शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

उसनवारीवर दिलेले एकही रेमडेसिविर इंजेक्शन नाही शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:23 IST

परभणी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता भासली. अशा वेळी जिल्हा रुग्णालयातून खासगी रुग्णालयांना उसनवारीवर दिलेल्या ...

परभणी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता भासली. अशा वेळी जिल्हा रुग्णालयातून खासगी रुग्णालयांना उसनवारीवर दिलेल्या सर्वच्या सर्व इंजेक्शनचा वापर झाला असून, खासगी रुग्णालयांकडे एकही इंजेक्शन शिल्लक नाही.

जिल्ह्यात जानेवारी ते मे या महिन्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला होता. कोरोनाच्या अत्यवस्थ रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन दिले जात होते. मात्र, जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. साधारणत: एप्रिल आणि मे या दोन महिन्यात ही परिस्थिती निर्माण झाली. या दोन्ही महिन्यात रेमडेसिविर इंजेक्शनची मोठी मागणी होती. या काळात अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. रुग्णांची अत्यवस्थ असलेली परिस्थिती पाहून जिल्हा रुग्णालयातून ४ ते ५ इंजेक्शन खासगी रुग्णालयांना उसने म्हणून देण्यात आली होती. त्यावेळची मागणी पाहता या सर्व इंजेक्शनचा खासगी रुग्णालयांनी वापर केला असून, खासगी रुग्णालयांनी शासकीय रुग्णालयाला परत करण्यासाठी एकही इंजेक्शन शिल्लक नसल्याची माहिती मिळाली.

समितीच्या माध्यमातून झाले होेते वाटप

रेमडेसिविर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची होत असलेली तारांबळ लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने एका समितीची स्थापना करुन त्या मार्फत या इंजेक्शनचे वाटप केले होते.

अन्न व औषध विभागाच्या वतीने रुग्णनिहाय इंजेक्शन वितरित करण्यात आले. त्यासाठी ज्या रुग्णाला इंजेक्शन हवे आहे, त्याचे नाव, खासगी दवाखान्याचे नाव आदी माहिती घेण्यात आली. त्या रुग्णाला खरेच इंजेक्शनची गरज आहे का? याची पडताळणी समितीने केल्यानंतरच इंजेक्शन वाटप करण्यात आले.

त्यामुळे रेमडेसिविरचा आलेला संपूर्ण साठा आवश्यक असलेल्या रुग्णांपर्यंत पोहोचविण्यात आला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांकडे इंजेक्शन शिल्लक राहण्याचा प्रश्नच नाही.

खासगी रुग्णालयांतूनच अधिक मागणी

एप्रिल आणि मे या दोन महिन्यात शासकीय रुग्णालयाच्या तुलनेत खासगी रुग्णालयांतूनच रमडेसिविर इंजेक्शनची सर्वाधिक मागणी होती. त्यामुळे खासगी रुग्णालयांनाच हा इंजेक्शन पुरवठा सर्वाधिक प्रमाणात करण्यात आला. मात्र, रुग्णनिहाय नोंदी असल्याने एकाही रुग्णालयात हे इंजेक्शन शिल्लक नाही.

इतर जिल्ह्यातूनही आणले होते इंजेक्शन

कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात अत्यवस्थ रुग्णांच्या नातेवाईकांची रेमडेसिविरसाठी मोठी धावपळ झाली. अशा वेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर आदी जिल्ह्यातून हे इंजेक्शन उपलब्ध करून घेतले. त्यामुळे या इंजेक्शनचा काळा बाजारही वाढला होता. मात्र, सर्वच जिल्ह्यात तुटवडा निर्माण होत असल्याने ही पद्धत बंद करून जिल्ह्याचा कोटा त्याच जिल्ह्यात वापरण्याचे निर्देश देण्यात आले होते.