शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी नदीपात्र घाणीच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:23 IST

गंगाखेड : येथील गोदावरी नदीपात्रात सर्वत्र केरकचरा, प्लास्टिक व नालीचे दुर्गंधीयुक्त पाणी सोडण्यात येत असल्याने नदीचे पाणी प्रदूषित झाले ...

गंगाखेड : येथील गोदावरी नदीपात्रात सर्वत्र केरकचरा, प्लास्टिक व नालीचे दुर्गंधीयुक्त पाणी सोडण्यात येत असल्याने नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. या संदर्भात स्वच्छता अभियान व जनजागृतीबाबत राबविण्यात आलेली मोहीम कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.

गंगाखेड शहरातून वाहणाऱ्या व दक्षिण गंगा महणून ओळख असलेल्या गोदावरी नदीपात्रात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांकडून जुने फाटके कपडे, प्लास्टिकच्या पिशव्या, पोते टाकण्यात येत आहेत. तसेच नाल्यांचे दुर्गंधीयुक्त पाणी पात्रात सोडण्यात आल्याने या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शिवाय नदी प्रदूषित झाली आहे. दशक्रिया विधी करण्यासाठी पुरातन काळापासून येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या नागरिकांना या घाणीच्या दुर्गंधीयुक्त पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे धार्मिक विधी पार पाडण्यासाठी येथे येणारे काही नागरिक मृत व्यक्तीचे कपडे, राख आणलेले पोते, चव्हाळे व अन्य साहित्य नदीपात्रातच फेकत असल्याने नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. पात्रात वाहते पाणी नसल्याने दिवसेंदिवस या परिसरात दुर्गंधी वाढत आहे. त्यामुळे नदीत अंघोळ करण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

सांडपाण्याचे नियोजन करण्याची गरज

शहरातील नागरी वस्तीतील नाल्यांद्वारे येणारे सांडपाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. या सांडपाण्याचे नगरपालिकेने नियोजन करणे आवश्यक आहे; परंतु पालिकेकडून अशा कुठल्याही हालचाली सुरू नाहीत. या संदर्भात जनजागृती करण्यात येत असल्याचे पालिकेडून सांगण्यात येत असले तरी ही जनजागृती कागदावरच सुरू आहे. त्यामुळे प्रत्यक्ष स्थिती वेगळी आहे. त्यामुळे कागदोपत्री होणारा खर्च टाळून नदीच्या स्वच्छतेची मोहीम पालिकेने राबवावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.