुक्यातील भाटघर धरणात फक्त ९ टक्के तर नीरा देवघर धरणात

भोर : दिवसेंदिवस वाढत चाललेली उन्हाची तीव्रता आणि पावसाळा सुरूहोण्यास अजून दोन ते अडीच महिने शिल्लक आहेत. मात्र, भोर तालुक्यातील भाटघर धरणात फक्त ९ टक्के तर नीरा देवघर धरणात २९ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे दोन्ही धरणभागात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई सुरू झाली आहे. नागरिक व जनावरांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. टँकर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.बारामती व फलटण तालुक्यातील डाव्या व उजव्या कालव्यांना शेतीसाठी १५ मार्चपासून नीरा देवघर धरणातून ७५० क्युसेक्सने तर भाटघर धरणातून ७०० क्युसेक्सने पाणी नीरा नदीत सोडले आहे. भोर तालुक्यात २०१५ साली पाऊस कमी प्रमाणात झाल्याने दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने न भरता ७० टक्केच भरली होती. तरीही भाटघर धरणातून पाणी खाली सोडल्याने धरणातील पाणीसाठा आता ९ टक्क्यांवर आला आहे. नीरा देवघर धरणातही २९ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे पाण्याचा खांडवा भांडवली गावाच्या खाली आला आहे. पावसाळा सुरू होण्यास अद्याप अडीच महिने बाकी असून धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने दोन्ही धरणभागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.भाटघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणात असणाऱ्या विहिरी कोरड्या पडत असल्याने हर्णस, जोगवडी, आस्कवडी, डेरे, म्हशीवली, कांबरे खुर्द, कुरुंजी यांच्यासह अनेक गावांतील विहिरीतील मोटरी बंद पडत आहेत. त्यामुळे दुसरी मोटर घेऊन मोटर विहिरीपासून धरणाच्या पात्रापर्यंत एक ते दोन किलोमीटरवर पाण्यात टाकून ते पाणी विहिरीत सोडून उचलले जात आहे. यामुळे अनेक गावांत दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. यामुळे अनेकदा गाळमिश्रित पाणी पुरवठा होत आहे. दोन मोटारींमुळे वीजबिल अधिक प्रमाणात येत आहे. नवीन पाईप घेणे, त्याला वायर व मंजुरी ही कामे दरवर्षी उन्हाळ्यात करावी लागतात. मात्र हे ग्रामपंचायतींना परवडत नसल्याचे कुरुंजीचे उपसरपंच ज्ञानेश्वर नलावडे यांनी सांगितले. नीरा देवघर धरणभागातील रिंगरोड, धारांबे, पऱ्हर खुर्द, पऱ्हर बु., निवंगण, धानवली, शिरवली हि.मा., चौधरीवस्ती, कुडली खुर्द, कुडली बु., दुर्गाडी तर महाड-पंढरपूर रोडवरील शिरगाव, सोमजाई वस्ती, सुईरमाळ, कारुंगण यासह अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरु झाली आहे. > एक किलोमीटरवरुन आणावे लागते पाणीवेल्हे तालुक्यातील बारा मावळ परिसरातील गुंजवणे येथील दरडिगेवस्ती येथील ग्रामस्थांना एक किलोमीटरवरून खोल दरीतून पाणी आणावे लागत आहे. लव्ही येथील ग्रामस्थांनादेखील तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गावातील पाणीपुरवठा योजनेची विहीर नदीपात्रात आहे. परंतु, नदीतच पाणी नसल्याने विहिरीला पाणी नाही, तीन-चार दिवसांतून एकदा नळाला पाणी सोडले जाते, अशी माहिती पोलीस पाटील तानाजी रेणुसे व उपसरपंच अशोक रेणुसे यांनी दिली आहे.याबाबत टँकरचा प्रस्ताव २० दिवसांपूर्वी पंचायत समितीकडे पाठविला आहे, परंतु अद्यापही या गावात टँकर सुरू झाला नाही. या परिसरातील सणसवाडी, देवपाल, चराटवाडी, वाजेघर गावांना पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे. या परिसरातील विविध गावातील पाणीपुरवठा योजना या नदीवरील पाण्यावर अवलंबून आहेत. तर या गावातील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाण्याविना जनावरांचेदेखील मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.गुंजवणी धरण उशाला असले तरी, या धरणावरून कोणतीही योजना न झाल्याने गावा-गावांत पाणीप्रश्न निर्माण झाला आहे.