शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

कसा लावणार सालगडी ?

By admin | Updated: November 6, 2014 14:02 IST

यंदाच्या पावसाळ्यात पावसाने पाठ फिरवल्याने नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या कापूस व सोयाबीन या पिकांचे उत्पादन घटले आहे.

परभणी : यंदाच्या पावसाळ्यात पावसाने पाठ फिरवल्याने नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या कापूस व सोयाबीन या पिकांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना शेतामध्ये सालगडी म्हणून ठेवलेल्यांचे साल देणेही अवघडझाले आहे. आता शेतकर्‍यांवरच सालगड्यांना टप्प्याटप्याने पैसे देतोम्हणून वेळ मारून नेण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात पाऊस ५0टक्क्यांहून कमी झाल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर आदी पिके हातची गेली आहेत. कापसाच्या शेतावर शेतकर्‍यांनी एकरी १५ ते २0 हजार रुपये खर्च केले आणि एकरी १४ ते १५ किलो कापूस निघत आहे. शेतकर्‍यांना एकरी चार ते साडेचार रुपयेच मिळत आहेत. अशीच परिस्थिती सोयाबीनच्या एका बॅगला शेतकर्‍यांनी सात ते दहा हजार रुपये एवढा खर्च केला. परंतु, एका बॅगला उत्पन्न दोन पोते झाल्याने सहा ते सात हजार रुपयांचाच माल झाला. परंतु, ज्या शेतकर्‍यांकडे दहा ते पंधरा एकर शेती आहे अशा शेतकर्‍यांनी सालगडी ६0 ते ७0 रुपये देऊन ठेवला होता. शेतकर्‍यांनी खरीप हंगामात लाखो रुपये पेरणीसाठी खर्च केला. परंतु, उत्पन्न झाले हजारामध्ये अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना सालगड्याचे ६0 ते ७0 हजार रुपये कोठून द्यायचे? असा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. काही शेतकर्‍यांनी सालगड्याला उचल म्हणून २0 ते २५ हजार रुपये दिले होते. परंतु, सोयाबीन व कापूस न झाल्याने उर्वरित रक्कम आता शेतकर्‍यांना घरातून देण्याची वेळ आली आहे. /(प्रतिनिधी)

--------------

■ शेतमालकांना सालगड्याचे उर्वरित पैसे शेतात माल न झाल्यामुळे देता येत नसल्याचे दिसून येत आहे. शेतमालक सालगड्यास बाबा आता तुझे पैसे मला देणे होत नाही उर्वरित रक्कम पुढच्या खरीप हंगामात देऊ, असे म्हणत आहेत. त्यामुळे शेतमालकासह सालगड्याच्या कुटुंबियांवरही उपासमारीची वेळ आली आहे. गड्यांमध्येही नाराजी> परभणी जिल्ह्यातील शेतकरी सालगडी अथवा शेतामध्ये तिसर्‍या हिश्श्याने गडी ठेवण्याची प्रथा आहे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतातील मालाच्या उत्पादनात उतारा न आल्याने तिसर्‍या हिश्श्याने शेत वाहणार्‍यांच्या हातावर काहीही पडले नाही. त्यामुळे मालकासह गड्यामध्येही नाराजी निर्माण झाली आहे.