शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तीस वर्षापूर्वीच्या तारांवर विजेचा भार

By admin | Updated: November 3, 2014 15:20 IST

तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये विजेचा पुरवठा करण्यासाठी ३0 वर्षापूर्वी वीज तारा ओढण्यात आल्या आहेत. या जुन्या तारावरच विजेचा भार असल्याने तांत्रिक बिघाड होऊन ११ गावांतील वीजपुरवठा खंडीत होत आहे.

 

पालम : तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये विजेचा पुरवठा करण्यासाठी ३0 वर्षापूर्वी वीज तारा ओढण्यात आल्या आहेत. या जुन्या तारावरच विजेचा भार असल्याने तांत्रिक बिघाड होऊन ११ गावांतील वीजपुरवठा खंडीत होत आहे. 
पलाम तालुक्यात ४ उपकेंद्रातून ग्रामीण भागामध्ये घरगुती ग्राहक व कृषी पंपांना वीजपुरवठा केला जातो. नवीन उपकेंद्र निर्माण न केल्याने वीजपुरवठय़ात दिवसेंदिवस अडसर निर्माण होत आहे. केरवाडी, सिरपूर, सायळा, गणेशवाडी, आरखेड, फळा, घोडा, सोमेश्‍वर, आडगाव, कापसी, वनभूजवाडी या गावांना वीजपुरवठा करणार्‍या मुख्य लाईनच्या तारा अतिशय जुनाट झाल्या आहेत. तसेच विद्युत खांबावरील व रोहित्राचे साहित्य जनुे झाल्याने विजेमध्ये नेहमीच तांत्रिक बिघाड होत आहेत. तारा जुन्या झाल्याने तुटत आहेत. 
यामुळे या भागातील ग्रामस्थांचा जीव धोक्यात आला आहे. या तारांना ३0 ते ३५ वर्ष झाल्याने तारा कमकुवत बनल्या आहेत. तारा लोंबकळल्याने एकमेकांना स्पर्श होऊन वीजपुरवठा बंद होत आहे. याबाबत अनेक वेळा वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे या गावातील ग्रामस्थांनी तक्रारी केल्या. परंतु, याकडे वीज वितरणच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना लक्ष देण्यास वेळ नसल्याचे दिसून येत आहे. 
यामुळे या गावातील नागरिकांना अंधारात दिवस काढण्याची वेळ आली आहे. वीज पुरवठा सतत खंडीत होत असल्याने दळण आणण्यासाठी नागरिकांना बाहेरगावी जावे लागत आहे. याचे मात्र वीज वितरणच्या कर्मचार्‍यांना काहीही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे.
पालम तालुक्यामधील कृषी पंपासाठी विद्युत पोल ओढण्यात आले आहेत. यामध्ये बाहुतांश पोल वाकलेल्या अवस्थेत उभे आहेत. तसेच हाताला तारा लागत आहेत. यामुळे शेतकर्‍यांना शेतामध्ये पेरणी अथवा ट्रॅक्टरद्वारे मशागत करणे अवघड झाले आहे. हीे दुरुस्त करण्यासाठी शेतकर्‍यांनी वीज वितरण कंपनीकडे तोंडी व लेखी वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पावसाळ्यामध्ये पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरल्यानंतर मुक्या जनावरांना जीव गमवावा लागला आहे. याचे सोयरसूतक वीज वितरण कंपनीला नसल्याचे दिसत आहे. /(प्रतिनिधी)
■ विजेचा पुरवठा नेहमीच खंडीत होत असल्याने अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. रात्रीच्या सुमारास बिघाड झाला की दुरुस्त करणे कठीण होत आहे. यामुळे रात्र अंधारात काढण्याची वेळ ग्रामस्थांवर येत आहे. 
> केरवाडी परिसरातील विजेच्या तारा व साहित्य बदल करण्याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. तारा नवीन टाकाव्यात व स्वतंत्र फिडर बसवावे, अशी या भागातील ग्रामस्थांची मागणी आहे. रोहित्र नादुरुस्त होण्याचेही प्रकार
> ग्रामीण भागात विजेचे रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रकार वारंवार घडतात. त्यामुळे देखील वीज पुरवठय़ात व्यत्यय निर्माण होतो. विशेष म्हणजे दहा-दहा दिवस हे रोहीत्र दुरुस्त होत नाहीत. रोहित्र बदलण्यासाठी ग्रामस्थांना अनेक वेळा पाठपुरावा करावा लागतो. वीज वितरण कंपनीने ग्रामीण भागातील वीज समस्या गांभीर्याने सोडविणे गरजेचे आहे.