शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

थेंबाथेंबांतून साठवले दीड लाख लिटर पाणी

By admin | Updated: July 15, 2014 03:52 IST

पावसाचे जमिनीवर पडलेले भूगर्भात १५० फूट खाली पोहोचण्यासाठी सुमारे २५ वर्षांचा कालावधी लागतो.

पुणे : पावसाचे जमिनीवर पडलेले भूगर्भात १५० फूट खाली पोहोचण्यासाठी सुमारे २५ वर्षांचा कालावधी लागतो. मात्र, हेच पावसाचे पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंगद्वारे योग्य नियोजन करून आपल्या बोअरवेल्सच्या माध्यमातून भूगर्भात सोडल्यास अवघ्या २५ सेकदांत ते १५० फूट खोल जाते. ही बाब लक्षात घेऊनही आपण नगरसेवक म्हणून केवळ इतरांना पाणीबचतीचे संदेश न देता, ही पाणीबचत आपल्या कृतीत उतरवून लाखो लिटर पाण्याची बचत करण्याबरोबरच इतरांनाही या पाणीबचतीसाठी सहकार्य करण्याचा आदर्श नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी घालून दिला आहे. घर आणि व्यवसायाच्या ठिकाणी यशस्वीरीत्या रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प राबवून, दर वर्षी तब्बल दीड लाख लिटर पाणी भूर्गभात पोहोचवत आहेत. या प्रकल्पाची दखल अनेक सोसायट्यांनी घेतली असून, सुमारे १० ते १२ सोसायट्यांनी हे प्रकल्प सुरूही केलेले आहेत. कोथरूड येथील सहजानंद सोसायटीमध्ये सहस्रबुद्धे यांची मसाला गिरणी आहे. या ठिकाणी त्यांच्या इमारतीस सुमारे १ हजार चौरस फुटाची बाल्कनी आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत या बाल्कनीत पडणारे पावसाचे पाणी कोणताही वापर न करता तसेच वाहून जात होते. त्यामुळे हे पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा लावण्याचा निर्णय घेतला. त्यासाठीची यंत्रणा त्यांनी इंटरनेटवरून शोधली. अखेर अहमदाबाद येथील एका कंपनीस संपर्क साधून त्यांनी ही यंत्रणा सुरू केली. हे पावसाचे साचणारे सर्व पाणी त्यांनी गिरणीसाठी घेतलेल्या बोअरवेलमध्ये भूगर्भात सोडले. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी प्रत्येक उन्हाळ्यात सहा मिनिटेही न चालणारी त्यांची बोअरवेल गेली दोन वर्षे अविरत सुरू आहे. हीच यंत्रणा त्यांनी आपल्या एरंडवण्यातील घरातही राबविली. या ठिकाणी २४०० चौरस फुटांचे टेरेस असून, त्यावर पडणारे पावसाचे पाणीही त्यांनी बोअरवेलमध्येच सोडले आहे. या दोन्ही प्रकल्पांतून दर वर्षी सव्वादोन लाख लिटर पाणी भूगर्भात सोडले जात असल्याचे सहस्रबुद्धे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.(प्रतिनिधी)