मनोरंजन थांबलं नाही आणि थांबणारही नाही, चला हवा येऊ द्याची टीम पोहचली जयपूरला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 03:29 PM2021-04-29T15:29:18+5:302021-04-29T15:50:35+5:30

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे संसर्गाची चेन ब्रेक करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कठोर निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे. राज्याची वाटचाल पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने होत आहे. अशात मनोरंजनाला ब्रेक लागू नये, यासाठी वाहिन्यांकडून खबरदारी घेतली जात आहे. स्टार प्रवाह आणि झी मराठी चॅनेलवरील मालिकांचे शूट आता महाराष्ट्राबाहेर होणार आहे.

छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांनी गोवा, उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेशासह इतर राज्यात शूटिंगला पसंती दिली आहे.

झी मराठी वरील लोकप्रिय कॉमेडी शो चला हवा येऊ द्याचे शूटिंग आता जयपूरला होणार आहे.

एअरपोर्टवरचे कलाकारांचे फोटो समोर आले आहेत.

कलाकारांनीही योग्य खबरादरी घेतल्याचे समोर आलेल्या फोटोत पाहायला मिळतंय.

जयपूरमध्येच शोसाठी खास सेट उभारण्यात आला आहे.

तिथेच या शोचे शूटिंगही सुरु करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात शूटिंग बंद असल्यामुळे रसिकांचे मनोरंजनासाठी निर्मात्यांनी महाराष्ट्राबाहेर जाण्याचा निर्णय घेतला.

चला हवा येऊ द्या हाच शो नाहीतर अन्य मालिकांचेही स्थलांतर महाराष्ट्राबाहेर झाले आहे.

याआधी सगळ्या कलाकारांची कोरोना टेस्टही करण्यात आली आहे.