शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
2
भाजपचे उमदेवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
3
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
4
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
5
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
6
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
7
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
8
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
9
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
10
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
11
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
12
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
13
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
14
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
15
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
16
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
17
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
18
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
19
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
20
फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीचे पाणी कधी सोडणार ?

By admin | Updated: October 23, 2014 14:23 IST

पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणामध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे.

दैठणा : यावर्षी पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणामध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे. परंतु, रबी हंगामासाठी दैठणा कालव्यामध्ये यंदाच्या रबी हंगामासाठी दोन वेळा पाणी सोडावे, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. परंतु, रबी हंगाम सुरू होवून अद्यापही जायकवाडीचे पाणी सोडले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. 

दीड-दोन महिन्यांपासून पावसाने उघडीप दिली. त्यामुळे कापूस व तूर पाण्याअभावी वाळून जात आहे. अशावेळी जायकवाडी धरणातून पाणी सोडल्यास शेतकर्‍यांना तूर व कापूस यासह रबी हंगाम घेणे सोयीस्कर होईल.
परंतु, वेळ निघून गेल्यानंतर प्रशासनाच्या वतीने जायकवाडी कालव्यातून परभणी तालुक्यामध्ये पाणी सोडल्यास या पाण्याचा उपयोग शेतकर्‍यांना होणार नाही. 
त्यामुळे पाटबंधारे विभागाने तात्काळ सिंचनासाठी पाणी सोडावे, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. परंतु, लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे शेतकर्‍यांमधून आश्‍चर्यव्यक्त होत आहे. (वार्ताहर)
> जायकवाडी कालव्यातील अनेक वर्षांपासून गाळ काढला नाही. संबंधित कार्यालयाकडून थातूरमातून गाळ काढून संबंधित ठेकेदारांनी लाखोंची कमाई केली. परंतु, गाळ न काढल्यामुळे आज घडीला जायकवाडी कालवा गाळाने पूर्णभरला आहे. पाणी सोडल्यानंतर कालव्यातून पाणी वाहन्यास अडथळा निर्माण होवू शकतो. परंतु, याचे देणेघेणेच पाटबंधारे विभागाला नसल्याचे दिसून येत आहे. उपअभियंता नावालाच
> दैठणा व ब्रह्मपुरी येथील जायकवाडी कॅम्पमध्ये कार्यरत असलेले उपअभियंता राठोड हे मुख्यालयी न राहता नांदेड येथूनच भ्रमणध्वनीवरूनच कारभार चालवित आहेत. शेतकरी कालव्यामध्ये कधी पाणी सोडणार हे विचारण्यासाठी कार्यालयामध्ये खेटे मारत आहेत. परंतु, अभियंता जागेवर नसल्याने शेतकर्‍यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.