शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

कसा लावणार सालगडी ?

By admin | Updated: November 6, 2014 14:02 IST

यंदाच्या पावसाळ्यात पावसाने पाठ फिरवल्याने नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या कापूस व सोयाबीन या पिकांचे उत्पादन घटले आहे.

परभणी : यंदाच्या पावसाळ्यात पावसाने पाठ फिरवल्याने नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या कापूस व सोयाबीन या पिकांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना शेतामध्ये सालगडी म्हणून ठेवलेल्यांचे साल देणेही अवघडझाले आहे. आता शेतकर्‍यांवरच सालगड्यांना टप्प्याटप्याने पैसे देतोम्हणून वेळ मारून नेण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात पाऊस ५0टक्क्यांहून कमी झाल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर आदी पिके हातची गेली आहेत. कापसाच्या शेतावर शेतकर्‍यांनी एकरी १५ ते २0 हजार रुपये खर्च केले आणि एकरी १४ ते १५ किलो कापूस निघत आहे. शेतकर्‍यांना एकरी चार ते साडेचार रुपयेच मिळत आहेत. अशीच परिस्थिती सोयाबीनच्या एका बॅगला शेतकर्‍यांनी सात ते दहा हजार रुपये एवढा खर्च केला. परंतु, एका बॅगला उत्पन्न दोन पोते झाल्याने सहा ते सात हजार रुपयांचाच माल झाला. परंतु, ज्या शेतकर्‍यांकडे दहा ते पंधरा एकर शेती आहे अशा शेतकर्‍यांनी सालगडी ६0 ते ७0 रुपये देऊन ठेवला होता. शेतकर्‍यांनी खरीप हंगामात लाखो रुपये पेरणीसाठी खर्च केला. परंतु, उत्पन्न झाले हजारामध्ये अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना सालगड्याचे ६0 ते ७0 हजार रुपये कोठून द्यायचे? असा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. काही शेतकर्‍यांनी सालगड्याला उचल म्हणून २0 ते २५ हजार रुपये दिले होते. परंतु, सोयाबीन व कापूस न झाल्याने उर्वरित रक्कम आता शेतकर्‍यांना घरातून देण्याची वेळ आली आहे. /(प्रतिनिधी)

--------------

■ शेतमालकांना सालगड्याचे उर्वरित पैसे शेतात माल न झाल्यामुळे देता येत नसल्याचे दिसून येत आहे. शेतमालक सालगड्यास बाबा आता तुझे पैसे मला देणे होत नाही उर्वरित रक्कम पुढच्या खरीप हंगामात देऊ, असे म्हणत आहेत. त्यामुळे शेतमालकासह सालगड्याच्या कुटुंबियांवरही उपासमारीची वेळ आली आहे. गड्यांमध्येही नाराजी> परभणी जिल्ह्यातील शेतकरी सालगडी अथवा शेतामध्ये तिसर्‍या हिश्श्याने गडी ठेवण्याची प्रथा आहे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतातील मालाच्या उत्पादनात उतारा न आल्याने तिसर्‍या हिश्श्याने शेत वाहणार्‍यांच्या हातावर काहीही पडले नाही. त्यामुळे मालकासह गड्यामध्येही नाराजी निर्माण झाली आहे.