शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षात अतिवृष्टीने दीडशे कोटींचेे नुकसान;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:23 IST

परभणी : जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून सतत अतिवृष्टी होत असून दीडशे कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान होत असताना, प्रशासनाकडून मात्र ...

परभणी : जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून सतत अतिवृष्टी होत असून दीडशे कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान होत असताना, प्रशासनाकडून मात्र मदतीसाठी हात आखडता घेतला जात आहे. त्यामुळे अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या नशिबी निराशाच पडत आहे.

हवामानात बदल होऊन दरवर्षी जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका बसत आहे. कधी खरीप हंगामात, तर कधी रब्बी हंगामात ढगफुटीसारखा पाऊस होऊन शेतीपिके आणि रस्ते, पुलांचे नुकसान झाले आहे. मागीलवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्यानंतर यावर्षीही जुलै तसेच सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने जिल्ह्याला फटका बसला आहे. प्रशासनाकडून मदत निधीची मागणी केली जाते; परंतु प्रत्यक्षात तुटपुंजी मदत मिळत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान होऊनही मदतीची प्रतीक्षा करावी लागत आहे.

परभणी, पालम तालुक्यात सर्वाधिक नुकसान

जुलै महिन्यात परभणी तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस पडला होता. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच सप्टेंबर महिन्यात पालम तालुक्यात पावसाने हाहाकार उडविला. जुलै महिन्यातील नुकसानीपोटी प्रशासनाने ४५ कोटी ५४ लाख रुपयांची मागणी केली आहे, तर सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप पूर्ण केलेले नाहीत.

सरकार बदलले, परिस्थिती काय?

अतिवृष्टीने रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. रस्ते आणि पुलांच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वारंवार निधीची मागणी केली जाते. मागील सरकारच्या काळातही रस्त्यांसाठी निधी मागितला होता. तोही मिळाला नाही. यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने पुलांच्या दुरुस्तीसाठी २६ कोटी ९१ लाख रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे; परंतु अद्यापपर्यंत ही रक्कम जिल्ह्याला प्राप्त झाली नाही.

गतवर्षी १०८ कोटी मिळाले

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई दिली जाते. २०२० मध्ये जिल्ह्याला १०८ कोटी १५ लाख ८५ हजार रुपयांची मदत मिळाली होती. यावर्षीच्या ४४ कोटी ५४ लाख रुपयांच्या निधीची प्रतीक्षा कायम आहे.