शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

बंद जि. प. शाळांत साप, विंचवांचा धोका; झाडे-झुडपेही वाढली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:23 IST

परभणी : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद असल्याने या शाळांच्या परिसरात झाडे-झुडपे व ...

परभणी : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद असल्याने या शाळांच्या परिसरात झाडे-झुडपे व गवत वाढले आहे. त्यामुळे या परिसरात साप, विंचवांचा धोका निर्माण झाला आहे.

कोरोनामुळे २० मार्च २०२० पासून जिल्ह्यातील पहिली ते पाचवीच्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद आहेत. गेल्यावर्षी सहावीच्या पुढील वर्गाच्या शाळा काही कालावधीसाठी भरल्या होत्या; परंतु नंतर पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने त्या बंद करण्यात आल्या. चालू शैक्षणिक वर्षात तर अद्याप पहिली ते पाचवीच्या शाळा सुरू झालेल्या नाहीत. जिल्ह्यात सहावीच्या पुढील वर्गाच्या शाळा काही ठिकाणी सुरू झाल्या आहेत. परंतु, बहुतांश ठिकाणच्या शाळा बंद असल्याने या शाळांचा परिसर ओसाड पडला आहे. शाळा परिसरात सध्या झाडे-झुडपे वाढली असून, या भागात गवत वाढल्याने साप, विंचवांचा धोका वाढला आहे. त्यामुळे या शाळांच्या दुरुस्तीकडे शिक्षण विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

वर्गखोल्यांमधील धूळ हटेना

जिल्ह्यातील शाळा गेल्या दीड वर्षांपासून बंद असल्याने शाळांमधील वर्गखोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे.

शिवाय चालू वर्षी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने विविध शाळांमधील काही वर्गखोल्यांना गळती लागल्याने या वर्गखोल्यांत कुबट वास येत आहे.

निधीअभावी मुख्याध्यापकांची अडचण

शाळांच्या परिसराची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांकडे निधीची उपलब्धता नाही.

त्यामुळे किरकोळ स्वच्छतेची कामे कशी करावीत, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे. काही मुख्याध्यापकांनी स्वखर्चातून ही कामे केली आहेत.

पालक म्हणतात...

परिश्रम घेऊनही शेतात पीक उगवत नाही; पण कसलीही देखभाल किंवा संवर्धन केले नसतानाही शाळा परिसरात गवत वाढत आहे. त्याकडे शाळा व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत आहे.

- उद्धवराव आघाव, बोरकीनी, ता. सेलू

शाळा परिसरात वाढलेले गवत विषारी असल्याने ते मोडण्यासाठी दरवर्षीचीच डोकेदुखी असते. तणनाशक फवारणी वेळेवर केली तर सुरक्षितता होऊ शकते.

- पांडुरंग मुसळे, बोरकीनी, ता. सेलू

जि. प. शाळांच्या मुख्याध्यापकांनी लोकसहभागातून किंवा ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करून वित्त आयोगातून निधी उपलब्ध करून स्वच्छतेची कामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जि. प. शाळांच्या मुख्याध्यापकांनी लोकसहभागातून किंवा ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करून वित्त आयोगातून निधी उपलब्ध करून स्वच्छतेची कामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शिक्षकांची उपस्थिती किती?

जिल्हा परिषदेच्या पहिली ते पाचवीच्या अनेक ठिकाणच्या शाळा सुरू नसल्या तरी संबंधित शाळेतील शिक्षक शाळेत हजेरी लावतात. ऑनलाईन वर्ग घेतात; परंतु काहीजण दांडी मारतात.