शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

जायकवाडीचे पाणी कधी सोडणार ?

By admin | Updated: October 23, 2014 14:23 IST

पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणामध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे.

दैठणा : यावर्षी पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणामध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे. परंतु, रबी हंगामासाठी दैठणा कालव्यामध्ये यंदाच्या रबी हंगामासाठी दोन वेळा पाणी सोडावे, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. परंतु, रबी हंगाम सुरू होवून अद्यापही जायकवाडीचे पाणी सोडले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. 

दीड-दोन महिन्यांपासून पावसाने उघडीप दिली. त्यामुळे कापूस व तूर पाण्याअभावी वाळून जात आहे. अशावेळी जायकवाडी धरणातून पाणी सोडल्यास शेतकर्‍यांना तूर व कापूस यासह रबी हंगाम घेणे सोयीस्कर होईल.
परंतु, वेळ निघून गेल्यानंतर प्रशासनाच्या वतीने जायकवाडी कालव्यातून परभणी तालुक्यामध्ये पाणी सोडल्यास या पाण्याचा उपयोग शेतकर्‍यांना होणार नाही. 
त्यामुळे पाटबंधारे विभागाने तात्काळ सिंचनासाठी पाणी सोडावे, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. परंतु, लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे शेतकर्‍यांमधून आश्‍चर्यव्यक्त होत आहे. (वार्ताहर)
> जायकवाडी कालव्यातील अनेक वर्षांपासून गाळ काढला नाही. संबंधित कार्यालयाकडून थातूरमातून गाळ काढून संबंधित ठेकेदारांनी लाखोंची कमाई केली. परंतु, गाळ न काढल्यामुळे आज घडीला जायकवाडी कालवा गाळाने पूर्णभरला आहे. पाणी सोडल्यानंतर कालव्यातून पाणी वाहन्यास अडथळा निर्माण होवू शकतो. परंतु, याचे देणेघेणेच पाटबंधारे विभागाला नसल्याचे दिसून येत आहे. उपअभियंता नावालाच
> दैठणा व ब्रह्मपुरी येथील जायकवाडी कॅम्पमध्ये कार्यरत असलेले उपअभियंता राठोड हे मुख्यालयी न राहता नांदेड येथूनच भ्रमणध्वनीवरूनच कारभार चालवित आहेत. शेतकरी कालव्यामध्ये कधी पाणी सोडणार हे विचारण्यासाठी कार्यालयामध्ये खेटे मारत आहेत. परंतु, अभियंता जागेवर नसल्याने शेतकर्‍यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.