शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

शहरवासीयांना पाणपोईची प्रतीक्षा

By admin | Updated: March 27, 2017 02:48 IST

बदलत्या वातावरणामुळे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेचा पारा शहरात वाढत चालला आहे. पुढील चार

रावेत : बदलत्या वातावरणामुळे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेचा पारा शहरात वाढत चालला आहे. पुढील चार महिने शहराला तीव्र उन्हाळ्यास सामोरे जावे लागणार आहे. वाढत्या तापमानामुळे तहानलेल्या नागरिकांची, विद्यार्थ्यांची पावले पाणपोईचा शोध घेत आहेत. मात्र शहरात पाणपोईचाच दुष्काळ असल्याने बाटलीबंद पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. शहरातील नागरिकांना विशेषत: विद्यार्थिवर्ग, वयस्कर व्यक्तींना शुद्ध जल पिण्यासाठी उपलब्ध करण्याची संपूर्ण जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. आपल्या पिंपरी-चिंचवड शहरात शाळा-महाविद्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. चार लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण शिक्षण घेत आहेत. त्यांपैकी १ लाख ६० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अद्याप शालेय परिसरात, महाविद्यालय परिसरात, शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुद्ध पाणी मिळत नसल्याचे प्राधिकरण सुरक्षा समितीच्या सर्वेक्षण पाहणीमध्ये निदर्शनास आले आहे. अनेक गरीब विद्यार्थ्यांना बाटलीमधील पाणी विकत घेऊन पिणे परवडत नाही. त्यामुळे असे विद्यार्थी पाणपोईवर तहान भागवतात. या समितीच्या सदस्यांनी नुकतीच शहरात प्रमुख १६ ठिकाणच्या रस्त्यांवर पाहणी केली. या सर्व ठिकाणी महापालिकेने त्वरित विद्यार्थी शुद्ध पेयजल योजनेंतर्गत पाणपोई उभारण्याची आवश्यक आहे, असा निष्कर्ष नोंदविला. शाहूनगर,चिखली, आळंदी रोड, वाल्हेकरवाडी, रावेत, चिंचवड स्टे, चिंचवडगाव, आकुर्डी रेल्वे स्थानक, मोशी, भोसरी, पिंपरी रेल्वे स्टेशन, निगडी-यमुनानगर, तळवडे, हिंजवडी चौक,वाकड चौक, थेरगाव या प्रमुख १६ ठिकाणांवर त्वरित पेयजल फिल्टर पाणपोई महापालिकेने बसविणे गरजेचे आहे. निगडी प्राधिकरण येथे संभाजी चौैकाजवळ एका दानशूर उद्योजकाने स्वखर्चाने शुद्ध जल पाणपोई उभारली आहे. दररोज हजारो विद्यार्थी, नागरिक, कामगार तिचा लाभ घेत आहेत. गेली अनेक वर्षे सदरची व्यक्ती हजारो रुपये खर्च करून पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करीत आहे. सर्वसाधारण सभेमध्ये सदरचा विषय नवनिर्वाचित नगरसदस्यांनी त्वरित मांडावा आणि ‘शुद्धजल पाणपोई’ विषय मंजूर करवून घ्यावा. महापालिका आयुक्तांनीसुद्धा सदर विषयाकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)... तर उन्हाळा होईल सुसह्ययंदा उन्हाच्या झळा फेब्रुवारीपासूनच जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे रोज उन्हातान्हात पायपीट करणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची आवश्यकता भासत आहे. उपनगरांमधून पिंपरीसारख्या शहरात शिकण्यासाठी हजारो विद्यार्थी येत असतात. शिवाय व्यवसाय, खरेदीसारख्या कामानिमित्तदेखील हजारो नागरिकांची ये-जा असते. या लोकांच्या तहानेचा प्रश्न निर्माण होत असतो. त्यामुळे या लोकांकडून नाईलाजाने बाटलीबंद पाणी खरेदी केले जाते. हा प्रश्न दूर करण्यासाठी महापालिकेने ठराविक अंतरावर शुद्ध पाण्याच्या पाणपोई बसविणे गरजेचे आहे. तसेच या पाणपोईंची नियमित देखभाल ठेवणेही आवश्यक आहे. अशा पाणपोर्इंमुळे यंदाचा उन्हाळा काही प्रमाणात का होईना सुसह्य होईल.