शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

सांगा कसं जगायचं? कण्हत की गाणं म्हणत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 08:00 IST

मान्य आहे की परिस्थिती आपल्या हातात नसते, ती वाईटही असते पण आपले विचार तर आपण बदलू शकतो!

- स्वप्निल कुलकर्णी.

आपल्याही नकळत आपल्या मनात हजारो विचार येत असतात. काही विचार चांगले, सकारात्मक, आनंद निर्माण करणारे आणि जीवन समृद्ध करणारे असतात. काही विचार नकारात्मक, नैराश्य निर्माण करणारे असतात. कोरोना काळात २०२० मध्ये आपण सर्वांनीच हा अनुभव घेतला. अनेकदा परिस्थिती आपल्या हातात नसते, पण विचार करणं, प्रतिक्रिया आणि प्रतिसाद देणं हे तर आपल्याच हातात असतं. सकारात्मक आणि नकारात्मक. विचारांच्या या दोन बाजू. या विचारांवर आपला दृष्टिकोन किंवा व्यवहार अवलंबून असतो. प्रतिक्रियाही ठरते. विशेष म्हणजे आपण जसा विचार करतो, तसेच आपण बनत जातो. आपण जर काळ्या रंगाचा चष्मा लावला असेल तर सर्वत्र काळे दिसेल आणि लाल रंगाचा असेल तर लाल दिसेल. याचप्रकारे नकारात्मक विचारांमुळे आपल्याला सर्वत्र नैराश्य, दु:ख आणि असंतोष दिसते आणि सकारात्मक विचारांनी आपल्याला कायम आशा, सुख आणि समाधानच दिसते. आता आपण हे ठरवायचे आहे की, सकारात्मक चष्मा लावून जगाकडे पाहायचे की, नकारात्मक चष्म्याने पाहायचे. जर आपण सकारात्मकतेचा चष्मा लावला तर आपल्याला काहीतरी करावे, आनंदी जगावे असे वाटेल.

पण सकारात्मक राहायचं तर नक्की काय करायचं?

१. चारही बाजूंनी अंधार असेल आणि काहीच दिसत नसेल तर आपण लहानसा दिवा लावतो, स्वत:पुरता उजेड शोधतो. हा दिवा काय उजेड पाडणार म्हणून अंधारात बसत नाही. तो दिवा म्हणजे आपली ताकद आहे असं समजून मोठ्या अंधाराशी लढणं म्हणजे सकारात्मक विचार. छोटी पॉझिटिव्ह कृती हीच मग मोठी ताकद बनू लागते.

२. अनेकांना असं वाटतं की, उत्तम शिक्षण आणि मेहनत यांच्या मदतीने यशाच्या शिखरापर्यंत पोहचता येतं. मात्र त्यासोबत विचारही सकारात्मक हवे. ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना आपली कार्यनीती बनवली पाहिजे. आपल्या कमकुवत पैलू ओळखून त्या दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. वेळोवेळी आपल्या प्रगतीचा लेखा-जोखा मांडला पाहिजे. या कालावधीत चुका झाल्या तर त्या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि सर्वात म्हणजे स्वत:वर विश्‍वास ठेवला पाहिजे.

३. दुसऱ्यांबद्दल द्वेष, मत्सर, हेवा, बदला घेण्याची भावना असे नकारात्मक विचार आपली वाट अडवतात. दुसऱ्यांबद्दल चांगले विचार उलट उत्साह वाढवतील. जे मनात पेराल ते उगवेल.

४. समजूतदारपणा कामात आणून आपल्या कमकुवत पैलू जाणून घ्या. आपल्या उणिवा, कमतरता जाणून घेण्यासाठी आपल्या आई-वडिलांची आणि मित्र, शिक्षक यांची मदत घ्यायला शिकायला हवं. त्याचबरोबर स्वत:देखील आपल्या मनाला प्रश्‍न विचारून कोणत्या आपल्या उणिवा आहेत आणि त्या आपल्या यशाच्या मार्गात अडथळे आणतात का, याचा विचार केला तर पुढे जाणं अजून सोपं होतं.

( लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहे.)

kulkarni.swapnil85@gmail.com