शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

महत्त्वाच्या स्थानकास ग्रासले समस्यांनी

By admin | Updated: January 23, 2017 02:48 IST

पुणे - लोणावळा लोहमार्गावरील मध्यवर्ती ठिकाणी असलेले तळेगाव हे जंक्शन रेल्वे स्थानक असून, प्रवाशांची सर्वात जास्त वर्दळ आहे

तळेगाव दाभाडे : पुणे - लोणावळा लोहमार्गावरील मध्यवर्ती ठिकाणी असलेले तळेगाव हे जंक्शन रेल्वे स्थानक असून, प्रवाशांची सर्वात जास्त वर्दळ आहे. येथील मासिक उत्पन्न दोन कोटी रुपयांच्या आसपास आहे. सुमारे २५ हजार प्रवासी स्थानकावरून रोजची ये - जा करतात. पुणे - मुंबई सिंहगड एक्सप्रेस, भुसावळ - नाशिक एक्सप्रेस या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना येथे जाता-येता थांबा मिळावा, अशी प्रवाशांची अनेक दिवसांपासूनची मुख्य मागणी आहे.या मागणीसाठी मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने अनेकदा आंदोलनेही छेडण्यात आली. शासनाचे व रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रवाशांनी या स्थानकावर रेल रोको आंदोलनही केले. पाठपुरावा करूनही रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या या रास्त मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावत आल्याचा आरोप मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष पोपटराव भेगडे व खजिनदार पांडुरंग भेगडे यांनी केला आहे.तळेगाव दाभाडे येथे केंद्रिय संरक्षण विभागाचा डेपो (डीओडी) असल्याने मालवाहतूक व कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी तळेगाव रेल्वे स्थानक महत्त्वाचे आहे. मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर आदी तालुके व नगर जिल्ह्याचा पश्चिम भाग यांचे मुंबईशी दळणवळण सोयीचे व्हावे, या उद्देशाने ब्रिटिशांनी हे स्थानक उभारले. त्यामुळे डेपोचे कर्मचारी, लष्कराचे जवान, अधिकारी व नागरिक यांची चांगली सोय झाली.नंतरच्या काळात तळेगाव एमआयडीसीची उभारणी झाल्याने तळेगाव दाभाडे शहर व परिसराचा झपाट्याने विकास झाला. आल्हाददायक हवामानामुळे नागरिकांचा सदनिका खरेदीकडे ओढा वाढला. त्यामुळे झपाट्याने नागरीकरण वाढले. साहजिकच रेल्वे प्रवाशांची संख्याही वाढल्याने स्थानकाचा मासिक उत्पन्नाचा आलेख कायम चढता राहिला आहे. या महत्त्वाच्या स्थानकास सध्या समस्यांनी ग्रासले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सोय नाही. दोन्ही फलाटांना जोडणारा एकच पादचारीपूल असल्याने अनेक प्रवासी जीव धोक्यात घालून रुळ ओलांडतात. पादचारी पुलावर छत नसल्याने प्रवाशांचे ऊन, वारा, पाऊस, थंडी यापासून संरक्षण होत नाही. छताअभावी प्रवासी त्रस्त आहेत. पादचारी पुलावरून थेट यशवंतनगर भागात जाता येत नाही. पुलाचे एक्स्टेंशन होणे गरजेचे आहे. दोन्ही फलाटांच्या बाजूला तिकीटघर आहे. पूर्वेकडील तिकीटघराजवळील भाग अस्वच्छ आहे. प्रशासनाने तिकीटघराजवळ ‘येथे थंकू नका ’ असा फलक लावून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तेथे व्यसनी प्रवाशांनी पानाच्या पिचकाऱ्या मारल्याने तो भाग विद्रूप झाला आहे. आरक्षण केंद्रात गर्दीच्या वेळी येथे पाकीटमारी होते. प्रवासांना रेल्वे गाडीत चढताना - उतरताना अनेकदा पाकीटमारीस सामोरे जावे लागते. फलाटावर पोलिसांची कायम गस्त हवी. रात्री तर प्रवासी महिलांचे संरक्षण म्हणजे मोठा प्रश्न आहे. चोहोबाजूंनी गर्दुल्यांचा मुक्त संचार असल्याने प्रवासी भीतीच्या छायेखाली असतात. रात्री प्रवाशांना लुटल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. भुरट्या चोरांचा सुळसुळाट आहे. (वार्ताहर)