शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

कोल्हापूर विद्यापीठाच्या  रिकाम्या  कॅम्पस  मध्ये  जेव्हा  लॉक डाऊन भेटतं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 18:32 IST

शिवाजी विद्यापीठाचं कॅम्पस तसं रिकामं झालं. सगळे गावी गेले; पण काहीजण मागे राहिले, त्यांची एक आनंदी गोष्ट.

ठळक मुद्देछायाचित्रं - नसीर अत्तार

-प्रदीप शिंदे

कोल्हापूच्या शिवाजी विद्यापीठातील अधिविभागांमधील वर्गाना सुट्टी दिल्याने वसतिगृहांमधील बहुतांश विद्यार्थी, विद्यार्थिनी आपापल्या गावी, घरी निघून गेले. सारं सुनं सुनं झालं. मात्र काही विद्यार्थी प्रोजेक्ट करायचा असल्याने थांबले. काही निवांतपणो अभ्यास करता येईल म्हणून थांबले. गावी जाऊन करायचे काय, म्हणून काहीजण थांबले. तर काही विद्याथ्र्याकडे घरी जाण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत म्हणून ते थांबले.काहीजणांना वाटलं, घरं लहान तिथं जाऊन काय अभ्यास होणार आहे. आहे तेच बरं आहे.अशा या ना त्या कारणाने ते वसतिगृहात थांबले.त्यात देशात लॉकडाउन केल्याने वाहतूक बंद झाली. त्यामुळे शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी भवन व तंत्रज्ञान अधिविभागातील 24 विद्यार्थी-विद्यार्थिनींना वसतिगृहात राहण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. बाहेरील परिस्थिती बिकट होत असताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी सर्वाची भेट घेऊन त्यांना धीर दिला.  आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा निर्णय सर्वानी घेतला. शिवाजी विद्यापीठातील ‘कमवा आणि शिका’ योजनेतील विद्यार्थी भवन येथे कर्नाटकातील चिक्कोडी, सांगली, पालघर, सोलापूर, शिरोळ या गावांतील सहा विद्यार्थी थांबले आहेत.  एम. ए., नाटय़शास्त्र विभाग तर काही एम. एस्सी. करतात. 

कोरोनामुळे प्रत्येकाने सोशल डिस्टन्स ठेवून स्वतंत्र खोलीत राहाणो पसंत केले आहे. काहीजण सकाळी लवकर उठून व्यायाम करणं, काहींनी योग करून दिवसाची सुरुवात असं रुटीन लावलं. त्यांच्या जेवण्याची सोय मुलींच्या वसतिगृहात केली आहे, मुलं त्या ठिकाणी जातात. जेवण करून पुन्हा विद्यार्थी भवन येथे येतात.  शिवाजी विद्यापीठ परिसरातील शुकशुकाट त्यांना प्रारंभी खात होता. आता मात्र त्याची त्यांना सवय होते आहे. पूर्वी विद्यापीठ परिसरात मोर नागरिकांना बघून घाबरून जात होते. तेसुद्धा या रस्त्यांवर आता बिनधास्तपणो वावरताना त्यांना दिसत आहेत, असं ते सांगतात.  दुपारी थोडी झोप घेऊन काही मुले अवांतर वाचन करण्यासह अभ्यास करताना दिसतात. पुन्हा सायंकाळी सात वाजता जेवण करण्यासाठी सगळे एकत्र जातात. त्यानंतर रात्री पुन्हा गप्पांचा फड रंगतो. मात्र हे सर्व करीत असताना ते ठरावीक अंतर ठेवूनच बसतात, असं या मुलांनी आवजरून सांगितलं.मुलींच्या वसतिगृहामध्ये पुणो, बार्शी, मिरज, दौंड, निगवे खालसा येथील ‘कमवा आणि शिका’ योजनेतील चार व वसतिगृहातील एक अशा पाच मुली राहातात. सकाळी लवकर उठून सर्वाच्या जेवणाची तयारी करणं, दुपारी जेवण झाल्यावर अवांतर वाचन, गाणी ऐकणो किंवा अभ्यास करणं, त्यानंतर संध्याकाळी काही वेळ गप्पा मारणो, बॅटमिंटन खेळणं, त्यानंतर पुन्हा जेवणाची तयारी सुरू होते. असं या मुलींचे रुटीन झालं आहे. प्रशासनाने एक महिला वॉर्डन व महिला सुरक्षारक्षक या ठिकाणी तैनात केले आहेत. शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागात औरंगाबाद, जालना, मुंबई, पुणो यासह परराज्यातील बिहार, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, गुजरात, नागपूर येथील 12 विद्यार्थी रहातात. मुलींचं वसतिगृह लांब असल्यानं आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव ते या ठिकाणीच बाहेरून डबा आणून जेवतात.येथील काही मुलं या परिस्थितीकडे संधी म्हणून सकारात्मकपणो पाहत आहेत. कॉलेज नाही, अभ्यास नाही; त्यामुळे निवांत उशिरा उठणं पसंत करतात. दुपारी जेवण, थोडा वेळ लॅपटॉप, मोबाइलवर बातम्या पाहणो, पिक्चर पाहण्यात वेळ घालवतात. काहीजणांनी स्वत:ला अभ्यासात गुंतवून ठेवलं आहे, मात्र प्रत्येकाने स्वतंत्र खोलीमध्ये राहाणो पसंत केलं आहे. बाहेरील परिस्थिती पाहता कॅम्पसमधून बाहेरील कोणी आत येत नाही, आतील कोणी बाहेर जात नाही; त्यामुळे आम्ही या ठिकाणी सुरक्षित आहोत, असं ही मुले  आवजरून सांगतात. सध्या तरी त्यांचं एकेकटं आयुष्य तसं इथं आनंदात चाललं आहे. रिकाम्या कॅम्पसमधले हे दोस्त, वेट अॅण्ड वॉचवरच आहेत.

 

.............  मला सायकल चालवता येत नव्हती. बुद्धिबळ खेळता येत नव्हतं, आता मी तेही वेळात वेळ काढून शिकते आहे. - माधुरी मोहिते, (अंबक,  जि. सांगली) नॅनो सायन्स, द्वितीय वर्ष----------------------------------अभ्यास व्हावा या उद्देशाने मी थांबण्याचा निर्णय घेतला होता. मी या ठिकाणीच सुरक्षित असल्याने घरच्या लोकांची चिंता मिटली आहे. दिवसातून किमान तीन वेळा तरी घरातून व्हिडीओ कॉल येतो.  - निकिता बाबर, मिरज; एम.एस्सी. झूलॉजी-----------------------------माझी इंटर्नशिप चालू असल्यानं मी थांबण्याचा निर्णय घेतला. सध्या माझं वर्क फ्रॉम होम सुरू आहे. गावी लाइट व इंटरनेटची सुविधा नाही. त्यामुळे गावी जाऊन करायचे काय, हा प्रश्न माङयासमोर होता.  - योगेश घाडेकर, संगणकशास्त्र विभाग, एम. एस्सी. ( तिसरे वर्ष) ------------------------------------------ घरचे वारंवार फोन करून कसा आहेस, याची विचारणा करतात. मात्र या ठिकाणीच खूप सुरक्षित वाटते. - मुझमिल नजार, जम्मू-काश्मीर, बी. टेक. तिसरे वर्ष ------------------------------------------माझा 24 मार्चर्पयत प्रोजेक्ट होता. त्यानंतर मी गावी जाणार होतो, मात्र आता गावी जाणं शक्य नसल्याने मी याकडे संधी म्हणून पाहतो. मी यू.पी.एस.सी.चा अभ्यास करीत असल्यानं मला अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. - सत्यवान कोळेकर, पुणो; बी. टेक. तिसरे वर्ष-----------------------------------------

( प्रदीप लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत उपसंपादक/वार्ताहर आहे.).

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या