शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

दर शनिवारी कोरडा दिवस

By admin | Updated: November 11, 2014 15:47 IST

जिल्ह्यातील विविध भागातून तापाच्या आजाराचे रुग्ण शहरी भागात उपचारार्थ येत आहेत. मात्र डेंग्यूच्या धास्तीने साधा तापही असल्यास अनेकजण धास्ती घेत आहेत

जिल्ह्यातील विविध भागातून तापाच्या आजाराचे रुग्ण शहरी भागात उपचारार्थ येत आहेत. मात्र डेंग्यूच्या धास्तीने साधा तापही असल्यास अनेकजण धास्ती घेत आहेत. आता प्रशासनाने दखल घेतल्यामुळे जनजागृती झाल्यास ही भीती कमी होईल. हिंगोली : /जिल्ह्यात /डेंग्यूने पाय पसरू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर भर देण्याच्या सूचना प्रभारी जिल्हाधिकारी राम गगरानी यांनी दिल्या. दर शनिवारी कोरडा दिवस पाळण्यात येणार असून यासाठी योग्य नियोजन न केल्यास व यापुढे डेंग्यूची साथ आढळल्यास कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला.जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत घेण्यात आलेल्या बैठकीस जिल्हा परिषदेच्या आरोग्य, पंचायत, महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकार्‍यांसह जिल्हा शल्य चिकित्सक, तालुका आरोग्य अधिकारी, पालिका मुख्याधिकारी आदींची उपस्थिती होती.जिल्हाधिकार्‍यांनी आरोग्य विभागाकडून विविध ठिकाणच्या साथीच्या आजाराच्या घटनांचा आढावा घेतला. तसेच केलेल्या उपाययोजना व भविष्यात हे प्रकार टाळण्यासाठी करायच्या उपाययोजनांवर चर्चा केली. माझोड, वटकळी व पिंपळदरी येथे डेंग्यूमुळे रुग्णाचा बळी गेला आहे. त्यामुळे अशा गावांत सर्व नागरिकांच्या रक्तनमुन्यांची तपासणी केली पाहिजे. घरोघर जावून तेथे तपासण्या करण्याची सूचनाही केली. तसेच कुठेही ताप अथवा डेंग्यूसदृश्य तापाचे रुग्ण असल्याची तक्रार आल्यास ती गांभीर्याने घेण्यासही बजावले. अशा गावांत आरोग्य विभागाने तपासणी करावी. प्रतिबंधात्मक उपायांसाठी जि. प. चा पंचायत विभाग, पालिका अथवा संबंधित यंत्रणांना सतर्क करण्यास सांगण्यात आले. या विभागांनीही स्वच्छता, पाणीपुरवठा आदी बाबी तपासून संभाव्य धोका टाळण्यासाठी खबरदारी घेण्यास सांगण्यात आले. तर जिल्ह्यात डेंग्यूचा धोका लक्षात घेता धूरफवारणी, दर शनिवारी कोरडा दिवस पाळण्याचे आवाहनही करण्यात आले. यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्यास त्यांनी सांगितले. डेंग्यूच्या साथीचे राज्यभरातील परिणाम लक्षात घेता सतर्कतेच्या सूचनाही दिल्या.याच बैठकीत स्वच्छ भारत अभियान ग्रामीणमध्ये वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी नव्याने आलेल्या परिपत्रकानुसार १२ हजारांचे अनुदान मिळत असल्याचे सांगून त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले. परिसर स्वच्छतेमुळेही अनेक आरोग्य समस्या टाळता येतात