शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ऑलिम्पिकच्या उंबरठय़ावरचं माप

By admin | Updated: July 16, 2015 19:08 IST

जे स्वप्न 35 वर्षापूर्वीच विझून गेलं होतं,त्या स्वप्नावरची धूळ पुसण्याचं काम खेडय़ापाडय़ातल्या जिद्दी-हट्टी मुली मोठय़ा हिमतीनं करताहेत.

विश्वास चरणकर
 
जे स्वप्न 35 वर्षापूर्वीच विझून गेलं होतं,त्या स्वप्नावरची धूळ पुसण्याचं काम खेडय़ापाडय़ातल्या
जिद्दी-हट्टी मुली मोठय़ा हिमतीनं करताहेत. कोण त्या मुली? कुठलं स्वप्न छळतंय त्यांनाही?
---------------
गेली 35 वर्षापासूनचे एक स्वप्न घेऊन देश जगतोय.
इतक्या वर्षात कधीही भारतीय महिला हॉकी संघ ऑलिम्पिकर्पयत पोहचू शकला नाही.
आणि यंदा अचानक त्या दूर कुठंतरी गाडल्या गेलेल्या स्वप्नाला संजीवनी मिळावी तसं ते स्वप्न मातीतूनच तरारून वर आलं.
आणि सगळ्या हॉकी जगतालाच आशा वाटू लागली की,
होऊ शकतं असं? भारतीय महिला हॉकी संघ पुन्हा ऑलिम्पिकचे सामने खेळताना दिसू शकेल? तशी आशा तरी आता निर्माण झाली आहे. भारतीय महिला संघ ऑलिम्पिक क्वालिफाय करण्याच्या उंबरठय़ावर उभा आहे.
आणि हे स्वप्न पाहण्याची हिंमत दाखवणारी टीम आणि तिची कॅप्टन, यांच्या हिमतीची आणि जिगरबाज लढाऊ वृत्तीची ओळख करून घेणंही गरजेचं आहे.
महिला हॉकी संघाची कॅप्टन आहे, रितू राणी. आज या राणीच्या कप्तानीतच जेमतेम वयाच्या विशीत असलेल्या तरुणी एक नवंच स्वप्न डोळ्यात घेऊन निघाल्या आहेत.
एक असं स्वप्न, जे 35 वर्षापूर्वीच विझून गेलं होतं. शेवटचं म्हणजे 1980 साली भारतीय महिला संघ रशियात झालेल्या ऑलिम्पिकमध्ये खेळला होता. त्यानंतर आजवर भारताला ऑलिम्पिक पात्रता मिळविता आलेली नाही. भारतीय महिला संघ ऑलिम्पिकमध्ये पुन्हा कधी खेळणार, असा एकच प्रश्न सतावत होता. पण रितू राणीच्या नेतृत्वाखाली हे स्वप्न यंदा साकारताना दिसतंय. नुकत्याच बेल्जीयममध्ये झालेल्या विश्व हॉकी लीग सेमीफायनलमध्ये भारताने जपानला हरवून पाचवे स्थान मिळविले. या विजयामुळे ही टीम 2016 च्या रिओ ऑलिम्पिकच्या दरवाजावर पोहचला आहे. 198क् साली या संघातली एकही मुलगी जन्मालाही आलेली नव्हती. सा:याजणी नव्वदनंतर जन्मलेल्या, अवघ्या विशीतल्या. त्यातल्या अनेकींनी तर वयाच्या दहाव्या वर्षापासून हॉकी खेळायला सुरुवात केली आहे. आणि जे स्वपA अनेक पिढय़ा विसरून गेल्या होत्या त्या स्वप्नावरची धूळ पुसण्याचं काम तरी या मुलींनी केलं आहे.
या अचाट कामगिरीचं श्रेय आहे संघाची कर्णधार रितू राणी हिचं आणि अर्थातच संघात लढणा:या खेडय़ापाडय़ातल्या हिमतीच्या तरुण मुलींचं.
हरयाणात शाहबाद नावाचं एक गाव आहे. हे गाव म्हणजे हॉकीपटूंचं उगमस्थान. आपल्याकडं बाळ जन्माला आलं की त्याच्या पाचव्या दिवशी पूजा करतात. याच दिवशी सटवाई त्या बालकाचं भविष्य लिहिते असे मानतात. या पूजेत वही-पेन अगदी हमखास ठेवतात. पण या शाहबादमध्ये हॉकी स्टीक ठेवून पूजा केली जात असेल, इतकी हॉकी इथल्या  मुलामुलींच्या नसानसांतून खेळते आहे. त्यात शाहबादच्या फॅक्टरीतून आलेल्या बहुसंख्य मुली या हॉकी संघात खेळतात. कामगार कष्टकरी वर्गातून आलेल्या या मुली, एका खेळाच्या जोरावर त्या स्वत:सह भारतीय हॉकीचं भवितव्य घडवण्याचा प्रय} करत आहेत.
कॅप्टन रितू म्हणते, ‘‘जपानविरुद्धचा सामना आमच्यासाठी लास्ट चान्स होता हे आम्हाला माहीत होते. आम्ही जीवतोड मेहनत केली. आम्ही जपानला हरवलं आणि पाचवं स्थान मिळवलं. हा विजय आम्हाला ऑलिम्पिकचे तिकीट मिळवून देऊ शकतो ही भावना आनंददायी होती. बेल्जीयम ते हरयाणा व्हाया दिल्ली असा या जल्लोषाचा मार्ग होता. अजून बरंच काही बाकी आहे, ही सुरुवात आहे हे मात्र आम्हाला पक्कं माहिती आहे!’’
खरंच ही जर सुरुवात असेल, तर नव्या आशेनं पाहायला हवं या सुरुवातीकडे !