शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
6
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
7
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
8
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
9
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
10
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
11
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
12
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
13
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
14
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
15
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
16
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
17
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
18
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
19
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
20
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र

धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सुटणार कधी?

By admin | Updated: January 22, 2017 04:43 IST

महागांव चांदखेड जिल्हा परिषद गट मावळ तालुक्याच्या पूर्वेला असलेल्या सांगवडे या गावापासून सुरू होतो, तर पश्चिमेच्या शेवटच्या टोकाला म्हणजे तुंग गावाजवळ संपतो.

पवनानगर : महागांव चांदखेड जिल्हा परिषद गट मावळ तालुक्याच्या पूर्वेला असलेल्या सांगवडे या गावापासून सुरू होतो, तर पश्चिमेच्या शेवटच्या टोकाला म्हणजे तुंग गावाजवळ संपतो. या गणात ४९४५१ मतदार संख्या आहे. पवना धरण, कासरसाई धरण, मळवंडी धरण, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, तुंग, तिकोणा, लोहगड, विसापुर किल्ले, प्रतिपंढरपूर दुधिवरे, बेडसे लेणी आदी प्रमुख ठिकाणे या गटात येतात. या गट पुर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ताब्यात होता. २०१२ मधील निवडणुकीत तो भाजपाच्या ताब्यात गेला. भौगोलिक दृष्ट्या डोंगरालगतची गावे व ऐतिहासिक स्थळे व भरपुर पाण्याची साठवण असलेला हा गट आहे. शेती व कुकुटपालन फुलशेती शेळी पालन दुग्ध व्यवसाय हे जोड व्यवसाय या भागातील उत्पादनाचे मुख्य स्त्रोत्र आहे. पवना धरणातून नेण्यात येणारी बंद जलवाहीनी प्रकल्प कायम रद्द व्हावा. पवना, पुसाणे धरणग्रस्तांचा प्रश्न सुटलेला नाही. मळवंडी ठुले धरणग्रस्थांचा प्रश्नही प्रलंबितच आहे. येथिल रस्ते सुधारून ्र प्रत्येक गावात एस्टी बस जावी. या विभागाला पर्यटन स्थळ म्हणून घोषीत करावे. पर्यटनाला चालना दिल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पवनानगर, शिवणे चांदखेड, करुंज, बेबडओहळ, जवण, शिळीम येथे बस थांबे उभारावेत. चांदखेड येथे मुलीसांठी महाविद्यालय उभारणे गरजेचे आहे. मुबलक पाणी असूनही अनेक गावे पाणी टंचाईग्रस्त आहेत. आढले डोणे प्रादेशिक पाणी योजना बंदच आहे. गुलाब फुले, पालेभाज्या, इंद्रायणी तांदुळ, दुध यासाठी बाजारपेठ उपलब्ध करणे आणि पवनानगर, चांदखेड, बेबडओहळ येथे आठवडे बाजार सुरू करणे गरजेचे आहे. पवना कृषक सेवा शेतकरी संस्थेला उर्जितावस्था आणावी, अनेक गावातील स्मशानभूमी शेड उभारावे आदी मागण्याही आहेत. ग्रामीण भागातील मुलांचे शिक्षण सुधारणे गरजेचे आहे. बेबडओहळ येथील पुलाचे काम संथगतीने सुरू आहे, ते काम लवकर पूर्ण करावे. शिवणे- सडवली दरम्यान पवना नदीवर पूल व्हावा. वाहतूक व्यवस्था सुधारणे गरजेचे आहे. - राजेंन्द्र देशमुख, बेबडओहळ तालुक्यातील आणि या गटातील तरूणांना रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. या भागातील सर्व रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्याची तातडीने डागडुजी आणि दुरस्ती करावी. प्रत्येक गावातील अंतर्गत रस्त्याची कामे व्हावीत. धरणग्रस्तांचे योग्य पद्धतीने पुर्नवसन व्हावे. - तानाजी शेंडगे, मा उपसरपंच करूंज विज पाणी रस्ते हया महत्वाच्या समस्या आसल्या तरी बेरोजगार युवकांना रोजगार निर्माण करणे हे.या गटासाठी मोठे काम आहे हा संपुर्ण भाग निर्सग सैदयार्ने नटलेला आसल्याने अ‍ॅग्रो टुरिझम मार्फत युवकांना चांगला व्यवसाय मिळू शकतो . रस्त्याची दुरावस्था आहे ते आधिक चांगले झाले तर दळणवळण वाढेल व शेतकयार्ना बाजारात शेतमाल नेण्यासाठी मदत होईल. - ज्ञानेश्वर आडकर, माजी सरपंच शिवली महागांव चांदखेड गट हा डोगराळ भागात आसून या भागातील मुलांचे शिक्षणाचे हाल आदयाप सुरू आहे पुणेजिल्हा परिषदेने या भागाचा भैगोलाक आभ्यास करून मुलांना त्या भागातच उच्च शिक्षणापर्यत सुविधा पुरवणे गरजेचे आहे. तर तुंग तिकोणा लोहगड किल्याचा पुरतत्व खात्याकडे पाठपुराव करून या ठिकाणी पर्याटन स्थळ केली तर मोठयाप्रमाणात लघुउदयोगांना चालना मिळेल.- प्रकाश म्हस्कर, तुंग गटातील गरजू महिलांसाठी पवनानगर येथे रोजगार प्रशिक्षण मिळावे. आवश्यक तेथे शौचालये उभारावीत पवनानगर येथे पोलिस चौकी उभारावी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नियमीत आणि सक्षम करावी. याबाबतच्या समस्या दूर कराव्यात -वैशाली खुंटाळे, पवनानगर वाडी-वस्त्यावर पाणी पोहोचणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारून ग्रामीण मुलांना चांगले शिक्षण मिळावे. जिल्हा परिषदेच्या शाळांना व अंगणवाडीला इमारती नवीन मिळाव्या. तालुक्यातून जेवढे सदस्य जिल्हा परिषदेवर निवडून जातील, त्यांनी तालुक्यासाठी जादा निधी आणावा. - नामदेव ठुले, माजी सरपंच मळवंडी ठुले.पवनमावळात गावागावापर्यत रस्ते पोचले आहे परंतु आंर्तरगत रस्ते होणे गरजेचे आहे. या भागातील सुवासिक इंद्रायणी तांदळाला पुणे मुंबई महामार्गावर विक्रीसाठी एक केंद्र तयार करून दिले तर पुर्ण देशात या तांदळाला मागणी वाढेल या साठी जिल्हा परिषद सदस्याने पुढाकार घ्यावा .- सुदाम घारे, येलघोल