शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

सांगा कसं जगायचं? कण्हत की गाणं म्हणत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 08:00 IST

मान्य आहे की परिस्थिती आपल्या हातात नसते, ती वाईटही असते पण आपले विचार तर आपण बदलू शकतो!

- स्वप्निल कुलकर्णी.

आपल्याही नकळत आपल्या मनात हजारो विचार येत असतात. काही विचार चांगले, सकारात्मक, आनंद निर्माण करणारे आणि जीवन समृद्ध करणारे असतात. काही विचार नकारात्मक, नैराश्य निर्माण करणारे असतात. कोरोना काळात २०२० मध्ये आपण सर्वांनीच हा अनुभव घेतला. अनेकदा परिस्थिती आपल्या हातात नसते, पण विचार करणं, प्रतिक्रिया आणि प्रतिसाद देणं हे तर आपल्याच हातात असतं. सकारात्मक आणि नकारात्मक. विचारांच्या या दोन बाजू. या विचारांवर आपला दृष्टिकोन किंवा व्यवहार अवलंबून असतो. प्रतिक्रियाही ठरते. विशेष म्हणजे आपण जसा विचार करतो, तसेच आपण बनत जातो. आपण जर काळ्या रंगाचा चष्मा लावला असेल तर सर्वत्र काळे दिसेल आणि लाल रंगाचा असेल तर लाल दिसेल. याचप्रकारे नकारात्मक विचारांमुळे आपल्याला सर्वत्र नैराश्य, दु:ख आणि असंतोष दिसते आणि सकारात्मक विचारांनी आपल्याला कायम आशा, सुख आणि समाधानच दिसते. आता आपण हे ठरवायचे आहे की, सकारात्मक चष्मा लावून जगाकडे पाहायचे की, नकारात्मक चष्म्याने पाहायचे. जर आपण सकारात्मकतेचा चष्मा लावला तर आपल्याला काहीतरी करावे, आनंदी जगावे असे वाटेल.

पण सकारात्मक राहायचं तर नक्की काय करायचं?

१. चारही बाजूंनी अंधार असेल आणि काहीच दिसत नसेल तर आपण लहानसा दिवा लावतो, स्वत:पुरता उजेड शोधतो. हा दिवा काय उजेड पाडणार म्हणून अंधारात बसत नाही. तो दिवा म्हणजे आपली ताकद आहे असं समजून मोठ्या अंधाराशी लढणं म्हणजे सकारात्मक विचार. छोटी पॉझिटिव्ह कृती हीच मग मोठी ताकद बनू लागते.

२. अनेकांना असं वाटतं की, उत्तम शिक्षण आणि मेहनत यांच्या मदतीने यशाच्या शिखरापर्यंत पोहचता येतं. मात्र त्यासोबत विचारही सकारात्मक हवे. ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना आपली कार्यनीती बनवली पाहिजे. आपल्या कमकुवत पैलू ओळखून त्या दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. वेळोवेळी आपल्या प्रगतीचा लेखा-जोखा मांडला पाहिजे. या कालावधीत चुका झाल्या तर त्या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि सर्वात म्हणजे स्वत:वर विश्‍वास ठेवला पाहिजे.

३. दुसऱ्यांबद्दल द्वेष, मत्सर, हेवा, बदला घेण्याची भावना असे नकारात्मक विचार आपली वाट अडवतात. दुसऱ्यांबद्दल चांगले विचार उलट उत्साह वाढवतील. जे मनात पेराल ते उगवेल.

४. समजूतदारपणा कामात आणून आपल्या कमकुवत पैलू जाणून घ्या. आपल्या उणिवा, कमतरता जाणून घेण्यासाठी आपल्या आई-वडिलांची आणि मित्र, शिक्षक यांची मदत घ्यायला शिकायला हवं. त्याचबरोबर स्वत:देखील आपल्या मनाला प्रश्‍न विचारून कोणत्या आपल्या उणिवा आहेत आणि त्या आपल्या यशाच्या मार्गात अडथळे आणतात का, याचा विचार केला तर पुढे जाणं अजून सोपं होतं.

( लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहे.)

kulkarni.swapnil85@gmail.com