शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

जमिनीला भाव आल्याने उद्योगांना टाळे

By admin | Updated: August 5, 2015 03:21 IST

आपल्या फायद्यासाठी उद्योग बंद करून इतर ठिकाणी स्थलांतरित होण्याचा मार्ग उद्योजक पत्करत आहेत. शहरातील जमिनींना मोठा भाव मिळत असल्याने हा मार्ग निवडला जात आहे

मिलिंद कांबळे , पिंपरीआपल्या फायद्यासाठी उद्योग बंद करून इतर ठिकाणी स्थलांतरित होण्याचा मार्ग उद्योजक पत्करत आहेत. शहरातील जमिनींना मोठा भाव मिळत असल्याने हा मार्ग निवडला जात आहे. बांधकाम व्यावसायिकांना जमीन विकून दुसऱ्या ठिकाणीस्वस्तात जमीन मिळवून नव्याने उद्योग सुरू केले जातात. इतरत्र कमी दरात जमीन आणि स्वस्तात कामगार मिळत असल्याने स्थलांतर वाढले आहे. त्याचबरोबर कामगारनेत्यांची अरेरावी, कामगारांशी संघर्ष, वेतनवाढीचा तगादा, कायदेशीर बाबींचा ताप, न्यायालयीन लढा, विजेचा प्रश्न आदी समस्या आणि अडचणींचा बाऊ करून स्थलांतरचा निर्णय घेतला जातो. बेस्ट सिटीकडे वाटचाल होत असल्याने शहरात निवासी क्षेत्र वाढत आहे. पुणे शहरातील नागरिक पिंपरी-चिंचवडकडे वळत आहेत. त्यामुळे येथील जमिनींना सोन्यापेक्षा अधिक भाव आहे. तेथे निवासी आणि व्यापारी संकुल उभारून विक्री केल्यास आतापर्यंत केलेल्या उद्योग उलाढालीइतपत नफा प्राप्त होत असल्याचे चित्र आहे. या दुहेरी फायद्यामुळे स्थलांतराचे प्रमाण थांबण्याचे नाव घेत नाही. यामुळे शहरातील अनेक उद्योग बंद झाले आहेत. टाळे लागल्याने काही उद्योगांच्या इमारती, शेड आणि यंत्रसामग्रीची पडझड झाली आहे. काही जागेत उंच, निवासी आणि व्यापारी संकुल, शॉपिंग मॉल, आयटी हब उभे राहिले आहेत. यंत्रांची धडधड बंद होऊन त्या ठिकाणी चकाचक उंचच उंच इमारती उभ्या राहत आहेत. व्यापारी कार्यालय, तसेच हॉटेल, रेस्टॉरंट, शोरूम आदी व्यवसायासाठी त्यांचा वापर होऊ लागला आहे. काही ठिकाणी निवासी इमारती साकारल्या आहेत. त्यामुळे एमआयडीसीचे व्यापारीकरण आणि नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. या कारणामुळे एमआयडीसीचा मूळ हेतू बाजूला सारला जात आहे. एकापाठोपाठ एक उद्योगधंदे बंद होत असल्याने कामच नसल्याने कामगारवर्गावर उपासमारीची वेळ येण्याचा धोका आहे. स्वयंचलित यंत्रसामग्रीमुळे कामगारांची संख्या पूर्वीच कमी झाली आहे. त्यात उद्योग बंद होत असल्याने कामगारांची मागणी घटत आहे. व्यापारीकरणाचे हे प्रमाण असेच कायम राहिल्यास कामगारांच्या रोजगारावर गदा येण्याची शक्यता आहे. भविष्यात उद्योगनगरीची ओळखच पुसली जाण्याचा धोका नाकारता येत नाही. व्यापारीकरण व नागरीकरणामुळे महापालिकेच्या महसुलावरही विपरीत परिणाम होणार आहे. औद्योगिक क्षेत्रातून प्राप्त होणाऱ्या महसुलाच्या आकडेवारीत कमालीची घट होणार आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक गणित बिघडणार आहे. स्थलांतर केल्याने तेथे रोजगारनिर्मिती होते असे कारण उद्योजक देतात. मात्र, येथील जमीन शेतकऱ्यांनी रोजगार निर्मितीसाठीच दिली होती. मात्र, उद्योगच बंद करून रोजगारच संपविण्याचा हा डाव सुरू आहे. यात मूळ शेतकरी आणि स्थानिकांना रोजगारापासून डावलल्याची भावना वाढत आहे.