शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

3 अ अॅडिक्शनच्या खाईत लोटणारं त्रिकूट

By admin | Updated: October 8, 2015 21:03 IST

व्यसनं अनेक पदार्थांची असतात. तंबाखूसारखी वरकरणी निरुपद्रवी भासणारी व्यसनं असोत किंवा अफू, चरस, गर्द, दारू अशी शरीर-मनाचा विध्वंस करणारी व्यसनं असोत

- आनंद पटवर्धन
व्यसनं अनेक पदार्थांची असतात. तंबाखूसारखी वरकरणी निरुपद्रवी भासणारी व्यसनं असोत किंवा अफू, चरस, गर्द, दारू अशी शरीर-मनाचा विध्वंस करणारी व्यसनं असोत, त्यांच्यामुळे वाताहतच झाली, राज्य बुडाली असा इतिहास आहे. यादवांच्या इतिहासात जी यादवी झाली ती अतिरिक्त मद्य सेवनामुळेच हे विसरता येत नाही. अनेक साधू गांजा पीत असल्याचं कुंभमेळ्यात दिसलंच. म्हणजे या व्यसनांना एक इतिहास आहे. राजस्थानात अफू, महाराष्ट्रात माडी, पंजाबमध्ये कलिंगडाची, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात भांगेच्या गोळ्या आणि दक्षिणोत तोडी-ताडी, ईशान्य भारतात तांदळाची बिअर असा व्यसनांचा भूगोलही आहे.
या नशेच्या गुलामगिरीतून सुटका व्हावी म्हणून केंद्र सरकारनं अमली पदार्थविरोधी कायदे केले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र कक्ष आहे. त्यांनी कुठून किती रुपयांचा माल पकडला याबद्दलच्या बातम्या प्रसिद्ध होतात. काही राज्यांत संपूर्ण दारूबंदीचे प्रयोग झालेत. त्यातील बहुतेक राज्यांनी हळूहळू बंधने सैल केली किंवा अंमलबजावणीतली तीव्रता कमी केली. आंध्र प्रदेश आणि हरयाणात दारूबंदी झाली. त्याचा परिणाम सरकारी उत्पन्नावर झालाच, परंतु अवैध धंदेही वाढले. 
महाराष्ट्रात गडचिरोली हा एकमेव दारू नियंत्रण करण्यात आलेला यशस्वी जिल्हा आहे. आता यवतमाळसाठी प्रयत्न चालू आहेत. महाराष्ट्र शासनाचे दारूविषयक धोरण जाहीर झाले आहे. त्यात शिताफीने सारे लक्ष जाणीव- जागृती आणि व्यसनमुक्ती केंद्रे यांवर दिलेले आहे. 
केंद्र शासनाकडून व्यसनमुक्ती केंद्रांना अनुदान दिले जाते. परंतु पुण्यासारख्या शहरात 75 रुपयांमध्ये दाखल झालेल्या मित्रंना चहा नष्टा, भोजन आणि रात्रीचं जेवण द्यावं आणि  कोणत्याही प्रकारचा निवास, भोजनाचा खर्च रुग्ण-मित्रंकडून घेऊ नये असे बंधन आहे. मात्र व्यसन थांबवल्यानंतर त्यांचा आहार वाढतो, पदार्थांच्या चवी कळू लागतात हे सर्व विचारात घेतले तर माणशी किमान 2क्क् रुपये खर्च होतो. त्यामुळे अनेक संस्थांनी अनुदान नाकारले आहे. आणि खर्च भागण्यासाठी फीचे दरही वाढवावे लागले आहेत.
पुण्यात वीस ते पंचवीस छोटी-मोठी व्यसनमुक्ती केंद्रे आहेत. त्यामुळे पुणो शहर हे विद्येचं, खाण्या-पिण्याचं, आयटीचं म्हणून ओळखलं जातं तसं व्यसनमुक्ती केंद्रांचं शहरही झालं आहे.
या केंद्रांसह मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रासही भेट दिल्यास व्यसनांसंदर्भातले काही गैरसमज लक्षात येतात. आणि म्हणूनही व्यसनातून मुक्तता अवघड होऊन बसते.
1) व्यसनी माणसं घरात नकोत म्हणून नातेवाईक अनेकांना केंद्रात आणून ठेवतात. सोय म्हणून वर्ष- दीड वर्ष केंद्रात ठेवतात. पण त्यातून व्यसन सुटत नाही, तर घरचेही त्या रुग्णापासून लांब जातात.
2) अनेक घरांत कुणी दारू पितंय, तंबाखू किंवा अन्य कुठलाही नशिल्या पदार्थाची नशा करतोय म्हणजे व्यसन करतोय असं वाटतच नाही. प्रमाण कमी असेल तर ते व्यसन नाही असाच एक समज. त्यामुळे अनेक तरुणांची व्यसनाधीनतेकडे वाटचाल सुरू राहते. 
3) व्यसन वाढतंय असं लक्षात आलं की आधी घरगुती उपाय, मग नवस, मग कर्मकांड, मंत्र-तंत्र करून ते सारं अपयशी झाल्यावर मग व्यसन गांभीर्यानं घेतलं जातं. त्यातही व्यसन करणा:या तरुणांमुळे घरातलं वातावरण बिघडायलं लागलं, नातेसंबंधांवर परिणाम होऊ लागला की मग ते व्यसन जाचक वाटू लागतं. आणि मग शेवटचा उपाय म्हणून पैसे जमवून त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करावं लागतं.
 
--------------------
व्यसनवाटेवरचे 
3 टप्पे
 
1) आवड.
 प्रत्येक व्यक्तीला कशाची तरी आवड असतेच. जेवणातही काही विशिष्ट पदार्थ आवडतात. परंतु तो पदार्थ आत्ताच्या आत्ता मला मिळावा असा त्यांचा आग्रह नसतो. तसंच दारूचंही. केवळ मजा, सोशल ड्रिंक्स इतकाच दारूमध्ये रस असतो. आवड म्हणायचं त्याला. पण ती पुढे ढकलली तरी माणसाला विशेष त्रस होत नाही. 
2) संधी
आवड असलेले किमान 2क्} लोक पुढच्या टप्प्यावर कधी जातात हे त्यांनाही समजत नाही. ओढ लागते. तिचे विलक्षण आकर्षण वाटू लागते. दारू पिण्याची संधी कधी मिळेल हे ते शोधू लागतात. ती मिळाली नाही तर मुद्दाम मिळवली जाते.  जणू काही ही संधी पुन्हा मिळेल की नाही. इथून व्यसनाकडे प्रवास वेगानं होतो.
3) अनावर ओढ
शेवटचा टप्पा म्हणजे अनावर ओढ. ही दारूची ओढ अशी असते की मला कोणत्याही परिस्थितीत, आर्थिक किंवा भावनिक किंमत मोजून आत्ताच्या आत्ता दारू मिळालीच पाहिजे. इथे व्यसन हाताबाहेर जातं. या अवस्थेत
दवाखान्यात किंवा व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करून तातडीनं उपचार करणं गरजेचं ठरतं.