शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

जायकवाडीचे पाणी कधी सोडणार ?

By admin | Updated: October 23, 2014 14:23 IST

पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणामध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे.

दैठणा : यावर्षी पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणामध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे. परंतु, रबी हंगामासाठी दैठणा कालव्यामध्ये यंदाच्या रबी हंगामासाठी दोन वेळा पाणी सोडावे, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. परंतु, रबी हंगाम सुरू होवून अद्यापही जायकवाडीचे पाणी सोडले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. 

दीड-दोन महिन्यांपासून पावसाने उघडीप दिली. त्यामुळे कापूस व तूर पाण्याअभावी वाळून जात आहे. अशावेळी जायकवाडी धरणातून पाणी सोडल्यास शेतकर्‍यांना तूर व कापूस यासह रबी हंगाम घेणे सोयीस्कर होईल.
परंतु, वेळ निघून गेल्यानंतर प्रशासनाच्या वतीने जायकवाडी कालव्यातून परभणी तालुक्यामध्ये पाणी सोडल्यास या पाण्याचा उपयोग शेतकर्‍यांना होणार नाही. 
त्यामुळे पाटबंधारे विभागाने तात्काळ सिंचनासाठी पाणी सोडावे, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. परंतु, लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे शेतकर्‍यांमधून आश्‍चर्यव्यक्त होत आहे. (वार्ताहर)
> जायकवाडी कालव्यातील अनेक वर्षांपासून गाळ काढला नाही. संबंधित कार्यालयाकडून थातूरमातून गाळ काढून संबंधित ठेकेदारांनी लाखोंची कमाई केली. परंतु, गाळ न काढल्यामुळे आज घडीला जायकवाडी कालवा गाळाने पूर्णभरला आहे. पाणी सोडल्यानंतर कालव्यातून पाणी वाहन्यास अडथळा निर्माण होवू शकतो. परंतु, याचे देणेघेणेच पाटबंधारे विभागाला नसल्याचे दिसून येत आहे. उपअभियंता नावालाच
> दैठणा व ब्रह्मपुरी येथील जायकवाडी कॅम्पमध्ये कार्यरत असलेले उपअभियंता राठोड हे मुख्यालयी न राहता नांदेड येथूनच भ्रमणध्वनीवरूनच कारभार चालवित आहेत. शेतकरी कालव्यामध्ये कधी पाणी सोडणार हे विचारण्यासाठी कार्यालयामध्ये खेटे मारत आहेत. परंतु, अभियंता जागेवर नसल्याने शेतकर्‍यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.