शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

कसा लावणार सालगडी ?

By admin | Updated: November 6, 2014 14:02 IST

यंदाच्या पावसाळ्यात पावसाने पाठ फिरवल्याने नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या कापूस व सोयाबीन या पिकांचे उत्पादन घटले आहे.

परभणी : यंदाच्या पावसाळ्यात पावसाने पाठ फिरवल्याने नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या कापूस व सोयाबीन या पिकांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना शेतामध्ये सालगडी म्हणून ठेवलेल्यांचे साल देणेही अवघडझाले आहे. आता शेतकर्‍यांवरच सालगड्यांना टप्प्याटप्याने पैसे देतोम्हणून वेळ मारून नेण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात पाऊस ५0टक्क्यांहून कमी झाल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर आदी पिके हातची गेली आहेत. कापसाच्या शेतावर शेतकर्‍यांनी एकरी १५ ते २0 हजार रुपये खर्च केले आणि एकरी १४ ते १५ किलो कापूस निघत आहे. शेतकर्‍यांना एकरी चार ते साडेचार रुपयेच मिळत आहेत. अशीच परिस्थिती सोयाबीनच्या एका बॅगला शेतकर्‍यांनी सात ते दहा हजार रुपये एवढा खर्च केला. परंतु, एका बॅगला उत्पन्न दोन पोते झाल्याने सहा ते सात हजार रुपयांचाच माल झाला. परंतु, ज्या शेतकर्‍यांकडे दहा ते पंधरा एकर शेती आहे अशा शेतकर्‍यांनी सालगडी ६0 ते ७0 रुपये देऊन ठेवला होता. शेतकर्‍यांनी खरीप हंगामात लाखो रुपये पेरणीसाठी खर्च केला. परंतु, उत्पन्न झाले हजारामध्ये अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना सालगड्याचे ६0 ते ७0 हजार रुपये कोठून द्यायचे? असा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. काही शेतकर्‍यांनी सालगड्याला उचल म्हणून २0 ते २५ हजार रुपये दिले होते. परंतु, सोयाबीन व कापूस न झाल्याने उर्वरित रक्कम आता शेतकर्‍यांना घरातून देण्याची वेळ आली आहे. /(प्रतिनिधी)

--------------

■ शेतमालकांना सालगड्याचे उर्वरित पैसे शेतात माल न झाल्यामुळे देता येत नसल्याचे दिसून येत आहे. शेतमालक सालगड्यास बाबा आता तुझे पैसे मला देणे होत नाही उर्वरित रक्कम पुढच्या खरीप हंगामात देऊ, असे म्हणत आहेत. त्यामुळे शेतमालकासह सालगड्याच्या कुटुंबियांवरही उपासमारीची वेळ आली आहे. गड्यांमध्येही नाराजी> परभणी जिल्ह्यातील शेतकरी सालगडी अथवा शेतामध्ये तिसर्‍या हिश्श्याने गडी ठेवण्याची प्रथा आहे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतातील मालाच्या उत्पादनात उतारा न आल्याने तिसर्‍या हिश्श्याने शेत वाहणार्‍यांच्या हातावर काहीही पडले नाही. त्यामुळे मालकासह गड्यामध्येही नाराजी निर्माण झाली आहे.