-प्रदीप शिंदे
कोल्हापूच्या शिवाजी विद्यापीठातील अधिविभागांमधील वर्गाना सुट्टी दिल्याने वसतिगृहांमधील बहुतांश विद्यार्थी, विद्यार्थिनी आपापल्या गावी, घरी निघून गेले. सारं सुनं सुनं झालं. मात्र काही विद्यार्थी प्रोजेक्ट करायचा असल्याने थांबले. काही निवांतपणो अभ्यास करता येईल म्हणून थांबले. गावी जाऊन करायचे काय, म्हणून काहीजण थांबले. तर काही विद्याथ्र्याकडे घरी जाण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत म्हणून ते थांबले.काहीजणांना वाटलं, घरं लहान तिथं जाऊन काय अभ्यास होणार आहे. आहे तेच बरं आहे.अशा या ना त्या कारणाने ते वसतिगृहात थांबले.त्यात देशात लॉकडाउन केल्याने वाहतूक बंद झाली. त्यामुळे शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी भवन व तंत्रज्ञान अधिविभागातील 24 विद्यार्थी-विद्यार्थिनींना वसतिगृहात राहण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. बाहेरील परिस्थिती बिकट होत असताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी सर्वाची भेट घेऊन त्यांना धीर दिला. आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा निर्णय सर्वानी घेतला. शिवाजी विद्यापीठातील ‘कमवा आणि शिका’ योजनेतील विद्यार्थी भवन येथे कर्नाटकातील चिक्कोडी, सांगली, पालघर, सोलापूर, शिरोळ या गावांतील सहा विद्यार्थी थांबले आहेत. एम. ए., नाटय़शास्त्र विभाग तर काही एम. एस्सी. करतात.
............. मला सायकल चालवता येत नव्हती. बुद्धिबळ खेळता येत नव्हतं, आता मी तेही वेळात वेळ काढून शिकते आहे. - माधुरी मोहिते, (अंबक, जि. सांगली) नॅनो सायन्स, द्वितीय वर्ष----------------------------------अभ्यास व्हावा या उद्देशाने मी थांबण्याचा निर्णय घेतला होता. मी या ठिकाणीच सुरक्षित असल्याने घरच्या लोकांची चिंता मिटली आहे. दिवसातून किमान तीन वेळा तरी घरातून व्हिडीओ कॉल येतो. - निकिता बाबर, मिरज; एम.एस्सी. झूलॉजी-----------------------------माझी इंटर्नशिप चालू असल्यानं मी थांबण्याचा निर्णय घेतला. सध्या माझं वर्क फ्रॉम होम सुरू आहे. गावी लाइट व इंटरनेटची सुविधा नाही. त्यामुळे गावी जाऊन करायचे काय, हा प्रश्न माङयासमोर होता. - योगेश घाडेकर, संगणकशास्त्र विभाग, एम. एस्सी. ( तिसरे वर्ष) ------------------------------------------ घरचे वारंवार फोन करून कसा आहेस, याची विचारणा करतात. मात्र या ठिकाणीच खूप सुरक्षित वाटते. - मुझमिल नजार, जम्मू-काश्मीर, बी. टेक. तिसरे वर्ष ------------------------------------------माझा 24 मार्चर्पयत प्रोजेक्ट होता. त्यानंतर मी गावी जाणार होतो, मात्र आता गावी जाणं शक्य नसल्याने मी याकडे संधी म्हणून पाहतो. मी यू.पी.एस.सी.चा अभ्यास करीत असल्यानं मला अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. - सत्यवान कोळेकर, पुणो; बी. टेक. तिसरे वर्ष-----------------------------------------
( प्रदीप लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत उपसंपादक/वार्ताहर आहे.).