शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सुटणार कधी?

By admin | Updated: January 22, 2017 04:43 IST

महागांव चांदखेड जिल्हा परिषद गट मावळ तालुक्याच्या पूर्वेला असलेल्या सांगवडे या गावापासून सुरू होतो, तर पश्चिमेच्या शेवटच्या टोकाला म्हणजे तुंग गावाजवळ संपतो.

पवनानगर : महागांव चांदखेड जिल्हा परिषद गट मावळ तालुक्याच्या पूर्वेला असलेल्या सांगवडे या गावापासून सुरू होतो, तर पश्चिमेच्या शेवटच्या टोकाला म्हणजे तुंग गावाजवळ संपतो. या गणात ४९४५१ मतदार संख्या आहे. पवना धरण, कासरसाई धरण, मळवंडी धरण, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, तुंग, तिकोणा, लोहगड, विसापुर किल्ले, प्रतिपंढरपूर दुधिवरे, बेडसे लेणी आदी प्रमुख ठिकाणे या गटात येतात. या गट पुर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ताब्यात होता. २०१२ मधील निवडणुकीत तो भाजपाच्या ताब्यात गेला. भौगोलिक दृष्ट्या डोंगरालगतची गावे व ऐतिहासिक स्थळे व भरपुर पाण्याची साठवण असलेला हा गट आहे. शेती व कुकुटपालन फुलशेती शेळी पालन दुग्ध व्यवसाय हे जोड व्यवसाय या भागातील उत्पादनाचे मुख्य स्त्रोत्र आहे. पवना धरणातून नेण्यात येणारी बंद जलवाहीनी प्रकल्प कायम रद्द व्हावा. पवना, पुसाणे धरणग्रस्तांचा प्रश्न सुटलेला नाही. मळवंडी ठुले धरणग्रस्थांचा प्रश्नही प्रलंबितच आहे. येथिल रस्ते सुधारून ्र प्रत्येक गावात एस्टी बस जावी. या विभागाला पर्यटन स्थळ म्हणून घोषीत करावे. पर्यटनाला चालना दिल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पवनानगर, शिवणे चांदखेड, करुंज, बेबडओहळ, जवण, शिळीम येथे बस थांबे उभारावेत. चांदखेड येथे मुलीसांठी महाविद्यालय उभारणे गरजेचे आहे. मुबलक पाणी असूनही अनेक गावे पाणी टंचाईग्रस्त आहेत. आढले डोणे प्रादेशिक पाणी योजना बंदच आहे. गुलाब फुले, पालेभाज्या, इंद्रायणी तांदुळ, दुध यासाठी बाजारपेठ उपलब्ध करणे आणि पवनानगर, चांदखेड, बेबडओहळ येथे आठवडे बाजार सुरू करणे गरजेचे आहे. पवना कृषक सेवा शेतकरी संस्थेला उर्जितावस्था आणावी, अनेक गावातील स्मशानभूमी शेड उभारावे आदी मागण्याही आहेत. ग्रामीण भागातील मुलांचे शिक्षण सुधारणे गरजेचे आहे. बेबडओहळ येथील पुलाचे काम संथगतीने सुरू आहे, ते काम लवकर पूर्ण करावे. शिवणे- सडवली दरम्यान पवना नदीवर पूल व्हावा. वाहतूक व्यवस्था सुधारणे गरजेचे आहे. - राजेंन्द्र देशमुख, बेबडओहळ तालुक्यातील आणि या गटातील तरूणांना रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. या भागातील सर्व रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्याची तातडीने डागडुजी आणि दुरस्ती करावी. प्रत्येक गावातील अंतर्गत रस्त्याची कामे व्हावीत. धरणग्रस्तांचे योग्य पद्धतीने पुर्नवसन व्हावे. - तानाजी शेंडगे, मा उपसरपंच करूंज विज पाणी रस्ते हया महत्वाच्या समस्या आसल्या तरी बेरोजगार युवकांना रोजगार निर्माण करणे हे.या गटासाठी मोठे काम आहे हा संपुर्ण भाग निर्सग सैदयार्ने नटलेला आसल्याने अ‍ॅग्रो टुरिझम मार्फत युवकांना चांगला व्यवसाय मिळू शकतो . रस्त्याची दुरावस्था आहे ते आधिक चांगले झाले तर दळणवळण वाढेल व शेतकयार्ना बाजारात शेतमाल नेण्यासाठी मदत होईल. - ज्ञानेश्वर आडकर, माजी सरपंच शिवली महागांव चांदखेड गट हा डोगराळ भागात आसून या भागातील मुलांचे शिक्षणाचे हाल आदयाप सुरू आहे पुणेजिल्हा परिषदेने या भागाचा भैगोलाक आभ्यास करून मुलांना त्या भागातच उच्च शिक्षणापर्यत सुविधा पुरवणे गरजेचे आहे. तर तुंग तिकोणा लोहगड किल्याचा पुरतत्व खात्याकडे पाठपुराव करून या ठिकाणी पर्याटन स्थळ केली तर मोठयाप्रमाणात लघुउदयोगांना चालना मिळेल.- प्रकाश म्हस्कर, तुंग गटातील गरजू महिलांसाठी पवनानगर येथे रोजगार प्रशिक्षण मिळावे. आवश्यक तेथे शौचालये उभारावीत पवनानगर येथे पोलिस चौकी उभारावी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नियमीत आणि सक्षम करावी. याबाबतच्या समस्या दूर कराव्यात -वैशाली खुंटाळे, पवनानगर वाडी-वस्त्यावर पाणी पोहोचणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारून ग्रामीण मुलांना चांगले शिक्षण मिळावे. जिल्हा परिषदेच्या शाळांना व अंगणवाडीला इमारती नवीन मिळाव्या. तालुक्यातून जेवढे सदस्य जिल्हा परिषदेवर निवडून जातील, त्यांनी तालुक्यासाठी जादा निधी आणावा. - नामदेव ठुले, माजी सरपंच मळवंडी ठुले.पवनमावळात गावागावापर्यत रस्ते पोचले आहे परंतु आंर्तरगत रस्ते होणे गरजेचे आहे. या भागातील सुवासिक इंद्रायणी तांदळाला पुणे मुंबई महामार्गावर विक्रीसाठी एक केंद्र तयार करून दिले तर पुर्ण देशात या तांदळाला मागणी वाढेल या साठी जिल्हा परिषद सदस्याने पुढाकार घ्यावा .- सुदाम घारे, येलघोल