शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
4
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
5
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
6
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
7
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
8
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
9
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
10
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
11
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
12
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
13
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
14
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
15
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
16
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
17
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
18
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
19
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
20
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  

जमिनीला भाव आल्याने उद्योगांना टाळे

By admin | Updated: August 5, 2015 03:21 IST

आपल्या फायद्यासाठी उद्योग बंद करून इतर ठिकाणी स्थलांतरित होण्याचा मार्ग उद्योजक पत्करत आहेत. शहरातील जमिनींना मोठा भाव मिळत असल्याने हा मार्ग निवडला जात आहे

मिलिंद कांबळे , पिंपरीआपल्या फायद्यासाठी उद्योग बंद करून इतर ठिकाणी स्थलांतरित होण्याचा मार्ग उद्योजक पत्करत आहेत. शहरातील जमिनींना मोठा भाव मिळत असल्याने हा मार्ग निवडला जात आहे. बांधकाम व्यावसायिकांना जमीन विकून दुसऱ्या ठिकाणीस्वस्तात जमीन मिळवून नव्याने उद्योग सुरू केले जातात. इतरत्र कमी दरात जमीन आणि स्वस्तात कामगार मिळत असल्याने स्थलांतर वाढले आहे. त्याचबरोबर कामगारनेत्यांची अरेरावी, कामगारांशी संघर्ष, वेतनवाढीचा तगादा, कायदेशीर बाबींचा ताप, न्यायालयीन लढा, विजेचा प्रश्न आदी समस्या आणि अडचणींचा बाऊ करून स्थलांतरचा निर्णय घेतला जातो. बेस्ट सिटीकडे वाटचाल होत असल्याने शहरात निवासी क्षेत्र वाढत आहे. पुणे शहरातील नागरिक पिंपरी-चिंचवडकडे वळत आहेत. त्यामुळे येथील जमिनींना सोन्यापेक्षा अधिक भाव आहे. तेथे निवासी आणि व्यापारी संकुल उभारून विक्री केल्यास आतापर्यंत केलेल्या उद्योग उलाढालीइतपत नफा प्राप्त होत असल्याचे चित्र आहे. या दुहेरी फायद्यामुळे स्थलांतराचे प्रमाण थांबण्याचे नाव घेत नाही. यामुळे शहरातील अनेक उद्योग बंद झाले आहेत. टाळे लागल्याने काही उद्योगांच्या इमारती, शेड आणि यंत्रसामग्रीची पडझड झाली आहे. काही जागेत उंच, निवासी आणि व्यापारी संकुल, शॉपिंग मॉल, आयटी हब उभे राहिले आहेत. यंत्रांची धडधड बंद होऊन त्या ठिकाणी चकाचक उंचच उंच इमारती उभ्या राहत आहेत. व्यापारी कार्यालय, तसेच हॉटेल, रेस्टॉरंट, शोरूम आदी व्यवसायासाठी त्यांचा वापर होऊ लागला आहे. काही ठिकाणी निवासी इमारती साकारल्या आहेत. त्यामुळे एमआयडीसीचे व्यापारीकरण आणि नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. या कारणामुळे एमआयडीसीचा मूळ हेतू बाजूला सारला जात आहे. एकापाठोपाठ एक उद्योगधंदे बंद होत असल्याने कामच नसल्याने कामगारवर्गावर उपासमारीची वेळ येण्याचा धोका आहे. स्वयंचलित यंत्रसामग्रीमुळे कामगारांची संख्या पूर्वीच कमी झाली आहे. त्यात उद्योग बंद होत असल्याने कामगारांची मागणी घटत आहे. व्यापारीकरणाचे हे प्रमाण असेच कायम राहिल्यास कामगारांच्या रोजगारावर गदा येण्याची शक्यता आहे. भविष्यात उद्योगनगरीची ओळखच पुसली जाण्याचा धोका नाकारता येत नाही. व्यापारीकरण व नागरीकरणामुळे महापालिकेच्या महसुलावरही विपरीत परिणाम होणार आहे. औद्योगिक क्षेत्रातून प्राप्त होणाऱ्या महसुलाच्या आकडेवारीत कमालीची घट होणार आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक गणित बिघडणार आहे. स्थलांतर केल्याने तेथे रोजगारनिर्मिती होते असे कारण उद्योजक देतात. मात्र, येथील जमीन शेतकऱ्यांनी रोजगार निर्मितीसाठीच दिली होती. मात्र, उद्योगच बंद करून रोजगारच संपविण्याचा हा डाव सुरू आहे. यात मूळ शेतकरी आणि स्थानिकांना रोजगारापासून डावलल्याची भावना वाढत आहे.