शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १६५३ अंगणवाड्यांमध्ये पाण्याची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:23 IST

परभणी : जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील १ हजार ७०१ अंगणवाड्यांपैकी तब्बल १ हजार ६५३ अंगणवाड्यांमध्ये स्वत:ची पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. ...

परभणी : जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील १ हजार ७०१ अंगणवाड्यांपैकी तब्बल १ हजार ६५३ अंगणवाड्यांमध्ये स्वत:ची पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे या अंगणवाड्यांमधील मुलांना पाण्यासाठी इतर ठिकाणे गाठावी लागतात.

प्रत्येक अंगणवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे, असे असताना जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्यांना स्वत:ची इमारतच नसल्याचे बाब समोर आली होती. त्यामुळे या अंगणवाड्या कुठे ग्रामपंचायत कार्यालयात तर कुठे खासगी जागेत भरविल्या जात होत्या. आता जिल्ह्यातील एकूण १ हजार ७०१ अंगणवाड्यांपैकी १ हजार ६५३ अंगणवाड्यांमध्ये स्वत:ची पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्या फक्त ४८ अंगणवाड्यांमध्येच स्वत:च्या पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. जिल्ह्यात ३६५ अंगणवाड्यांतील विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकीचे पाणी घेऊन तहान भागवावी लागते. तर १ हजार ३७ अंगणवाड्यातील मुलांना परिसरातील हातपंपाचा आधार आहे. ८९ अंगणवाड्यांना सार्वजनिक विहिरीवरून पाणी उपलब्ध होते. १७१ अंगणवाड्यांना खासगी नळ जोडणीतील पाणी घ्यावे लागते. त्यामुळे या अंगणवाड्यांना आता स्वत:च्या पाण्याची सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. राज्य शासनाने जलजीवन मिशन अंतर्गत या अंगणवाड्यांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टिकोनातून प्रशासकीय पातळीवर कामकाजाला सुरुवात झाली आहे.

एकूण अंगणवाड्या

१,७०१

नळ जोडण्या नसलेल्या अंगणवाड्या

१,६५३

तालुका अंगणवाड्या नळ जोडण्या नसलेल्या अंगणवाड्या

गंगाखेड २१९ २१२

पाथरी १४२ १३१

परभणी २९३ २८२

जिंतूर ३१६ ३१६

पालम १७० १६७

पूर्णा १९३ १९३

सेलू १५५ १५०

मानवत १०० ९२

सोनपेठ ११३ ११२