शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

दर शनिवारी कोरडा दिवस

By admin | Updated: November 11, 2014 15:47 IST

जिल्ह्यातील विविध भागातून तापाच्या आजाराचे रुग्ण शहरी भागात उपचारार्थ येत आहेत. मात्र डेंग्यूच्या धास्तीने साधा तापही असल्यास अनेकजण धास्ती घेत आहेत

जिल्ह्यातील विविध भागातून तापाच्या आजाराचे रुग्ण शहरी भागात उपचारार्थ येत आहेत. मात्र डेंग्यूच्या धास्तीने साधा तापही असल्यास अनेकजण धास्ती घेत आहेत. आता प्रशासनाने दखल घेतल्यामुळे जनजागृती झाल्यास ही भीती कमी होईल. हिंगोली : /जिल्ह्यात /डेंग्यूने पाय पसरू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर भर देण्याच्या सूचना प्रभारी जिल्हाधिकारी राम गगरानी यांनी दिल्या. दर शनिवारी कोरडा दिवस पाळण्यात येणार असून यासाठी योग्य नियोजन न केल्यास व यापुढे डेंग्यूची साथ आढळल्यास कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला.जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत घेण्यात आलेल्या बैठकीस जिल्हा परिषदेच्या आरोग्य, पंचायत, महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकार्‍यांसह जिल्हा शल्य चिकित्सक, तालुका आरोग्य अधिकारी, पालिका मुख्याधिकारी आदींची उपस्थिती होती.जिल्हाधिकार्‍यांनी आरोग्य विभागाकडून विविध ठिकाणच्या साथीच्या आजाराच्या घटनांचा आढावा घेतला. तसेच केलेल्या उपाययोजना व भविष्यात हे प्रकार टाळण्यासाठी करायच्या उपाययोजनांवर चर्चा केली. माझोड, वटकळी व पिंपळदरी येथे डेंग्यूमुळे रुग्णाचा बळी गेला आहे. त्यामुळे अशा गावांत सर्व नागरिकांच्या रक्तनमुन्यांची तपासणी केली पाहिजे. घरोघर जावून तेथे तपासण्या करण्याची सूचनाही केली. तसेच कुठेही ताप अथवा डेंग्यूसदृश्य तापाचे रुग्ण असल्याची तक्रार आल्यास ती गांभीर्याने घेण्यासही बजावले. अशा गावांत आरोग्य विभागाने तपासणी करावी. प्रतिबंधात्मक उपायांसाठी जि. प. चा पंचायत विभाग, पालिका अथवा संबंधित यंत्रणांना सतर्क करण्यास सांगण्यात आले. या विभागांनीही स्वच्छता, पाणीपुरवठा आदी बाबी तपासून संभाव्य धोका टाळण्यासाठी खबरदारी घेण्यास सांगण्यात आले. तर जिल्ह्यात डेंग्यूचा धोका लक्षात घेता धूरफवारणी, दर शनिवारी कोरडा दिवस पाळण्याचे आवाहनही करण्यात आले. यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्यास त्यांनी सांगितले. डेंग्यूच्या साथीचे राज्यभरातील परिणाम लक्षात घेता सतर्कतेच्या सूचनाही दिल्या.याच बैठकीत स्वच्छ भारत अभियान ग्रामीणमध्ये वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी नव्याने आलेल्या परिपत्रकानुसार १२ हजारांचे अनुदान मिळत असल्याचे सांगून त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले. परिसर स्वच्छतेमुळेही अनेक आरोग्य समस्या टाळता येतात