शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

दोन वर्षात अतिवृष्टीने दीडशे कोटींचेे नुकसान;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:23 IST

परभणी : जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून सतत अतिवृष्टी होत असून दीडशे कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान होत असताना, प्रशासनाकडून मात्र ...

परभणी : जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून सतत अतिवृष्टी होत असून दीडशे कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान होत असताना, प्रशासनाकडून मात्र मदतीसाठी हात आखडता घेतला जात आहे. त्यामुळे अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या नशिबी निराशाच पडत आहे.

हवामानात बदल होऊन दरवर्षी जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका बसत आहे. कधी खरीप हंगामात, तर कधी रब्बी हंगामात ढगफुटीसारखा पाऊस होऊन शेतीपिके आणि रस्ते, पुलांचे नुकसान झाले आहे. मागीलवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्यानंतर यावर्षीही जुलै तसेच सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने जिल्ह्याला फटका बसला आहे. प्रशासनाकडून मदत निधीची मागणी केली जाते; परंतु प्रत्यक्षात तुटपुंजी मदत मिळत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान होऊनही मदतीची प्रतीक्षा करावी लागत आहे.

परभणी, पालम तालुक्यात सर्वाधिक नुकसान

जुलै महिन्यात परभणी तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस पडला होता. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच सप्टेंबर महिन्यात पालम तालुक्यात पावसाने हाहाकार उडविला. जुलै महिन्यातील नुकसानीपोटी प्रशासनाने ४५ कोटी ५४ लाख रुपयांची मागणी केली आहे, तर सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप पूर्ण केलेले नाहीत.

सरकार बदलले, परिस्थिती काय?

अतिवृष्टीने रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. रस्ते आणि पुलांच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वारंवार निधीची मागणी केली जाते. मागील सरकारच्या काळातही रस्त्यांसाठी निधी मागितला होता. तोही मिळाला नाही. यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने पुलांच्या दुरुस्तीसाठी २६ कोटी ९१ लाख रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे; परंतु अद्यापपर्यंत ही रक्कम जिल्ह्याला प्राप्त झाली नाही.

गतवर्षी १०८ कोटी मिळाले

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई दिली जाते. २०२० मध्ये जिल्ह्याला १०८ कोटी १५ लाख ८५ हजार रुपयांची मदत मिळाली होती. यावर्षीच्या ४४ कोटी ५४ लाख रुपयांच्या निधीची प्रतीक्षा कायम आहे.