शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

अतिवृष्टीत जिल्ह्यात शेती व घरांचे ७० कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मागील आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या धुवाधार पावसाने शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मागील आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या धुवाधार पावसाने शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या बाधित गावांमध्ये पंचनामे करण्याचे काम सुरू असून, पुढील दोन दिवसांत अंतिम अहवाल येणार आहे. दरम्यान प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात नुकसान भरपाईसाठी किमान ७० कोटी रुपयांची गरज असून जिल्हा प्रशासनाने शासनाकडे निधीची मागणी केली आहे.

जिल्ह्यात प्रामुख्याने घाटमाथ्यावर मागील आठवड्यात गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीत व ढगफुटीसदृश पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीचे व शेतपिके आणि जमिनीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये शेती पिकांचे ३ हजार १८३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून यात तब्बल ९ हजार ९९३ शेतकरी बाधित झाले आहेत. तर ७१७ हेक्टरवरील शेती खरडून गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भात उत्पादक शेतक-यांचे बांध पुराच्या पाण्यात वाहून गेले असून, कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळेच अंतिम पंचनामे झाल्यानंतर खरडून गेलेल्या जमिनीची आकडेवारीत मोठी वाढ होणार आहे.

पुणे जिल्ह्यात खेड, आंबेगाव, जुन्नर, भोर, वेल्हे, मावळ मुळशी पश्चिम घाट माथ्यावर तुफान पाऊस झाला. अतितीव्र पावसामुळे मावळ भागातील भात पिके तसेच जमिनीचे बांध फुटणे जमीन खरडून जाणे अशा प्रकारचे नुकसान झाले आहे. याशिवाय ३२१ घरांची पडझड झाली असून, वेल्हा तालुक्यातील नागरिकांना मोठा फटका बसला आहे.

-----

जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका प्राथमिक अंदाज

एकूण बाधित गावे : ४२०

एकूण मयत व्यक्ती : ०३

बेपत्ता व्यक्ती : ०१

एकूण मयत पशुधन : ०८

घरांची पडझड : ३२१

बाधित शेतकरी : १००१८