शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
3
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
4
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
5
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
6
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
7
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
8
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
9
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
10
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
11
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
13
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
14
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
15
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
16
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
17
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
18
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
19
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
20
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...

नाट्यातून उलगडले महिलांचे भावविश्व

By admin | Updated: July 3, 2017 03:00 IST

लोकमत सखी मंच आणि कै. मनिषा भाऊसाहेब भोईर ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अशा या दोघी’ नाटकास सखींचा

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : लोकमत सखी मंच आणि कै. मनिषा भाऊसाहेब भोईर ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अशा या दोघी’ नाटकास सखींचा उदंड प्रतिसाद मिळाला. चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित हे नाटक पाहण्यासाठी सखींनी मोठी गर्दी केली होती. खचाखच भरलेले प्रेक्षागृह या दोन अंकी नाटकात स्त्रियांचे भावविश्व उलगडण्यात आले.  माधव (सुजीत देशपांडे) आणि माया (ऋचा श्रीखंडे) हे तरूण जोडपे यांच्याभोवती नाटकाची कथा आहे. माधव मध्यमवर्गीय क़ुटूंबातील, साध्या विचारांचा तर माया श्रीमंत घरात वाढलेली उच्च विचार करणारी अशी विसंगत परिस्थिती असताना, माधव वेळोवेळी तडजोडी कशा करतो.माया आणि माधव या दोघांच्या विचारात मोठी तफावत तरिही माधव आयुष्य आनंदित करण्याचा कसा प्रयत्न करतो. कोणत्याही परिस्थितीत, तडजोड स्विकारून परिस्थितीवर मात करणे हाच गुण हेरुन मायाने माधवशी लग्न केलेले असते.दोन टोकाच्या परिस्थितीतील व्यकती एकत्र येतात. त्यांच्यात छोट्या मोठ्या गोष्टींवरून उद्भवणारा वाद कसा असतो. वैचारिक मदभेदामुळे कौटुंबिक स्वास्थ्यावर कसा परिणाम होतो. ऐकमकांमध्ये क्षुल्लक कारणावरून कसा दुरावा निर्माण होतो. त्यातील कलह, वैचारिक मतभेद यातून प्रेक्षकांनाही धडा घेण्यासारखे बरेच काही मिळाले. नाटकातील दुसरे जोडपे म्हणजे विश्वनाथ (निखिल केंजळे) आणि प्रतिभा (किरण नागपुरे) होय. या जोडप्याच्या माध्यमातून नाटकात महिलेला घरात कशी वागणूक दिली जाते. एक महिला ही माणूस नसून केवळ उपभोगाची वस्तू आहे, अशा पद्धतीने तिला दिली जणारी वागणूक याचे वास्तव या नाट्यप्रयोगात एका जोडप्याच्या माध्यमातून प्रेक्षकांपुढे मांडले आहे. स्त्रीला सन्मानाची वागणूक दिली जात नाही. समाजव्यवस्थेत अद्यापही स्त्रीला दुय्यम वागणूक दिली जाते. हे नाटकातील दृश्य पाहून प्रेक्षकांचे मन सुन्न होते. विश्वनाथकडून प्रतिभाला पत्नी म्हणुन वागणूक कशी मिळाली. हे पाहत असताना,नाटकातील आणखी दोन पात्र माधवचा मित्र वसंता आणि मायाचा बॉस या दोन व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. स्त्री पुरूषांमधील वैचारिक मतभेद किती टोकाला गेले तरी हे नाजूक नाते कसे जपावे, याविषयी या व्यक्तिरेखा बरेच काही सांगून जातात नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर आणि प्रशांत गिरमकर हे दिग्दर्शक आहेत. लेखक गवाणकर यांनी समजातील वास्वव आपल्या लेखणीतून नाट्यरूपात उतरिवले आहे. तर दिग्दर्शक गिरमकर यांनी हे वास्तव रंगमचांवर यशस्वीपणे उतरविण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. कलाकारांनी आपल्या दर्जेदार अभिनयाचे दर्शन घडविले आहे. कार्यक्रमास पुष्पा गव्हाणे, गीतल गोलांडे उपस्थित होत्या.लोकमतने सखी मंचच्या माध्यमातून एक नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. महिलाप्रधान नाटक म्हणून ‘अशा या दोघी’ या नाटकाची निवड केली. नाटक हे असे एक माध्यम आहे, त्यातून मनोरंजनच नव्हे तर प्रबोधनाचे ते एक साधन आहे. अशा या दोघी या नाटकात महिलांच्या दोन टोकांच्या विचारसरणी कशा असतात, याचे सादरीकरण अत्यंत उत्तम पद्धतीने करण्यात आले आहे.- भाऊसाहेब भोईर, उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद